शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

संविधानाच्या रक्षणासाठी कारसेवकांवर गोळ्या झाडल्या; सपा नेते शिवपाल यादवांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 16:37 IST

२२ जानेवारी हा राजकीय सोहळा आहे. विरोधी पक्षांनी तिथे जायला नको. २२ जानेवारीनंतर आम्ही अयोध्येत जाऊन रामाचे दर्शन घेऊ. आम्हीही प्रभू रामाला मानतो असं शिवपाल यादव यांनी सांगितले.

इटावा - समाजवादी पक्षाचे महासचिव स्वामी प्रसाद मौर्य यांच्यानंतर आणखी एक मोठे नेते शिवपाल यादव यांनी अयोध्येत कारसेवकांवर झालेला गोळीबार योग्य होता असं म्हटलं आहे. तत्कालीन मुलायम सिंह यादव यांच्या सरकारने संविधानाच्या रक्षणासाठी कारसेवकांवर गोळ्या झाडल्या. कोर्टाने अयोध्येत जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतु त्याचे उल्लंघन कारसेवकांकडून झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती असं शिवपाल यादव यांनी सांगितले. 

शिवपाल यादव म्हणाले की, संविधानाचे रक्षण केले गेले होते. कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्यात आले. भाजपाचे लोक खोटं बोलत आहेत. कोर्टाने स्थगिती दिलेली असतानाही वादग्रस्त ढाचा या लोकांनी तोडला. अशावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्याची जबाबदारी सरकारची होती. त्याकाळी कुणी संविधान आणि कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केले होते? कोर्टाच्याविरोधात जाणार त्यांच्यावर कारवाई होणारच असं सांगत त्यांनी २२ जानेवारी हा राजकीय सोहळा आहे. विरोधी पक्षांनी तिथे जायला नको. २२ जानेवारीनंतर आम्ही अयोध्येत जाऊन रामाचे दर्शन घेऊ. आम्हीही प्रभू रामाला मानतो. जितके देव आहेत सगळ्यांना मानतो असं त्यांनी सांगितले. 

याआधीही स्वामी प्रसाद मौर्य यांनीही एका विधानात कारसेवकांना समाजकंटक म्हटलं होते. ज्यावेळी अयोध्येत राम मंदिराची घटना घडली त्यावेळी तिथे प्रशासन आणि न्यायव्यवस्थेच्या आदेशाचे उल्लंघन करत समाजकंटकांनी तोडफोड केली. तत्कालीन सरकारने संविधान आणि कायद्याचे रक्षण केले. या सर्व गोंधळात गोळीबार करावा लागला होता. हे सरकारचे कर्तव्य होते आणि त्यांनी त्याचे पालन केले असं स्वामी प्रसाद मौर्य यांनी म्हटलं. 

अयोध्येत १९९० मध्ये काय घडलं होते?३३ वर्षापूर्वी १९९० मध्ये अयोध्येतील हनुमान गढीला जाणाऱ्या कारसेवकांवर गोळीबार करण्यात आला. त्यावेळी उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे सरकार होते. तेव्हा मुलायम सिंह यादव हे मुख्यमंत्री होते. अयोध्येला हिंदू साधू संत, कारसेवक मोठ्या प्रमाणात जमले होते. प्रशासनाने अयोध्येत कर्फ्यू लावला होता. त्यामुळे आलेल्या भाविकांना प्रवेश दिला जात नव्हता. पोलिसांनी बाबरी मशिदीच्या १.५ किमी परिसरात बॅरिकेड्स लावले होते. मात्र या गर्दीवर नियंत्रण मिळवणे त्यांना शक्य झाले नाही. या गोंधळात पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात ५ कारसेवकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अयोध्येसह देशातील वातावरण तापलं होते. या गोळीबारानंतर हजारो कारसेवक हनुमान गढीला पोहचले होते. या घटनेच्या २ वर्षानंतर विवादीत ढाचा पाडण्यात आला होता. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरSamajwadi Partyसमाजवादी पार्टीAyodhyaअयोध्याMulayam Singh Yadavमुलायम सिंह यादव