शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेसला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 2:36 PM

काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. मध्य प्रदेशमधील शेतकरी कर्जमाफीवरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना देण्यात आलेलं कर्जमाफीचं आश्वासन पूर्णपणे पूर्ण झालेलं नाही असं म्हटलं आहे.

नवी दिल्ली - महाराष्ट्र व हरियाणा या दोन प्रमुख राज्यांमध्ये विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना काँग्रेसवर आपल्याच नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या विविध वक्तव्यांचा सामना करण्याची वेळ आली आहे. काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज असल्याचं म्हटल्यानंतर आता मध्य प्रदेशमधील शेतकरी कर्जमाफीवरून त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 

ज्योतिरादित्य शिंदे यांनी मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना देण्यात आलेलं कर्जमाफीचं आश्वासन पूर्णपणे पूर्ण झालेलं नाही असं म्हटलं आहे. 'शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ झाले पाहिजे. शेतकऱ्यांचे कर्ज पूर्णपणे माफ केले गेले नाही. केवळ 50 हजार रुपयांपर्यंतचेच कर्ज माफ केले गेले आहे, मात्र आपण दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे दोन लाखांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले पाहिजे' असं शिंदे यांनी म्हटलं आहे. 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर पक्षावरील संकट आणखी वाढले असून आमचे नेते सोडून गेले हीच पक्षासमोरील मोठी समस्या असल्याचे म्हटल्यानंतर आता काँग्रेसचे दुसरे ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनीही काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज असल्याचे म्हणत घरचा आहेर दिला आहे. 

मला कोणाच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया द्यायची नाही, मात्र काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज आहे, यात कुठलीच शंका नाही, असे ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आलेल्या अपयशानंतर ज्योतिरादित्य शिंदे पक्षातील अंतर्गत मतभेदांवरून नाराज असल्याचे अनेकदा दिसून आले होते. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी देखील सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता.

सलमान खुर्शीद यांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवातून पक्ष अद्याप बाहेर पडला नसल्याचे एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. खुर्शीद म्हणाले होते की, आम्ही पराभवाचे एकत्रित विश्लेषण करू शकलो नाही. पक्षातील ज्येष्ठ नेते पक्षापासून दूर गेले हे आमच्यासमोरील मोठं संकट आहे. राहुल गांधी यांच्यावर आताही पक्षाचा विश्वास आहे. या घडामोडी घडत असतानाच महाराष्ट्रातही काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी पक्षातील मतभेदांबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. निवडणूक प्रचारापासून निरुपम यांनी स्वत:ला दूरच ठेवले आहे. आपली नाराजी त्यांनी उघडपणे बोलून दाखवली होती. तिकडे हरयाणामध्येही चित्र असेच आहे. अनेक वर्षे सक्रियपणे काम केलेल्या अनेक नेत्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेशFarmerशेतकरीRahul Gandhiराहुल गांधी