शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता; आता 'या' मोठ्या नेत्यानं दिली समज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 21:00 IST

"उत्तर भारतातील लोकांप्रती गांधी कुटुंबाच्या मनात हीन भावना आहे, तर मग हे लोक उत्तर भारतात राजकारण का करतात. राहुल गांधी ज्या उत्तर भारताचा अपमाण करत आहेत. त्याच भागातून त्यांची आई सोनिया गांधी खासदार आहे. राहुल गांधींचे वक्तव्य माफी लायक नाही."

नवी दिल्ली -राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) एका वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये पुन्हा अस्वस्थता निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल (Kapil sibbal) यांनी राहुल गांधींना त्यांच्या या वक्तव्यावरून समज अथवा सल्ला दिला आहे. राहुल गांधी यांना सल्ला देताना सिब्बल म्हणले, सर्व मतदारांचा सन्मान करायला हवा. मग तो उत्तेरेतील असो किंवा दक्षिनेतील, मतदार हे समजदार असतात. त्यांना त्यांच्या अधिकारांची जाण असते. कुणाला मतदान करायचे आणि कुणाला करायचे नाही, हे त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक असते. मगतो दक्षिणेकडील राज्यांतील मतदार असो किंवा उत्तरेकडील राज्यांतील मतदार असो अथवा पश्चिम बंगालमधील असो किंवा इतर कुठल्याही भागातील असो. (Kapil sibbal advices to Rahul Gandhi over his statement says voters should respected)

भाजपचाही निशाणा - राहुल गांधी यांच्या त्रिवेंद्रममधील या वक्तव्यावरून भाजपनेही निशाणा साधला होता. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती ईरानी यांनी गांधी कुटुंबावर निशाना साधताना उत्तर भारतातील लोकांप्रती गांधी कुटुंबाच्या मनात हीन भावना आहे, तर मग हे लोक उत्तर भारतात राजकारण का करतात. राहुल गांधी ज्या उत्तर भारताचा अपमाण करत आहेत. त्याच भागातून त्यांची आई सोनिया गांधी खासदार आहे. राहुल गांधींचे वक्तव्य माफी लायक नाही. एवढेच नाही, तर  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीदेखील राहुल गांधींवर निशाणा साधला. "सनातन आस्थेच्या केरळपासून प्रभू श्रीरामांच्या जन्मस्थळ असलेल्या उत्तर प्रदेशपर्यंत सर्व लोकांनी तुम्हाला ओळखले आहे. तोडण्याचे राजकारण हे तुमचे संस्कार आहेत. आम्ही उत्तर किंवा दक्षिण नाही, तर संपूर्ण देशालाच मातेसमान मानतो," असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. 

राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपचा हल्लाबोल; स्मृती इराणी म्हणाल्या, "कृतघ्न..."

काँग्रेसचे स्पष्टीकरण -काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी निवेदन जारी करत म्हटले आहे, की राहुल गांधींनी केलेले वक्तव्य हा त्यांचा वैयक्तीक अनुभव आहे. राहुल गांधींनी भारतातील कुठलेही राज्य अथवा लोकांचा अनादर केलेला नाही. 

काय म्हणाले होते राहुल गांधी - "गेल्या 15 वर्षांपर्यंत मी उत्तर भारतात खासदार होतो. मला एका वेगळ्या प्रकारच्या राजकारणाची सवय झाली होती. माझ्यासाठी केरळमध्ये येणे नवे होते. कारण मला वाटले इथल्या लोकांना मुद्द्यांमध्ये आवड असते आणि ते मुद्द्यांच्या विस्तारात जाणारे आहेत," असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते.

"तुम्हाला गर्लफ्रेंड आहे का?"; मुलीने विचारलेल्या बेधडक प्रश्नावर राहुल गांधी म्हणतात...

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसkapil sibalकपिल सिब्बलSmriti Iraniस्मृती इराणीyogi adityanathयोगी आदित्यनाथKeralaकेरळ