शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

कौतुकास्पद! १० वचनं, हुंड्यात ११ हजार रोपं; बैलगाडीतून वधूची पाठवणी, लग्नाचा अनोखा आदर्श

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 11:34 IST

लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर लिहिलेल्या १० वचनांची लोकांमध्ये तुफान चर्चा रंगली आहे.

उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या रईसपुर गावातील सुरविंदर किसान याचं लग्न सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेचा विषय बनलं आहे. त्याच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर लिहिलेल्या १० वचनांची लोकांमध्ये तुफान चर्चा रंगली. पारंपारिक लग्नांच्या तुलनेत या लग्नात अनेक अनोख्या गोष्टी आहेत, ज्या समाजात बदल आणि साधेपणाचा संदेश देतात. त्यामुळे या लग्नाने लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

बैलगाडीतून वधूची पाठवणी

लग्न म्हटलं की मोठा खर्च, धामधूम आणि जय्यत तयारी ही आलीच. पण हल्ली काही लोकांचा साधेपणात लग्न करण्याकडे कल असतो. कमी पाहुणे आणि साध्या पद्धतीत लग्न केल्याने अनावश्यक खर्चही टाळता येतो. याच दरम्यान सुरविंदरने त्याचं लग्न साधेपणाने करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला होता. या अनोख्या लग्नात मुलीच्या कुटुंबाकडून हुंडा दिला जात आहे पण तो खूपच हटके आहे. 

हुंड्यात ११ हजार रोपं

हुंडा म्हणून तब्बल ११ हजार रोपं घेतली जात आहेत. हा उपक्रम पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने एक चांगलं पाऊल आहे. तसेच नववधूची बैलगाडीतून पाठवणी करण्यात येणार आहे, ज्यामुळे हे लग्न आणखी खास होणार आहे. सुरविंदरने त्याच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेत १० वचनं दिली आहेत, ज्यातून समाजसेवा आणि पर्यावरण संरक्षणाप्रती त्याची वचनबद्धता आणि जागरुकता दिसून येते.

लग्नात ब्लड डोनेशन कँप

लग्नादरम्यान ब्लड डोनेशन कँपचं आयोजन करण्यात आलं होतं. सुरविंदर म्हणाला की, या उपक्रमाचं उद्दिष्ट हे समाजात सकारात्मक बदल घडवून आणणं आहे. त्याचा असा विश्वास आहे की हे पाऊल केवळ समाजाला सक्षम बनवणार नाही तर तरुणांनाही प्रेरणा देईल. हे लग्न साधेपणाने करण्याचे आणि अनावश्यक खर्च टाळण्याचे एक उदाहरण आहे, जे सध्याच्या काळात खूप महत्त्वाचं आहे. या अनोख्या लग्नाने केवळ गाझियाबादमध्येच नव्हे तर संपूर्ण देशात साधेपणा, पर्यावरण संरक्षण आणि समाजसेवेचा संदेश दिला आहे.

टॅग्स :marriageलग्न