शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

धडा शिकवणार : पाकिस्तानला जाणारे पाणी भारत अडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 02:03 IST

सिंधू पाणी वाटप करारानुसार आपल्या वाट्याचे पाणी आतापर्यंत भारताकडून वापरण्यात आलेले नाही. तथापि, पाकिस्तानकडून भारतात अतिरेकी पाठविण्याच्या धोरणाचा बदला घेण्यासाठी आता भारताने हे पाणी वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

 नवी दिल्ली : सिंधू पाणी वाटप करारानुसार आपल्या वाट्याचे पाणी आतापर्यंत भारताकडून वापरण्यात आलेले नाही. तथापि, पाकिस्तानकडून भारतात अतिरेकी पाठविण्याच्या धोरणाचा बदला घेण्यासाठी आता भारताने हे पाणी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जम्मू-काश्मिरातील कठुआ जिल्ह्यात एक धरण बांधण्याच्या योजनेवर सरकार काम करीत आहे.सिंधू पाणी वाटप करारानुसार भारताच्या वाट्याला येणारे पाणी वापरण्यासाठी उझ बहुउद्देशीय प्रकल्पाच्या अहवालाला केंद्रीय जल आयोगाने अंतिम स्वरूप दिले आहे. हा अहवाल जम्मू-काश्मीर सरकारला सादर करण्यात आला. त्यावर लवकर काम सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. उझ ही रावीची उपनदी आहे. कठुआ जिल्ह्यात उझचा प्रवाह अडविण्यात येईल. ०.६५ दशलक्ष एकर फूट (एमएएफ) पाणी साठविण्याची क्षमता त्यातून निर्माण होईल. त्यातून ३० हजार हेक्टर शेतीचे सिंचन होऊ शकेल, तसेच २०० मेगावॅट वीज निर्माण होईल.२०१६ मध्ये पाकिस्तान समर्थित अतिरेक्यांनी उरी येथील लष्करी तळावर हल्ला केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानात वाहून जाणारे भारताच्या वाट्याचे पाणी अडवण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी पंतप्रधानांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा आणि राष्टÑीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हाल यांच्या नेतृत्वाखाली एक आंतर-मंत्रालयीन समिती स्थापन करण्यात आली होती.१९६० साली सिंधू पाणी वाटप करार झाला होता. या करारानुसार सिंधू खोºयातील रावी नदीचे पाणी भारताच्या वाट्याला आहे. २००१ मध्येच हे पाणी अडविण्याला हिरवा कंदील मिळाला होता. तथापि, त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करायला जल आयोगाला १६ वर्षे लागली. विद्यमान सरकारने या कामाला अधिक गती दिली. सिंधू नदीच्या खोºयातील आपल्या हिश्श्याचे जास्तीत जास्त पाणी वापरण्यासाठी सर्व पर्याय वापरण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर कृती दलाची स्थापना केली होती.पाकिस्तान बांधणार झेलम नदीवर धरणइस्लामाबाद: जलविद्युत निर्मितीसाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये झेलम नदीवर एक धरण बांधण्याची योजना पाकिस्तान सरकारने आखली आहे. पाकिस्तानच्या केंद्रीय विद्युत नियामक प्राधिकरणाच्या हवाल्याने ‘एक्स्प्रेस ट्रिब्युन’ दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार या ‘आझाद पत्तन जलविद्युत प्रकल्प’ असे याचे नाव असून त्यासाठी १.५१ अब्ज डॉलर कर्च येईल व तो सन २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. प्रकल्पखर्चापैकी ७५ टक्के रक्कम परकीय कर्जातून उभी केली जाईल.

टॅग्स :WaterपाणीIndiaभारतPakistanपाकिस्तान