शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

मोदी आणि गायीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; झारखंडमधून एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2017 9:22 AM

व्हॉट्सअॅप व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गायीबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे एका तरूणाला अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमोदी आणि गायीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; झारखंडमधून एकाला अटकझारखंडमधील हजारीबाग पोलिसांनी एका २५ वर्षाच्या तरूणाला अटक केली आहे. मोहम्मद आरिफ असं अटक करण्यात आलेल्या तरूणाचं नाव आहे

नवी दिल्ली, दि.26- व्हॉट्सअॅप व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गायीबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे एका तरूणाला अटक करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गायीविरोधात आक्षेपार्ह भाषेचा उपयोग करून व्हिडीओ तयार केल्याप्रकरणी झारखंडमधील हजारीबाग पोलिसांनी एका २५ वर्षाच्या तरूणाला अटक केली आहे. त्या तरूणाने तयार केलला व्हिडीओ सध्या व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला होता. मोहम्मद आरिफ असं अटक करण्यात आलेल्या तरूणाचं नाव आहे. त्याला सोमवारी अटक करण्यात आली असून मंगळवारी त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, हजारीबागचे पोलीस अधीक्षक अनुप बिरथारे यांनी ही माहिती दिली आहे. हिंदुस्तान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे. 

जून ते जुलै या एका महिन्यात झालेलं हे दुसरं प्रकरण आहे. दोन्ही घटनांमध्ये मुस्लिम व्यक्तीने पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्यामुळे त्यांना तुरूंगात पाठवण्यात आलं आहे. याआधी २३ जून रोजी साहिबगंज पोलिसांनी २० वर्षीय समीर अन्सारीला अटक केली होती. त्याने एका व्हिडीओत मोदी आणि भारताविरोधात घोषणाबाजी केल्यामुळे त्या तरूणाला अटक करण्यात आली होती.  समीर अन्सारीने तयार केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. विेशेष म्हणजे झारखंडमध्ये भाजपची सत्ता असल्याने मोदींविरोधात झालेली आक्षेपार्ह वक्तव्य चर्चेचा विषय होतो आहे. 

आरिफ हा मोटारसायकल मॅकेनिक असून त्याला रांचीपासून ९५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हजारीबाग इथून अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. व्हिडीओतील चिथावणीखोर वक्तव्यं काढून टाकण्यात आली आहेत. सोशल मीडियावर जातीयवादी हिंसाचार पसरवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडे दुर्लक्ष केलं जाणार नसून त्यांना कठोर शिक्षा दिली जाइल, असं पोलीस अधीक्षक बिरथारे यांनी म्हंटलं आहे. 

या व्हिडीओमध्ये आरिफने गायींचा अपमान केला असून सर्वांसमोर गाय कापण्याची धमकी दिली होती. त्याने स्वत: हा व्हिडीओ बनवला होता आणि व्हॉट्सअपवर व्हायरल केला होता. सोशल मीडियावर सामाजिक तेढ निर्माण करणारे व्हिडिओ पसरवल्याच्या आरोपाखाली हजारीबागमधूनच यावर्षी आतापर्यंत जवळपास ११ जणांना तुरूंगात टाकण्यात आलं आहे. गेल्या एक महिन्यात झारखंडमध्ये किमान ५ जातीयवादी दंगली घडल्याचं समोर आलं आहे. त्यामुळेच झारखंड सरकारने राज्यातील सर्व २४ जिल्ह्यांमध्ये जातीयवादी संवेदनशील गोष्टी सोशल मीडियावर टाकण्यास बंदी घातली आहे.