शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

“सर्प महादेवांच्या गळ्यातील शोभा, देशाची जनता माझ्यासाठी ईश्वराचे रुप, शिव स्वरुप”: PM मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 14:35 IST

Karnataka Assembly Election 2023: पंतप्रधान मोदींनी कर्नाटकात एका सभेला संबोधित करताना काँग्रेस आणि जेडीएसवर जोरदार हल्लाबोल केला.

Karnataka Assembly Election 2023: १० मे रोजी होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपचे अनेक नेते, मंत्री कर्नाटकात ठाण मांडून बसले असून, पंतप्रधान मोदींपासून (PM Narendra Modi) ते अनेक राज्याचे मुख्यमंत्री कर्नाटकात प्रचारसभांचा धुरळा उडवताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेला संबोधित करताना पुन्हा एकदा काँग्रेस आणि जेडीएसवर जोरदार हल्लाबोल केला. आताच्या घडीला काँग्रेस आणि भाजपमध्ये सापावरून एकमेकांवर टीका-प्रत्युत्तर रंगताना दिसत आहे. 

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विषारी साप असल्याची टीका केल्यानंतर भाजप नेत्यांकडून काँग्रेसवर जोरदार पलटवार करण्यात येत आहे. खुद्द पंतप्रधान मोदी यांनी आता प्रचारसभेला संबोधित करताना काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. मोदीजी, तुमची कबर खोदली जाईल, अशी टीका करणारे आता माझी तुलना सापाशी करत जनतेकडून मते मागत आहेत. साप हे भगवान शंकराच्या गळ्याची शोभा आहे. माझ्यासाठी देशातील जनता हे देवाचे रूप आहे, शिवाचेच रूप आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले आहे. 

काँग्रेस आणि जेडीएस कर्नाटकातील विकासात मोठा अडथळा

एवढ्या मोठ्या संख्येने जनता सभांना उपस्थित राहत असल्याचे पाहून काँग्रेस आणि जेडीएसची झोप उडाली आहे. कर्नाटकाच्या विकासात काँग्रेस आणि जेडीएसचा मोठा अडथळा आहे. काँग्रेस आणि जेडीएस कितीही खेळ खेळू द्यात, पण कर्नाटकची जनता त्यांना क्लीन बोल्ड करून टाकेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. तसेच कर्नाटकची ही निवडणूक केवळ आगामी पाच वर्षांसाठी आमदार, मंत्री किंवा मुख्यमंत्री बनवण्यासाठी नाही, तर ही निवडणूक येत्या २५ वर्षांच्या विकसित भारताच्या रोडमॅपचा पाया मजबूत करण्यासाठी आहे. एवढ्या मोठ्या व्हिजनवर अस्थिर सरकार कधीच काम करू शकत नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

दरम्यान, कर्नाटकला भारतातील क्रमांक एकचे राज्य बनवण्याचा भाजपचा संकल्प आहे, त्यामुळे येथे डबल इंजिनचे सरकार आवश्यक आहे. जोपर्यंत येथे काँग्रेस-जेडीएस युती राहिली, तोपर्यंत कर्नाटकच्या विकासाला ब्रेक लागला. जेव्हा येथे डबल इंजिनचे सरकार आले, तेव्हा येथील विकासाने नवी गती घेतली. काँग्रेस सरकारने शेतकर्‍यांची कधीच पर्वा केली नाही, मात्र भाजप सरकार शेतकर्‍यांसाठी बियाण्यापासून मार्केटपर्यंत काम करत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा