शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

काँग्रेस सरकार अल्पमतात, जाणून घ्या मध्य प्रदेशमधील 'नंबर गेम'  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 16:07 IST

मध्य प्रदेशच्या विधानसभा सदस्यांची संख्या 230 आहे. त्यापैकी राज्यातील 2 आमदारांचे निधन झाल्याने ही संख्या 228 वर येऊन पोहोचली आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या तासाभराच्या बैठकीनंतर काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. तसेच, ज्योतिरादित्य शिंदे समर्थक 20 आमदारांनीही राजीनामे दिले आहेत. त्यामुळे, मध्य प्रदेशमधील राजकारणाची नवी समिकरणं कशी? असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. आकड्यांचा खेळ करुन भाजपा सत्ता स्थापन करणार करेल, असेच दिसून येतंय. 

'शिंदे तो झाँकी है, सचिन पायलट और मिलिंद देवरा अभी बाकी है'

मध्य प्रदेशच्या विधानसभा सदस्यांची संख्या 230 आहे. त्यापैकी राज्यातील 2 आमदारांचे निधन झाल्याने ही संख्या 228 वर येऊन पोहोचली आहे. काँग्रेसकडे 114 आमदारांचे संख्याबळ असल्याने 115 आमदारांचे संख्याबळ देऊन काँग्रेसने बहुमत सहजच सिद्ध केलं. काँग्रेसला 6 आमदराचे समर्थन मिळाले, त्यामुळे काँग्रेस आघाडीची संख्या 121 वर पोहोचली होती. त्यावर, काँग्रेसने सरकार बनवले. तर, भाजपाकडे 107 आमदार होते. भाजपाला सत्तास्थापनेसाठी 8 आमदार कमी पडत होते. त्यामुळे भाजपाला विरोधी पक्षात जावे लागले.  

राजीनाम्यानंतरकाँग्रेसच्या 20 आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे विधानसभा सदस्यांची संख्या 208 वर पोहोचली आहे. त्यामुळे, बहुमत सिद्ध करण्यासाठी सत्ताधारी पक्षाला 105 आमदारांची गरज आहे. तर, भाजपाकडे स्वत:चे 107 आमदार आहेत. त्यामुळे राज्यपालांचे आमंत्रण मिळताच, भाजपा मध्य प्रदेशमध्ये आपलं सरकार स्थापन करू शकते. त्यानंतर, सहजपणे विधानसभेत बहुमत सिद्ध केलं जाईल.

 

अपक्ष आमदारांचे समर्थनसध्या राज्यातील 4 अपक्ष आमदारांचा काँग्रेसला पाठिंबा आहे. मात्र, सत्तापरिवर्तन अटळ असल्याचे दिसून येताच, या चारही आमदरांचा भाजपाला पाठिंबा मिळू शकतो. त्यामुळे भाजापाचे संख्याबळ 111 होईल. त्यानंतर, सत्ता टिकविण्यासाठी पोटनिवडणुकीत भाजपाला 22 जागांपैकी केवळ 6 जागांवर विजय मिळवणं आवश्यक आहे. जर अपक्षांचे समर्थन भाजपाला मिळाले नाही, तर भाजपाला 10 जागांवर विजय मिळवावा लागेल. 

जर काँग्रेसला सरकार स्थापन करायचे असेल तर, पोटनिवडणुकीत काँग्रेसला 22 पैकी 21 जागांवर विजय मिळवावा लागेल. मात्र, राजीनामा दिलेले आमदार भाजपाकडून निवडणूक लढविण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे, काँग्रेसला हा विजयी आकडा गाठणे अतिशय अवघड दिसून येतंय. काँग्रेस आमदारांची संख्या कमी होऊन 96 वर पोहोचली आहे. जर अपक्ष आमदारांनी समर्थन दिले, तर काँग्रेसला 18 जागांवर विजय मिळवावा लागेल. दरम्यान, शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर काँग्रेसला लक्ष्य करण्यात येत आहे. तर, शिंदे तो झाँकी है, पायलट और देवरा अभी बाकी आहे, असे मेसेजही पाहायला मिळत आहेत.  

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेशMLAआमदार