शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
4
"भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
5
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
6
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
7
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
8
"वडील गेल्यापासून आई गेली १२ वर्ष...", विलासराव देशमुखांच्या आठवणीत रितेश देशमुख भावुक
9
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
10
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
11
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
12
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
13
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
14
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
15
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
16
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
17
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
19
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
20
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

काश्मीर समस्येवर मोदी म्हणाले,  'गाली से ना गोली से, परिवर्तन होगा कश्मिरी को गले लगाने से' 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2017 11:38 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित करताना काश्मीर समस्येचाही मुद्दा उपस्थित केला.

नवी दिल्ली, दि. 15 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित करताना काश्मीर समस्येचाही मुद्दा उपस्थित केला. 'दहशतवाद्यांविरोधात कोणतीही नरमाईची भूमिका स्वीकारणार नाही. काश्मीरमध्ये जे काही होत आहे त्याबाबत बोलताना मोदी म्हणाले की,  'गाली से ना गोली से', 'परिवर्तन होगा हर कश्मिरी को गले लगाने से', अशी भूमिका मोदींनी काश्मीरबाबत मांडली.

गोळीबार हा काश्मीर समस्येवर उपाय नाही, असे यावेळी मोदींनी सांगितले. जम्मू काश्मीरचा विकास, सामान्य नागरिकांची स्वप्नं पूर्ण करण्याचा संकल्प आहे. शिवाय,  दहशतवादाविरोधात जगातील अनेक देशांची भारताला मदत असल्याचेही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

आणखी बातम्या वाचा

(#IndependenceDay - मोदींनी केलं आतापर्यंतचं सर्वात छोटं भाषण)

(लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला 'न्यू इंडिया'चा नारा)

दरम्यान,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलेले भाषण चार वर्षातील सर्वात छोटं भाषण होतं. पंतप्रधान मोदी यांनी 'मन की बात' मध्ये बोलताना स्वातंत्र्यदिनाची भाषणं खूप मोठी असल्याची तक्रार करणारी पत्रं मिळाल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर जुलै महिन्यात 'मन की बात'मध्ये बोलताना यावेळी स्वातंत्र्यदिनी होणारं भाषण छोटं असेल असं आश्वासन त्यांनी दिलं होतं. त्यानुसार मोदींनी थोडक्यात भाषण आटोपतं घेतलं. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी 54 मिनिटं भाषण केलं. 2014 मध्ये पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतल्यानंतरच हे त्यांचं सर्वात छोटं भाषण होतं. 2014 मध्ये 65 मिनिटं, 2015 मध्ये 86 मिनिटं आणि 2016 मध्ये 94 मिनिटांचं भाषण मोदींनी केलं होतं.  पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही लाल किल्ल्यावरुन सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वातंत्र्य दिनाच्या या शुभप्रसंगी देशवासियांना कोटी-कोटी शुभेच्छा. संपूर्ण देश आज स्वातंत्र्य दिनासोबत जन्माष्टमीचाही उत्सव साजरा करत आहे. सुदर्शन चक्राधारी मोहनपासून ते चरखाधारी मोहनपर्यंतचा वारसा आपल्याला लाभला आहे.  देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाच्या गौरवासाठी हजारो लोकांनी बलिदान दिलं, यातना-दु:ख सोसले, त्या सर्व वीरांना सव्वाकोटी देशवासियांतर्फे नमन करतो, असेही उद्गार यावेळी पंतप्रधान मोदींनी काढले. 

विकासाच्या शर्यतीत आपण सर्व एकत्रितरित्या पुढे जाण्यासाठी काम करुया.  जीएसटीमुळे देशाची कार्यक्षमता 30 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत डिजिटल देवाण-घेवाणीत 34 टक्के वाढ झाली आहे. जीएसटीमुळे वेळेसोबतच हजारो कोटीही वाचले आहेत.  देशाला ट्रॅकवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र असे करत असताना गती कमी होऊ देणार नाही, असे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले. हा देश बुद्धांचा आहे, गांधीचा आहे, येथे  आस्थेच्या नावाखाली होणारा हिंसाचार खपवून घेणार नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कट्टरतावाद्यांना खडसावले आहे. 

सरकारमध्ये डाळ खरेदी करण्याची प्रथा कधीच नव्हती,यावर्षी 16 लाख टन डाळ खरेदी केली. सरकारनं शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं आणि 16 लाख टन डाळ खरेदी करुन इतिहास रचला असंही मोदींनी सांगितलं आहे. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसNarendra Modiनरेंद्र मोदी