जालौन - कोरोनाच्या संकटात देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. उत्तर प्रदेशातील जालौनमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. पतीने माहेरी जाण्यापासून रोखलं, जाऊ दिलं नाही म्हणून महिलेने आपल्या दोन मुलींची हत्या केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. चिमुकलींची गळा दाबून हत्या केल्यानंतर महिलेने स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उरईच्या छिरावली गावात ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे. पतीने माहेरी जाण्यापासून रोखलं म्हणून महिलेने आपल्या चार वर्षीय आणि दहा महिलांच्या मुलींची गळा दाबून हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तिला अटक करण्यात आली आहे. तसेच दोन्ही मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
महिलेचा पती महेंद्र अहिरवार याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पत्नी प्रमिला देवी हिने रागाच्या भरात आपल्या चार वर्षांच्या माही आणि अवघ्या दहा महिन्यांच्या रोशनी या दोघींची गळा दाबून हत्या केली आहे. त्यानंतर प्रमिलाने आपले डोके भिंतीवर आपटून आत्महत्येचा प्रयत्न केला आणि त्यानंत स्वत: ही आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पत्नीला माहेरी जायचे होते. दोन दिवसांपूर्वी माहेरी जाण्यावरून तिच्यासोबत वाद झाला होता. त्यामुळे तिने रागाच्या भरात मुलींची हत्या केल्याची माहिती महेंद्र याने दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
काही महिन्यांपूर्वी केरळच्या कन्नूरमध्ये ही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली होती. जन्मदात्या आईनेच आपल्या दीड वर्षाच्या मुलाची निर्घृणपणे हत्या केली. याप्रकरणी 22 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली असून चौकशीदरम्यान तिने मुलाची हत्या केल्याची कबुली दिली. मिळालेल्या माहितीनुसार, सरन्या असं महिलेचं नाव असून तिने अनैतिक संबंध लपवण्यासाठी मुलाची खडकावर डोकं आपटून हत्या केली आणि नंतर मुलाचा मृतदेह समुद्रात फेकून दिला. सुमद्र किनाऱ्यावर चिमुकल्याचा मृतदेह आढळल्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली होती.
महत्त्वाच्या बातम्या
सुशांतला मानाचा पुरस्कार; दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलमध्ये सन्मान
'निवडणुकीत माझा पराभव झाल्यास अमेरिकेवर चीनचा ताबा', ट्रम्प यांचं मोठं विधान
CoronaVirus News : भारताकडे कधी असणार कोरोना लस आणि किंमत किती?, रिसर्चमधून आली आनंदाची बातमी
"कोरोना चाचण्या वाढू नयेत यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचा दबाव", आरोग्यमंत्र्यांचा आरोप