शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

ऐक्याची कमतरता, टोकाची चाटुकारिता, गुलाम नबी आझाद यांचे आत्मचरित्रातून काँग्रेसबाबत मोठमोठे गौप्यस्फोट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 19:20 IST

Ghulam Nabi Azad : काश्मीरमधील दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांचं आत्मचरित्र प्रकाशित होत आहे. या आत्मचरित्रामधून त्यांनी काँग्रेसबाबत मोठमोठे गौप्यस्फोट केले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुढच्या काळात मोठा वाद निर्माण होऊ शकतो.

काँग्रेसमध्ये बंडखोरी करून आपली वेगळी राजकीय वाटचाल करणारे काश्मीरमधील दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांचं आत्मचरित्र प्रकाशित होत आहे. या आत्मचरित्रामधून त्यांनी काँग्रेसबाबत मोठमोठे गौप्यस्फोट केले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुढच्या काळात मोठा वाद निर्माण होऊ शकतो. गुलाम नही आझाद यांचं आझाद हे आत्मचरित्र बुधवारी दिल्लीत प्रकाशित होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कर्ण सिंह या पुस्तकाचं प्रकाशन करणार आहेत. 

गुलाम नबी आझाद यांनी या आत्मचरित्रामधून काँग्रेसमध्ये घडलेल्या चुकीच्या गोष्टींचा विस्तृतपणे उहापोह करण्यात आला आहे. २०२२ मध्ये काँग्रेस सोडण्यापूर्वी आझाद हे जवळपास ५५ वर्षे काँग्रेसमध्ये होते. त्यांनी आत्मचरित्रात लिहिलं की, काँग्रेसच्या पतनाचं महत्त्वाचं कारण म्हणजे, हा पक्ष राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर आपल्याच सक्षम नेतृत्वाविरोधात समानांतर, अक्षम नेतृत्व उभं करून त्याला नष्ट करून टाकतो. या प्रक्रियेने पक्षाला वरपासून खालपर्यंत संपवून टाकलं आहे, असा आरोप आझाद यांनी केला आहे.

तसेच खूशमस्करेगिरी, चाटुकारिता यामुळे पक्षाचं नुकसान होत असल्याचं आझाद यांनी खेदपूर्वक या आत्मचरित्रात नमूद केलं आहे. एका ठराविका काळापासून चाटुकारितेने पक्षामध्ये केंद्रीय स्थान घेतलं आहे. दुर्दैवाने कुणीही हे कटू सत्य ऐकू इच्छित नाही, असे आझाद म्हणाले.

या आत्मचरित्रामध्ये गुलाम नबी आझाद यांनी कलम ३७० हटवण्यात आले, तेव्हाच्या प्रसंगाचाही उल्लेख केला. जेव्हा अमित शाहांनी राज्यसभेमध्ये कलम ३७० हटवण्याची घोषणा केली आणि जम्मू-काश्मीरचं दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याचा निर्णय घेतला विरोधी पक्ष नेते धरणे देऊन बसले. मात्र जयराम रमेश त्यात सहभागी झाले नाहीत. ते तेव्हा राज्यसभेतील काँग्रेसचे चिफ व्हिप होते.  

टॅग्स :Ghulam Nabi Azadगुलाम नबी आझादcongressकाँग्रेस