शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

CoronaVirus: व्वा...! भाजप आमदाराची धाव; 3 मजली घराला कोवीड रुग्णालय बनविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 20:56 IST

त्यांच्या या 34 रूम आणि 5 हॉल असलेल्या तीन मजली घरात 113 बेड बसू शकतात...

कानपूर - संपूर्ण देशातच कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्येही कोरोना संक्रमण वाढताना दिसत आहे. येथे लोकांना रुग्णालयांत बेड मिळणेही कठीण होत आहे. अशा भयावह स्थितीत भाजप आमदार सुरेंद्र मैथानी यांनी आपले घर कोरोना संक्रमितांसाठी निःशुल्क देण्याचा निर्णय घेतला आहे. (kanpur BJP MLA Surendra Maithani writes letter to DM for his house to convert temporary corona hospital)

यासंदर्भात मैथानी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून आपल्या घराचे कोरोना संक्रिमितांसाठी क्वारंटाइन सेंटर अथवा अस्थाई स्वरुपाच्या रुग्णालय रुपांतर करण्यात यावे, असे म्हटले आहे. याच बरोबर, त्यांच्या या तीन मजली घरात 113 बेड बसू शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे.

मैथानीही झाले होते कोरोना संक्रमित -यापूर्वी भाजप आमदार सुरेंद्र मैथानी यांनी शहरातील भाजपच्या सर्व 9 आमदारांनी एक-एक कोटी रुपयांचा निधी शहरात कोरोना रुग्णालयाला द्यावा, यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. सुरेंद्र मैथानी यांनी म्हटले आहे, की त्यांनाही गत वेळी कोरोना संक्रमण झाले होते. साडे तीन महिन्यांच्या उपचारानंतर ते बरे झाले होते. ते म्हणाले, शहरात असे अनेक कुटुंब आहेत, जे एकाच खोलीत राहतात. अशा स्थितीत कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली, तर सर्वांनाच संक्रमण होणे निश्चित आहे.

Covid-19 second wave: हार्ट अ‍ॅटॅकमुळे का होतोय कोरोना बाधितांचा मृत्यू? जाणून घ्या, लक्षणं आणि उपचार

प्रशासनाच्या चमूने सर्व्हेही केला - सुरेंद्र मैथानी यांनी म्हटले आहे, की ''अशा स्थितीमुळेच मी माझे घर कोरोना संक्रमितांना राहण्यासाठी दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर, पत्र लिहून आपले 34 रूम आणि 5 हॉल असलेले घर जिल्हा प्रशासनाला देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या चमूने त्यांच्या घराचा सर्व्हेही केला आहे. याच बरोबर, या आणीबाणीच्या स्थितीत सर्व राजकीय पक्षाच्या लोकांनी राजकारण बाजूला सारून लोकांच्या मदतीसाठी समोर यायला हवे,'' असेही मैथानी यांनी म्हटले आहे.

गेल्या 24 तासांत देशात 3,780 जणांचा कोरोनाने मृत्यू -गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 3,82,315 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,780 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 2,06,65,148 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 2,26,188 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. बुधवारी (5 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3 लाख 82 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल दोन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा दोन लाखांवर पोहोचला आहे. 

CoronaVirus: चिंताजनक! भारतात मे नंतर आणखी हाहाकार माजवणार कोरोना, वैज्ञानिकांचा दावा!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाMLAआमदारUttar Pradeshउत्तर प्रदेश