शहरं
Join us  
Trending Stories
1
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
2
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
3
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
4
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
5
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
6
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
7
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
8
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
9
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
10
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
11
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
12
सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!
13
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
14
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
15
संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
16
'द केरला स्टोरी' फेम अदा शर्माचं खरं नाव माहितीये? वेगळं नाव का वापरावं लागलं? म्हणाली...
17
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...
18
IAS Pawan Kumar : आईने विकले दागिने, वडिलांनी मजुरी करून शिकवलं; लेकाने IAS होऊन कष्टाचं सोनं केलं
19
एका घोटाळ्यामुळे ११७ वर्षांचा इतिहास संपुष्टात! 'हा' शेअर बाजार कायमचा बंद होणार; सेबीची विक्रीला मंजुरी
20
फक्त टार्गेट वाढतं, पगार नाही; कर्मचाऱ्याचा राजीनामा होतोय तुफान व्हायरल, कंपनी म्हणते...

झारखंडमध्ये विरोधी पक्षातील सहा आमदारांचा भाजपात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 15:03 IST

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीआधी विरोधी पक्षांमधील सहा आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे.

रांची - झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीआधी विरोधी पक्षांमधील सहा आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. बुधवारी (23 ऑक्टोबर) सहा आमदारांनी भाजपात प्रवेश केल्याची माहिती मिळत आहे. रांचीचे मुख्यमंत्री रघुबर दास यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षाच्या सहा आमदारांनी भाजपाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी काँग्रेस अध्यक्ष सुखदेव भगत यांच्यासह मनोज यादव (काँग्रेस), कुणाल सारंगी (जेएमएम), जेपी भाई पटेल (जेएमएम), चमरा लिंडा (जेएमएम) आणि भानु प्रताप शाही (नौजवान संघर्ष मोर्चा) यांनी भाजपात प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीआधी विरोधी पक्षाला यामुळे झटका बसला आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुखदेव भगत आणि मनोज यादव आधीपासूनच भाजपाच्या रडारवर होते. भगत हे काँग्रेसचे विद्यमान पीसीसी प्रमुख रामेश्वर उरांव यांच्यावर नाराज होते. लोकसभा निवडणुकीत पक्षाला पराभव पत्करावा लागल्यामुळेच ते उरांव यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती. 

महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा एकाच वेळी होईल, अशी शक्यता वाटत होती. मात्र झारखंडमधील निवडणूक ऑक्टोबरमध्ये जाहीर केली जाईल आणि नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे. झारखंड विधानसभेचा कार्यकाळ 5 जानेवारी 2020 पर्यंत आहे. 81 जागांसाठी या राज्यात निवडणूक होते. भाजपला 2014 मध्ये 37 जागा मिळाल्या होत्या. तसेच झाविमोचे 6 आमदार भाजपमध्ये गेले होते. झारखंड मुक्ती मोर्चाला 19 जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसला 7 जागा मिळाल्या होत्या. झारखंड विकास मोर्चाला 8 जागा मिळाल्या होत्या. मात्र, त्यातील 6 जणांनी भाजपला पाठिंबा दिल्याने केवळ दोनच जागा त्यांच्याकडे राहिल्या होत्या. भाजपाचे अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी झारखंडचा दौरा केला होता. 

सन 2000 मध्ये 15 नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी झारखंडची स्थापना झाली. पहिल्या मुख्यमंत्र्यापासून आदिवासी समाजाला प्राधान्य दिल्याचे दिसते. सध्याचे झारखंड विकास मोर्चाचे सर्वेसर्वा पहिले मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी हे तेव्हा भाजपाचे मोठे नेते मानले जात होते. त्यानंतर अर्जुन मुंडा, शिबू सोरेन, मधू कोडा आणि हेमंत सोरेन हेदेखील मुख्यमंत्री राहिलेले आहेत. भाजपच्या बहुमतावर सरकार चालवणारे सध्याचे मुख्यमंत्री रघुबर दास हे पहिले बिगर आदिवासी आहेत.

 

टॅग्स :JharkhandझारखंडBJPभाजपाcongressकाँग्रेस