शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

न्यायालय राजकीय पक्षांना उत्तर देण्यास बांधील नाही; चीफ जस्टीस यांनी सुनावले खडे बोल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2022 6:26 PM

"राजकीय पक्षांना वाटते की न्यायव्यवस्थेने त्यांच्या कृतींचे समर्थन केले पाहिजे. पण..."

CJI N V Ramana: देशात सध्या सुरू असलेल्या परिस्थितीवरून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी राजकीय पक्षांना खडे बोल सुनावले. राजकीय पक्षांना वाटते की न्यायव्यवस्थेने त्यांच्या कृतींचे समर्थन केले पाहिजे. पण आम्ही राज्यघटने प्रति बांधील आहोत. न्यायपालिका ही एक स्वतंत्र संस्था आहे, आमची जबाबदारी केवळ संविधानाप्रति बांधिलकी राखणे आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा विचारसरणीला उत्तर देण्यास न्यायालय बांधील नाही, अशा अतिशय स्पष्ट शब्दांत सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी राजकीय पक्षांना सुनावले.

अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को कॅलिफोर्निया येथे असोसिएशन ऑफ इंडो-अमेरिकनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात CJI यांनी याबाबत सांगितले. ते म्हणाले की, भारत देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७५व्या वर्षे झाली आहेत. आपल्या प्रजासत्ताकालाही ७२ वर्षे पूर्ण झाली आहेत. पण मला खेदपूर्वक म्हणावे लागेल की, घटनेने प्रत्येक संस्थेला नेमून दिलेल्या भूमिका आणि जबाबदाऱ्यांचे पूर्ण कौतुक करायला आपण अजूनही शिकलेलो नाही. सरकारच्या प्रत्येक कामाला न्यायालयीन पाठिंबा मिळायला हवा, असे सत्तेत असलेल्या पक्षाला वाटते. न्यायपालिकेने त्यांची राजकीय स्थिती आणि कारणे पुढे करावीत अशी विरोधी पक्षांची अपेक्षा आहे.

राजकीय पक्षाची भूमिका समजून घेण्याची विचार प्रक्रिया संविधान आणि लोकशाहीच्या आकलनाच्या अभावामुळे उद्भवते. सामान्य जनतेमध्ये पसरलेले अज्ञान हेच ​​अशा विचारसरणीला मदत करते. न्यायव्यवस्था ही स्वतंत्र आहे. त्यामुळे न्यायपालिका ही संविधानाला उत्तर देण्यास बांधील आहे. भारतातील घटनात्मक संस्कृती आपण पुढे नेण्याची गरज आहे. अमेरिकन समाजाचा सहिष्णू आणि सर्वसमावेशक स्वभाव आहे. तो जगभरातील सर्वोत्कृष्ट प्रतिभावंतांना आकर्षित करतो. त्यामुळे त्यांच्या विकासाला हातभार लागतो, असेही CJI यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा