शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता; आता 'या' मोठ्या नेत्यानं दिली समज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 21:00 IST

"उत्तर भारतातील लोकांप्रती गांधी कुटुंबाच्या मनात हीन भावना आहे, तर मग हे लोक उत्तर भारतात राजकारण का करतात. राहुल गांधी ज्या उत्तर भारताचा अपमाण करत आहेत. त्याच भागातून त्यांची आई सोनिया गांधी खासदार आहे. राहुल गांधींचे वक्तव्य माफी लायक नाही."

नवी दिल्ली -राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) एका वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये पुन्हा अस्वस्थता निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल (Kapil sibbal) यांनी राहुल गांधींना त्यांच्या या वक्तव्यावरून समज अथवा सल्ला दिला आहे. राहुल गांधी यांना सल्ला देताना सिब्बल म्हणले, सर्व मतदारांचा सन्मान करायला हवा. मग तो उत्तेरेतील असो किंवा दक्षिनेतील, मतदार हे समजदार असतात. त्यांना त्यांच्या अधिकारांची जाण असते. कुणाला मतदान करायचे आणि कुणाला करायचे नाही, हे त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक असते. मगतो दक्षिणेकडील राज्यांतील मतदार असो किंवा उत्तरेकडील राज्यांतील मतदार असो अथवा पश्चिम बंगालमधील असो किंवा इतर कुठल्याही भागातील असो. (Kapil sibbal advices to Rahul Gandhi over his statement says voters should respected)

भाजपचाही निशाणा - राहुल गांधी यांच्या त्रिवेंद्रममधील या वक्तव्यावरून भाजपनेही निशाणा साधला होता. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती ईरानी यांनी गांधी कुटुंबावर निशाना साधताना उत्तर भारतातील लोकांप्रती गांधी कुटुंबाच्या मनात हीन भावना आहे, तर मग हे लोक उत्तर भारतात राजकारण का करतात. राहुल गांधी ज्या उत्तर भारताचा अपमाण करत आहेत. त्याच भागातून त्यांची आई सोनिया गांधी खासदार आहे. राहुल गांधींचे वक्तव्य माफी लायक नाही. एवढेच नाही, तर  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीदेखील राहुल गांधींवर निशाणा साधला. "सनातन आस्थेच्या केरळपासून प्रभू श्रीरामांच्या जन्मस्थळ असलेल्या उत्तर प्रदेशपर्यंत सर्व लोकांनी तुम्हाला ओळखले आहे. तोडण्याचे राजकारण हे तुमचे संस्कार आहेत. आम्ही उत्तर किंवा दक्षिण नाही, तर संपूर्ण देशालाच मातेसमान मानतो," असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. 

राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपचा हल्लाबोल; स्मृती इराणी म्हणाल्या, "कृतघ्न..."

काँग्रेसचे स्पष्टीकरण -काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी निवेदन जारी करत म्हटले आहे, की राहुल गांधींनी केलेले वक्तव्य हा त्यांचा वैयक्तीक अनुभव आहे. राहुल गांधींनी भारतातील कुठलेही राज्य अथवा लोकांचा अनादर केलेला नाही. 

काय म्हणाले होते राहुल गांधी - "गेल्या 15 वर्षांपर्यंत मी उत्तर भारतात खासदार होतो. मला एका वेगळ्या प्रकारच्या राजकारणाची सवय झाली होती. माझ्यासाठी केरळमध्ये येणे नवे होते. कारण मला वाटले इथल्या लोकांना मुद्द्यांमध्ये आवड असते आणि ते मुद्द्यांच्या विस्तारात जाणारे आहेत," असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते.

"तुम्हाला गर्लफ्रेंड आहे का?"; मुलीने विचारलेल्या बेधडक प्रश्नावर राहुल गांधी म्हणतात...

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसkapil sibalकपिल सिब्बलSmriti Iraniस्मृती इराणीyogi adityanathयोगी आदित्यनाथKeralaकेरळ