शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

जेएनयूतील गैरहजर विद्यार्थ्यांच्या पालकांना पत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 03:36 IST

जेएनयूमध्ये ८६ टक्क्यांची मोडला नियम; किमान हजेरीही नाही

नवी दिल्ली : वर्गांमध्ये किमान आवश्यक उपस्थिती नसलेल्या सुमारे सात हजार विद्यार्थ्यांच्या पालकांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठ पत्रे पाठवणार आहे. विद्यापीठातील एकूण विद्यार्थ्यांपैकी ८६ टक्के विद्यार्थ्यांची (सात हजार) वर्गांत किमान आवश्यक तेवढीही हजेरी नाही. जेएनयूमध्ये ८१00 विद्यार्थी शिकतात.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किमान आवश्यक उपस्थितीचा विद्यापीठाचा हा ताजा नियम असून किमान तीन एमफील/पीएचडी विद्यार्थ्यांना गैरहजेरीबद्दल इशारा देणारी पत्रे १६ एप्रिल रोजी सहायक निबंधकांच्या कार्यालयाने पाठवली आहेत. पत्रात पालकांना उद्देशून म्हटले आहे की, तुमचा पाल्य गेल्या हिवाळी सत्रापासून ते फेब्रुवारीअखेरपर्यंत (२०१८) सगळे दिवस वर्गात परवानगी न घेता गैरहजर आहे. तुमच्या पाल्याच्या भविष्याचा विचार करता तो वर्गांत उपस्थितीचे नियम पाळल, अशी आम्ही तुम्हाला विनंती करीत आहोत, असेही पत्रात म्हटले आहे. विद्यार्थ्यांनी मात्र विद्यापीठाच्या या कृतीवर टीका केली आहे.संशोधक विद्यार्थ्यांनाही पत्रे हास्यास्पदया पत्राबाबत जेएनयु विद्यार्थी संघटनेच्या उपाध्यक्ष सिमोन झोया खान यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, हे संशोधन करणारे विद्यार्थी २७ ते २९ वयोगटातील आहेत. त्यांच्या पालकांना पत्रे पाठवून विद्यापीठाला काय म्हणायचे आहे? काही संशोधक विद्यार्थी विवाहीत असून त्यांना मुलेही आहेत. विद्यापीठाचे हे वागणे विद्यार्थ्याचा आवाज दाबण्याचा प्रकार आहे. बी.ए. किंवा एम. ए. च्या विद्यार्थ्यांबाबत मी हे समजू शकते परंतु संशोधक विद्यार्थ्यांनाही पत्रे हे हास्यास्पद आहे.

टॅग्स :educationशैक्षणिक