शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

याच खटल्याने केली भारतीय राज्यघटनेची चाैकट बुलंद; जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 08:33 IST

सर्वोच्च न्यायालयाने १३ न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन केले. या खंडपीठाने बहुमताने ‘राज्यघटनेची मूलभूत संरचना’(बेसिक स्ट्रक्चर) संसदेस बदलता येणार नाही, असा निर्णय दिला.

मुंबई : भारतीय लोकशाहीच्या इतिहासात राज्यघटनेचे सर्वोच्च स्थान आणि तिच्या मूलभूत संरचनेला अढळ स्थान प्राप्त करून देणारा निकाल म्हणून १९७२ सालच्या केशवानंद भारती खटल्याची सुवर्णाक्षराने नोंद झाली. या खटल्याच्या निकालाने भारतीय लोकशाहीचा आत्मा असलेल्या भारतीय संविधानाचा पाया अधिक मजबूत झाला. लोकशाही दिनाच्या पार्श्वभूमीवर त्याला थोडा उजाळा देऊया...

खटल्याची पार्श्वभूमीकेशवानंद भारती हे केरळमधील इडनीर मठाचे शंकराचार्य होते. या मठाचा थेट संबंध आद्य शंकराचार्य यांच्यापर्यंत जातो. या मठाच्या स्वमालकीच्या जमिनी होत्या. ६० च्या दशकात केरळमध्ये इ. एम. एस. नंबुद्रीपाद यांचे डावे सरकार आले होते. या सरकारने ‘अतिरिक्त जमिनींचे पुनर्वाटप’ करण्याच्या नावाखाली मठाची जमीन ताब्यात घेतली. याविरोधात केशवानंद भारती उच्च न्यायालयात गेले. परंतु तिथे निर्णय विरोधात गेल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.

सर्वोच्च न्यायालयाने १३ न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन केले. या खंडपीठाने बहुमताने ‘राज्यघटनेची मूलभूत संरचना’(बेसिक स्ट्रक्चर) संसदेस बदलता येणार नाही, असा निर्णय दिला.

प्रत्येक राज्यघटनेचा एक मूलभूत ढाचा असतो. त्याला मूलभूत संरचना म्हणतात. भारतीय घटनानिर्मितीला स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी होती. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनात घटना लिहिताना काही उदात्त हेतू होते. उदाहरणार्थ, व्यक्तीप्रतिष्ठा, समानता, पारदर्शक निवडणूक, संघ-राज्यवाद. या आणि इतर काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींना राज्यघटनेची मूलभूत संरचना म्हटले जाते. ही गोष्ट राज्यघटनेत पहिल्यापासून अंतर्भूत होती. या खटल्याने त्यासंदर्भातील स्पष्टीकरण अधिक ठळकपणे अधोरेखित झाले.

निकालाचा अन्वयार्थ...राज्यकर्त्यांकडे संसदेत कितीही बहुमत असले तरीही त्यांना राज्यघटना हवी तशी बदलता येणार नाही.भारतीय नागरिकांचे स्वातंत्र्य, मूलभूत अधिकार कुणीही हिरावून घेऊ शकत नाही.संसद सार्वभौम नसून, जनता सर्वोच्च आहे.

काही रोचक तथ्ये

हा खटला केशवानंद भारती हरले, मात्र कोट्यवधी भारतीयांचा विजय झाला.

सात विरुद्ध सहा इतक्या निसटत्या बहुमताने हा निकाल दिला गेला होता.

सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात हा खटला सलग ६८ दिवस चालला.

निकाल लिहून त्याच दिवशी तत्कालीन सरन्यायाधीश एस. एम. सिक्री निवृत्त झाले होते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय