शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
7
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
8
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
9
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
10
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
11
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
12
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
13
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
14
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
15
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
16
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
17
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
18
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
19
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
20
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?

संविधानाच्या रक्षणासाठी कारसेवकांवर गोळ्या झाडल्या; सपा नेते शिवपाल यादवांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 16:37 IST

२२ जानेवारी हा राजकीय सोहळा आहे. विरोधी पक्षांनी तिथे जायला नको. २२ जानेवारीनंतर आम्ही अयोध्येत जाऊन रामाचे दर्शन घेऊ. आम्हीही प्रभू रामाला मानतो असं शिवपाल यादव यांनी सांगितले.

इटावा - समाजवादी पक्षाचे महासचिव स्वामी प्रसाद मौर्य यांच्यानंतर आणखी एक मोठे नेते शिवपाल यादव यांनी अयोध्येत कारसेवकांवर झालेला गोळीबार योग्य होता असं म्हटलं आहे. तत्कालीन मुलायम सिंह यादव यांच्या सरकारने संविधानाच्या रक्षणासाठी कारसेवकांवर गोळ्या झाडल्या. कोर्टाने अयोध्येत जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतु त्याचे उल्लंघन कारसेवकांकडून झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती असं शिवपाल यादव यांनी सांगितले. 

शिवपाल यादव म्हणाले की, संविधानाचे रक्षण केले गेले होते. कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्यात आले. भाजपाचे लोक खोटं बोलत आहेत. कोर्टाने स्थगिती दिलेली असतानाही वादग्रस्त ढाचा या लोकांनी तोडला. अशावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्याची जबाबदारी सरकारची होती. त्याकाळी कुणी संविधान आणि कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केले होते? कोर्टाच्याविरोधात जाणार त्यांच्यावर कारवाई होणारच असं सांगत त्यांनी २२ जानेवारी हा राजकीय सोहळा आहे. विरोधी पक्षांनी तिथे जायला नको. २२ जानेवारीनंतर आम्ही अयोध्येत जाऊन रामाचे दर्शन घेऊ. आम्हीही प्रभू रामाला मानतो. जितके देव आहेत सगळ्यांना मानतो असं त्यांनी सांगितले. 

याआधीही स्वामी प्रसाद मौर्य यांनीही एका विधानात कारसेवकांना समाजकंटक म्हटलं होते. ज्यावेळी अयोध्येत राम मंदिराची घटना घडली त्यावेळी तिथे प्रशासन आणि न्यायव्यवस्थेच्या आदेशाचे उल्लंघन करत समाजकंटकांनी तोडफोड केली. तत्कालीन सरकारने संविधान आणि कायद्याचे रक्षण केले. या सर्व गोंधळात गोळीबार करावा लागला होता. हे सरकारचे कर्तव्य होते आणि त्यांनी त्याचे पालन केले असं स्वामी प्रसाद मौर्य यांनी म्हटलं. 

अयोध्येत १९९० मध्ये काय घडलं होते?३३ वर्षापूर्वी १९९० मध्ये अयोध्येतील हनुमान गढीला जाणाऱ्या कारसेवकांवर गोळीबार करण्यात आला. त्यावेळी उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे सरकार होते. तेव्हा मुलायम सिंह यादव हे मुख्यमंत्री होते. अयोध्येला हिंदू साधू संत, कारसेवक मोठ्या प्रमाणात जमले होते. प्रशासनाने अयोध्येत कर्फ्यू लावला होता. त्यामुळे आलेल्या भाविकांना प्रवेश दिला जात नव्हता. पोलिसांनी बाबरी मशिदीच्या १.५ किमी परिसरात बॅरिकेड्स लावले होते. मात्र या गर्दीवर नियंत्रण मिळवणे त्यांना शक्य झाले नाही. या गोंधळात पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात ५ कारसेवकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अयोध्येसह देशातील वातावरण तापलं होते. या गोळीबारानंतर हजारो कारसेवक हनुमान गढीला पोहचले होते. या घटनेच्या २ वर्षानंतर विवादीत ढाचा पाडण्यात आला होता. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरSamajwadi Partyसमाजवादी पार्टीAyodhyaअयोध्याMulayam Singh Yadavमुलायम सिंह यादव