शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

कौतुकास्पद! १० वचनं, हुंड्यात ११ हजार रोपं; बैलगाडीतून वधूची पाठवणी, लग्नाचा अनोखा आदर्श

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 11:34 IST

लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर लिहिलेल्या १० वचनांची लोकांमध्ये तुफान चर्चा रंगली आहे.

उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या रईसपुर गावातील सुरविंदर किसान याचं लग्न सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेचा विषय बनलं आहे. त्याच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर लिहिलेल्या १० वचनांची लोकांमध्ये तुफान चर्चा रंगली. पारंपारिक लग्नांच्या तुलनेत या लग्नात अनेक अनोख्या गोष्टी आहेत, ज्या समाजात बदल आणि साधेपणाचा संदेश देतात. त्यामुळे या लग्नाने लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

बैलगाडीतून वधूची पाठवणी

लग्न म्हटलं की मोठा खर्च, धामधूम आणि जय्यत तयारी ही आलीच. पण हल्ली काही लोकांचा साधेपणात लग्न करण्याकडे कल असतो. कमी पाहुणे आणि साध्या पद्धतीत लग्न केल्याने अनावश्यक खर्चही टाळता येतो. याच दरम्यान सुरविंदरने त्याचं लग्न साधेपणाने करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला होता. या अनोख्या लग्नात मुलीच्या कुटुंबाकडून हुंडा दिला जात आहे पण तो खूपच हटके आहे. 

हुंड्यात ११ हजार रोपं

हुंडा म्हणून तब्बल ११ हजार रोपं घेतली जात आहेत. हा उपक्रम पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने एक चांगलं पाऊल आहे. तसेच नववधूची बैलगाडीतून पाठवणी करण्यात येणार आहे, ज्यामुळे हे लग्न आणखी खास होणार आहे. सुरविंदरने त्याच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेत १० वचनं दिली आहेत, ज्यातून समाजसेवा आणि पर्यावरण संरक्षणाप्रती त्याची वचनबद्धता आणि जागरुकता दिसून येते.

लग्नात ब्लड डोनेशन कँप

लग्नादरम्यान ब्लड डोनेशन कँपचं आयोजन करण्यात आलं होतं. सुरविंदर म्हणाला की, या उपक्रमाचं उद्दिष्ट हे समाजात सकारात्मक बदल घडवून आणणं आहे. त्याचा असा विश्वास आहे की हे पाऊल केवळ समाजाला सक्षम बनवणार नाही तर तरुणांनाही प्रेरणा देईल. हे लग्न साधेपणाने करण्याचे आणि अनावश्यक खर्च टाळण्याचे एक उदाहरण आहे, जे सध्याच्या काळात खूप महत्त्वाचं आहे. या अनोख्या लग्नाने केवळ गाझियाबादमध्येच नव्हे तर संपूर्ण देशात साधेपणा, पर्यावरण संरक्षण आणि समाजसेवेचा संदेश दिला आहे.

टॅग्स :marriageलग्न