शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

किसान सन्मान योजना मोदींसाठी डोकेदुखी; केंद्र सरकारची लोकसभा निवडणुकीपूर्वी घाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 6:07 AM

शेतक-यांचा रोष कमी करून त्यांना आपलेसे करण्यासाठी जाहीर केलेल्या या योजनेचे पैसे मतदानापूर्वी प्रत्यक्ष शेतक-यांच्या हाती पडावेत, असा मोदींना आग्रह असून त्यासाठी त्यांनी संबंधित मंत्रालयांना युद्धपातळीवर कामाला लावले आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : लहान आणि अल्पभूधारक शेतक-यांना दरवर्षी सहा हजार रुपये थेट रोख मदत देण्याची ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ ही अंतरिम अर्थसंकल्पात जाहीर केलेली महत्वाकांक्षी योजना लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रत्यक्षात कशी राबवावी, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी एक डोकेदुखीचा विषय ठरू पाहात आहे. शेतक-यांचा रोष कमी करून त्यांना आपलेसे करण्यासाठी जाहीर केलेल्या या योजनेचे पैसे मतदानापूर्वी प्रत्यक्ष शेतक-यांच्या हाती पडावेत, असा मोदींना आग्रह असून त्यासाठी त्यांनी संबंधित मंत्रालयांना युद्धपातळीवर कामाला लावले आहे.या रकमेचा गेल्या डिसेंबरपासूनच्या तिमाहीचा २,००० रुपयांचा पहिला हप्ता फेब्रुवारीत किंवा मार्चच्या सुरुवातीस देता यावा यासाठी या योजनेचे लाभार्थी ठरू शकणाºया देशभरातील १२.५६ कोटी शेतकºयांची बँकांशी तातडीने जोडणी करा, असे सक्त निर्देश पंतप्रधानांनी ग्रामीण विकास, कृषी, वित्त व माहिती तंत्रज्ञान या केंद्रीय मंत्रालयांना दिले आहेत. लोकसभा निवडणुकीची अधिसूचना निघेपर्यंत मदतीचा पहिला हप्ता शेतकºयांच्या बँक खात्यांमध्ये जमा झाला की, प्रत्यक्ष मतदानापर्यंत आणखी दोन हजार रुपयांचा दुसरा हप्ता देणेही सरकारला सुलभ होईल.यासाठी या १२.५६ कोटी शेतकºयांच्या जमीन मालकीसंबंधीच्या महसुली नोंदी अद्ययावत करून त्यांची छाननी करणे व त्याच बरोबर या शेतकºयांची बँक खाती या योजनेशी जोडणे एवढे अवाढव्य काम अल्वाधीत उरकावे लागणार असून त्यासाठी वर उल्लेख तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक व पश्चिम बंगालसह १४ राज्यांमध्ये शेतजमिनींच्या संगणकीकृत नोंदी जवळजवळ पूर्ण झालेल्या असल्याने या राज्यांना या योजनेचा लगेच सर्वाधिक फायदा मिळेल. (राज्यनिहाय चित्र सोबतच्या तक्त्यांत दिले आहे.)मजेची गोष्ट अशी की गोव्यात लाभार्थी शेतकºयांची संख्या जेमतेम ५१ हजार आहे. पण त्यांच्याजमीन मालकीच्या नोंदींचे संगणकीकरण फक्त ५३ टक्के झालेले आहे.गेल्या ५५ महिन्यांत देशात ३४ कोटी ‘जनधन’ बँक खाती सुरु केली गेली. यापैकी १५ कोटी खाती ग्रामीण भागांत आहेत. ग्रामीण विकासमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ‘मरेगा’च्या एकूण १२ कोटी लाभार्थींपैकी आठ कोटी लाभार्थींच्या संगणकीकृत नोंदी झाल्या आहेत.त्यापैकी या योजनेच्या पात्रता निकषांत बसणारे शेतकरी किती आहेत हे शोधून त्यांची बँक खाती जोडून घेण्याचे काम सध्या ामचे मंत्रालय करत आहे.देशभरातील शेतजमीन असलेल्यांपैकी ६७ टक्के लोकसंख्या या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कक्षेत येईल, अशा प्रकारे तिची आखणी करण्यात आली आहे. राजकारणाच्या भाषेत सांगायचे तर लोकसभेच्या ५४२ पैकी ३४२ मतदारसंघांमध्ये या योजनेचे लाभार्थी असणार आहेत.त्यांना डोळ््यापुढे ठेवूनच ही योजना निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केली असल्याने योजना प्रत्यक्ष सुरु करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व पूर्वतयारी २५ फेब्रुवारीपर्यंत काही करून पूर्ण करण्याची सक्त ताकीद मोदींनी सर्व संबंधितांना दिली असल्याचे सूत्रांकडून समजते.देशभरातील १२.५६ कोटी लाभीर्थींपैकी सुमारे १.९८ कोटी शेतकरी महाराष्ट्रातील असतील. या सर्वांच्या जमीनमालकीच्या संगणकीकृत नोंदीचे काम ९८.८३ टक्के पूर्ण झाले असून बहुतांश शेतकºयांची बँक खाती जोडलेली आहेत.केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहन सिंग यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, आमच्या मंत्रालयात ८.५९ कोटी शेतकºयांचा डेटाबेस उपलब्ध आहे. यापैकी २.२२ कोटी शेतकरी आधीपासून सुरु असलेल्या १५ विविध योजनांचे लाभार्थी आहेत व त्यापैकी २.०७ कोटी शेतकºयांची बँक खाती जोडलेली आहेत. किसान क्रेडिट कार्ड असलेल्यांची संख्या सात कोटी आहे.जमीन नोंदीच्या संगणकीकरणाची स्थितीराज्य नोंदी % पूर्णओदिशा 45,24,000 100कर्नाटक 69,77,000 99.99तेलंगणा 52,49,000 99.44मध्य प्रदेश 75,60,000 99.21झारखंड 23,04,000 99.12महाराष्ट्र 1,18,71,000 98.83प. बंगाल 69,69,000 98.10आंध्र प्रदेश 75,50,000 97.16राजस्थान 47,48,000 96.86गुजरात 36,34,000 96.41पंजाब 3,61,000 93.63उत्तराखंड 8,08,000 93.58सिक्कीम 57,000 93.29हरियाणा 11,17,000 92.93

टॅग्स :FarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदी