शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

Lakhimpur Violence: लखीमपूर प्रकरणातील आरोपी, गृहमंत्र्यांचा मुलगा नेपाळला पळून गेला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2021 4:17 PM

Lakhimpur Violence: लखीमपूर खेरी येथे रविवारी झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आशिष मिश्राविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देआम आदमी पक्षाचे आमदार नरेश बालयान यांनी एक ट्विट करुन, गृहराज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांचा मुलगा आरोपी आशिष मिश्र हा नेपाळला पळून गेल्याचं सांगण्यात आलं होतं.

लखीमपूर खेरी : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणातील आरोपी आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला गुन्हे शाखेने शुक्रवारी सकाळी कार्यालयात येण्यास सांगितले होते. पण, अजूनपर्यंत आशिष मिश्रा किंवा त्यांचे वकीलही गुन्हे शाखेच्या कार्यालयात दाखल झालेले नाहीत. तर, आशिष मिश्राला अद्यापही अटक करण्यात न आल्याने देशभरातून संताप व्यक्त होत आहे. आता, आम आदमी पक्षाच्या आमदाराने केलेलं ट्विट चांगलेच चर्चेत आलं आहे. 

लखीमपूर खेरी येथे रविवारी झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आशिष मिश्राविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर, त्यास शुक्रवारी सकाळी 10 वाजता गुन्हे शाखेच्या कार्यालयात दाखल होण्यास सांगितले होते. यासंदर्भातील नोटीसही त्याच्या निवासस्थानाबाहेर चिकटवण्यात आली. तसेच, या प्रकरणाच्या तपास पथकाचे नेतृत्व करणारे पोलीस उपमहानिरीक्षक उपेंद्र अग्रवालही वेळेवर कार्यालयात पोहोचले. पण, आशिष कार्यालयात आलाच नाही. त्यामुळे, आशिषला अद्याप अटक का नाही, असा प्रश्न सर्वच स्तरातून विचारला जात आहे. 

आम आदमी पक्षाचे आमदार नरेश बालयान यांनी एक ट्विट करुन, गृहराज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांचा मुलगा आरोपी आशिष मिश्र हा नेपाळला पळून गेल्याचं सांगण्यात आलं होतं. विशेष म्हणजे नरेश बालयान यांचं हे ट्विट गृहराज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांनी रिट्विट केलं आहे. बालयान यांनी हेही ट्विट करुन सांगितलंय. त्यामुळे, या ट्विटचा नेमका अर्थ काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तसेच, आशिष मिश्र खरंच नेपाळला पळून गेलाय का, असा प्रश्न अनेकांन पडला आहे. दरम्यान, आपल्या ट्विटमध्ये बालयान यांनी, अजय मिश्र यांच्यावरही गंभीर आरोप केले आहे. अजय मिश्र हे डिझेल आणि चंदनाच्या लाकडाची तस्करी करत होते, जर असा बाप गृहराज्यमंत्री असेल. तर, पोरगा बलात्कारी, हत्यारा निघणारच.. असेही त्यांनी म्हटलं आहे.  

उद्या पोलिसांना शरण येण्याची शक्यता ?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा रात्री उशिरापर्यंत लखीमपूर खेरीला पोहोचतील आणि त्यानंतर ते उद्या पत्रकार परिषद घेऊन आपल्या मुलाला सादर करतील. त्यामुळे आशिष मिश्रा उद्या म्हणजेच शनिवारी पोलिसांसमोर हजर होऊ शकतात. दरम्यान, आशिष मिश्रा नेपाळला पळून गेल्याच्या काही बातम्या सकाळी माध्यमांमध्ये दाखवण्यात आल्या होत्या, पण याची अधिकृतपणे अद्याप पुष्टी झालेली नाही. 

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारHome Ministryगृह मंत्रालयCrime Newsगुन्हेगारीNepalनेपाळ