शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

धडा शिकवणार : पाकिस्तानला जाणारे पाणी भारत अडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 02:03 IST

सिंधू पाणी वाटप करारानुसार आपल्या वाट्याचे पाणी आतापर्यंत भारताकडून वापरण्यात आलेले नाही. तथापि, पाकिस्तानकडून भारतात अतिरेकी पाठविण्याच्या धोरणाचा बदला घेण्यासाठी आता भारताने हे पाणी वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

 नवी दिल्ली : सिंधू पाणी वाटप करारानुसार आपल्या वाट्याचे पाणी आतापर्यंत भारताकडून वापरण्यात आलेले नाही. तथापि, पाकिस्तानकडून भारतात अतिरेकी पाठविण्याच्या धोरणाचा बदला घेण्यासाठी आता भारताने हे पाणी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जम्मू-काश्मिरातील कठुआ जिल्ह्यात एक धरण बांधण्याच्या योजनेवर सरकार काम करीत आहे.सिंधू पाणी वाटप करारानुसार भारताच्या वाट्याला येणारे पाणी वापरण्यासाठी उझ बहुउद्देशीय प्रकल्पाच्या अहवालाला केंद्रीय जल आयोगाने अंतिम स्वरूप दिले आहे. हा अहवाल जम्मू-काश्मीर सरकारला सादर करण्यात आला. त्यावर लवकर काम सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. उझ ही रावीची उपनदी आहे. कठुआ जिल्ह्यात उझचा प्रवाह अडविण्यात येईल. ०.६५ दशलक्ष एकर फूट (एमएएफ) पाणी साठविण्याची क्षमता त्यातून निर्माण होईल. त्यातून ३० हजार हेक्टर शेतीचे सिंचन होऊ शकेल, तसेच २०० मेगावॅट वीज निर्माण होईल.२०१६ मध्ये पाकिस्तान समर्थित अतिरेक्यांनी उरी येथील लष्करी तळावर हल्ला केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानात वाहून जाणारे भारताच्या वाट्याचे पाणी अडवण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी पंतप्रधानांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा आणि राष्टÑीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हाल यांच्या नेतृत्वाखाली एक आंतर-मंत्रालयीन समिती स्थापन करण्यात आली होती.१९६० साली सिंधू पाणी वाटप करार झाला होता. या करारानुसार सिंधू खोºयातील रावी नदीचे पाणी भारताच्या वाट्याला आहे. २००१ मध्येच हे पाणी अडविण्याला हिरवा कंदील मिळाला होता. तथापि, त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करायला जल आयोगाला १६ वर्षे लागली. विद्यमान सरकारने या कामाला अधिक गती दिली. सिंधू नदीच्या खोºयातील आपल्या हिश्श्याचे जास्तीत जास्त पाणी वापरण्यासाठी सर्व पर्याय वापरण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर कृती दलाची स्थापना केली होती.पाकिस्तान बांधणार झेलम नदीवर धरणइस्लामाबाद: जलविद्युत निर्मितीसाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये झेलम नदीवर एक धरण बांधण्याची योजना पाकिस्तान सरकारने आखली आहे. पाकिस्तानच्या केंद्रीय विद्युत नियामक प्राधिकरणाच्या हवाल्याने ‘एक्स्प्रेस ट्रिब्युन’ दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार या ‘आझाद पत्तन जलविद्युत प्रकल्प’ असे याचे नाव असून त्यासाठी १.५१ अब्ज डॉलर कर्च येईल व तो सन २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. प्रकल्पखर्चापैकी ७५ टक्के रक्कम परकीय कर्जातून उभी केली जाईल.

टॅग्स :WaterपाणीIndiaभारतPakistanपाकिस्तान