शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

संविधानाच्या रक्षणासाठी कारसेवकांवर गोळ्या झाडल्या; सपा नेते शिवपाल यादवांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 16:37 IST

२२ जानेवारी हा राजकीय सोहळा आहे. विरोधी पक्षांनी तिथे जायला नको. २२ जानेवारीनंतर आम्ही अयोध्येत जाऊन रामाचे दर्शन घेऊ. आम्हीही प्रभू रामाला मानतो असं शिवपाल यादव यांनी सांगितले.

इटावा - समाजवादी पक्षाचे महासचिव स्वामी प्रसाद मौर्य यांच्यानंतर आणखी एक मोठे नेते शिवपाल यादव यांनी अयोध्येत कारसेवकांवर झालेला गोळीबार योग्य होता असं म्हटलं आहे. तत्कालीन मुलायम सिंह यादव यांच्या सरकारने संविधानाच्या रक्षणासाठी कारसेवकांवर गोळ्या झाडल्या. कोर्टाने अयोध्येत जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतु त्याचे उल्लंघन कारसेवकांकडून झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती असं शिवपाल यादव यांनी सांगितले. 

शिवपाल यादव म्हणाले की, संविधानाचे रक्षण केले गेले होते. कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्यात आले. भाजपाचे लोक खोटं बोलत आहेत. कोर्टाने स्थगिती दिलेली असतानाही वादग्रस्त ढाचा या लोकांनी तोडला. अशावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्याची जबाबदारी सरकारची होती. त्याकाळी कुणी संविधान आणि कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केले होते? कोर्टाच्याविरोधात जाणार त्यांच्यावर कारवाई होणारच असं सांगत त्यांनी २२ जानेवारी हा राजकीय सोहळा आहे. विरोधी पक्षांनी तिथे जायला नको. २२ जानेवारीनंतर आम्ही अयोध्येत जाऊन रामाचे दर्शन घेऊ. आम्हीही प्रभू रामाला मानतो. जितके देव आहेत सगळ्यांना मानतो असं त्यांनी सांगितले. 

याआधीही स्वामी प्रसाद मौर्य यांनीही एका विधानात कारसेवकांना समाजकंटक म्हटलं होते. ज्यावेळी अयोध्येत राम मंदिराची घटना घडली त्यावेळी तिथे प्रशासन आणि न्यायव्यवस्थेच्या आदेशाचे उल्लंघन करत समाजकंटकांनी तोडफोड केली. तत्कालीन सरकारने संविधान आणि कायद्याचे रक्षण केले. या सर्व गोंधळात गोळीबार करावा लागला होता. हे सरकारचे कर्तव्य होते आणि त्यांनी त्याचे पालन केले असं स्वामी प्रसाद मौर्य यांनी म्हटलं. 

अयोध्येत १९९० मध्ये काय घडलं होते?३३ वर्षापूर्वी १९९० मध्ये अयोध्येतील हनुमान गढीला जाणाऱ्या कारसेवकांवर गोळीबार करण्यात आला. त्यावेळी उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे सरकार होते. तेव्हा मुलायम सिंह यादव हे मुख्यमंत्री होते. अयोध्येला हिंदू साधू संत, कारसेवक मोठ्या प्रमाणात जमले होते. प्रशासनाने अयोध्येत कर्फ्यू लावला होता. त्यामुळे आलेल्या भाविकांना प्रवेश दिला जात नव्हता. पोलिसांनी बाबरी मशिदीच्या १.५ किमी परिसरात बॅरिकेड्स लावले होते. मात्र या गर्दीवर नियंत्रण मिळवणे त्यांना शक्य झाले नाही. या गोंधळात पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात ५ कारसेवकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अयोध्येसह देशातील वातावरण तापलं होते. या गोळीबारानंतर हजारो कारसेवक हनुमान गढीला पोहचले होते. या घटनेच्या २ वर्षानंतर विवादीत ढाचा पाडण्यात आला होता. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरSamajwadi Partyसमाजवादी पार्टीAyodhyaअयोध्याMulayam Singh Yadavमुलायम सिंह यादव