शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेसला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 14:44 IST

काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. मध्य प्रदेशमधील शेतकरी कर्जमाफीवरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना देण्यात आलेलं कर्जमाफीचं आश्वासन पूर्णपणे पूर्ण झालेलं नाही असं म्हटलं आहे.

नवी दिल्ली - महाराष्ट्र व हरियाणा या दोन प्रमुख राज्यांमध्ये विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना काँग्रेसवर आपल्याच नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या विविध वक्तव्यांचा सामना करण्याची वेळ आली आहे. काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज असल्याचं म्हटल्यानंतर आता मध्य प्रदेशमधील शेतकरी कर्जमाफीवरून त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 

ज्योतिरादित्य शिंदे यांनी मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना देण्यात आलेलं कर्जमाफीचं आश्वासन पूर्णपणे पूर्ण झालेलं नाही असं म्हटलं आहे. 'शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ झाले पाहिजे. शेतकऱ्यांचे कर्ज पूर्णपणे माफ केले गेले नाही. केवळ 50 हजार रुपयांपर्यंतचेच कर्ज माफ केले गेले आहे, मात्र आपण दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे दोन लाखांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले पाहिजे' असं शिंदे यांनी म्हटलं आहे. 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर पक्षावरील संकट आणखी वाढले असून आमचे नेते सोडून गेले हीच पक्षासमोरील मोठी समस्या असल्याचे म्हटल्यानंतर आता काँग्रेसचे दुसरे ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनीही काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज असल्याचे म्हणत घरचा आहेर दिला आहे. 

मला कोणाच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया द्यायची नाही, मात्र काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज आहे, यात कुठलीच शंका नाही, असे ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आलेल्या अपयशानंतर ज्योतिरादित्य शिंदे पक्षातील अंतर्गत मतभेदांवरून नाराज असल्याचे अनेकदा दिसून आले होते. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी देखील सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता.

सलमान खुर्शीद यांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवातून पक्ष अद्याप बाहेर पडला नसल्याचे एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. खुर्शीद म्हणाले होते की, आम्ही पराभवाचे एकत्रित विश्लेषण करू शकलो नाही. पक्षातील ज्येष्ठ नेते पक्षापासून दूर गेले हे आमच्यासमोरील मोठं संकट आहे. राहुल गांधी यांच्यावर आताही पक्षाचा विश्वास आहे. या घडामोडी घडत असतानाच महाराष्ट्रातही काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी पक्षातील मतभेदांबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. निवडणूक प्रचारापासून निरुपम यांनी स्वत:ला दूरच ठेवले आहे. आपली नाराजी त्यांनी उघडपणे बोलून दाखवली होती. तिकडे हरयाणामध्येही चित्र असेच आहे. अनेक वर्षे सक्रियपणे काम केलेल्या अनेक नेत्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेशFarmerशेतकरीRahul Gandhiराहुल गांधी