शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
3
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
4
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
5
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
6
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
7
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
8
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
9
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
10
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
11
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
12
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
13
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
14
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
15
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
16
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
17
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
18
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
19
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
20
'हिरव्या पतंगाचा मांजा भगवा तर धनुष्याचा बाण हिरवा, भाजपा, शिंदेसेना आणि MIM एकच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

याच खटल्याने केली भारतीय राज्यघटनेची चाैकट बुलंद; जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 08:33 IST

सर्वोच्च न्यायालयाने १३ न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन केले. या खंडपीठाने बहुमताने ‘राज्यघटनेची मूलभूत संरचना’(बेसिक स्ट्रक्चर) संसदेस बदलता येणार नाही, असा निर्णय दिला.

मुंबई : भारतीय लोकशाहीच्या इतिहासात राज्यघटनेचे सर्वोच्च स्थान आणि तिच्या मूलभूत संरचनेला अढळ स्थान प्राप्त करून देणारा निकाल म्हणून १९७२ सालच्या केशवानंद भारती खटल्याची सुवर्णाक्षराने नोंद झाली. या खटल्याच्या निकालाने भारतीय लोकशाहीचा आत्मा असलेल्या भारतीय संविधानाचा पाया अधिक मजबूत झाला. लोकशाही दिनाच्या पार्श्वभूमीवर त्याला थोडा उजाळा देऊया...

खटल्याची पार्श्वभूमीकेशवानंद भारती हे केरळमधील इडनीर मठाचे शंकराचार्य होते. या मठाचा थेट संबंध आद्य शंकराचार्य यांच्यापर्यंत जातो. या मठाच्या स्वमालकीच्या जमिनी होत्या. ६० च्या दशकात केरळमध्ये इ. एम. एस. नंबुद्रीपाद यांचे डावे सरकार आले होते. या सरकारने ‘अतिरिक्त जमिनींचे पुनर्वाटप’ करण्याच्या नावाखाली मठाची जमीन ताब्यात घेतली. याविरोधात केशवानंद भारती उच्च न्यायालयात गेले. परंतु तिथे निर्णय विरोधात गेल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.

सर्वोच्च न्यायालयाने १३ न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन केले. या खंडपीठाने बहुमताने ‘राज्यघटनेची मूलभूत संरचना’(बेसिक स्ट्रक्चर) संसदेस बदलता येणार नाही, असा निर्णय दिला.

प्रत्येक राज्यघटनेचा एक मूलभूत ढाचा असतो. त्याला मूलभूत संरचना म्हणतात. भारतीय घटनानिर्मितीला स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी होती. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनात घटना लिहिताना काही उदात्त हेतू होते. उदाहरणार्थ, व्यक्तीप्रतिष्ठा, समानता, पारदर्शक निवडणूक, संघ-राज्यवाद. या आणि इतर काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींना राज्यघटनेची मूलभूत संरचना म्हटले जाते. ही गोष्ट राज्यघटनेत पहिल्यापासून अंतर्भूत होती. या खटल्याने त्यासंदर्भातील स्पष्टीकरण अधिक ठळकपणे अधोरेखित झाले.

निकालाचा अन्वयार्थ...राज्यकर्त्यांकडे संसदेत कितीही बहुमत असले तरीही त्यांना राज्यघटना हवी तशी बदलता येणार नाही.भारतीय नागरिकांचे स्वातंत्र्य, मूलभूत अधिकार कुणीही हिरावून घेऊ शकत नाही.संसद सार्वभौम नसून, जनता सर्वोच्च आहे.

काही रोचक तथ्ये

हा खटला केशवानंद भारती हरले, मात्र कोट्यवधी भारतीयांचा विजय झाला.

सात विरुद्ध सहा इतक्या निसटत्या बहुमताने हा निकाल दिला गेला होता.

सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात हा खटला सलग ६८ दिवस चालला.

निकाल लिहून त्याच दिवशी तत्कालीन सरन्यायाधीश एस. एम. सिक्री निवृत्त झाले होते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय