शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

झारखंडमध्ये विरोधी पक्षातील सहा आमदारांचा भाजपात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 15:03 IST

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीआधी विरोधी पक्षांमधील सहा आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे.

रांची - झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीआधी विरोधी पक्षांमधील सहा आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. बुधवारी (23 ऑक्टोबर) सहा आमदारांनी भाजपात प्रवेश केल्याची माहिती मिळत आहे. रांचीचे मुख्यमंत्री रघुबर दास यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षाच्या सहा आमदारांनी भाजपाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी काँग्रेस अध्यक्ष सुखदेव भगत यांच्यासह मनोज यादव (काँग्रेस), कुणाल सारंगी (जेएमएम), जेपी भाई पटेल (जेएमएम), चमरा लिंडा (जेएमएम) आणि भानु प्रताप शाही (नौजवान संघर्ष मोर्चा) यांनी भाजपात प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीआधी विरोधी पक्षाला यामुळे झटका बसला आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुखदेव भगत आणि मनोज यादव आधीपासूनच भाजपाच्या रडारवर होते. भगत हे काँग्रेसचे विद्यमान पीसीसी प्रमुख रामेश्वर उरांव यांच्यावर नाराज होते. लोकसभा निवडणुकीत पक्षाला पराभव पत्करावा लागल्यामुळेच ते उरांव यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती. 

महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा एकाच वेळी होईल, अशी शक्यता वाटत होती. मात्र झारखंडमधील निवडणूक ऑक्टोबरमध्ये जाहीर केली जाईल आणि नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे. झारखंड विधानसभेचा कार्यकाळ 5 जानेवारी 2020 पर्यंत आहे. 81 जागांसाठी या राज्यात निवडणूक होते. भाजपला 2014 मध्ये 37 जागा मिळाल्या होत्या. तसेच झाविमोचे 6 आमदार भाजपमध्ये गेले होते. झारखंड मुक्ती मोर्चाला 19 जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसला 7 जागा मिळाल्या होत्या. झारखंड विकास मोर्चाला 8 जागा मिळाल्या होत्या. मात्र, त्यातील 6 जणांनी भाजपला पाठिंबा दिल्याने केवळ दोनच जागा त्यांच्याकडे राहिल्या होत्या. भाजपाचे अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी झारखंडचा दौरा केला होता. 

सन 2000 मध्ये 15 नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी झारखंडची स्थापना झाली. पहिल्या मुख्यमंत्र्यापासून आदिवासी समाजाला प्राधान्य दिल्याचे दिसते. सध्याचे झारखंड विकास मोर्चाचे सर्वेसर्वा पहिले मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी हे तेव्हा भाजपाचे मोठे नेते मानले जात होते. त्यानंतर अर्जुन मुंडा, शिबू सोरेन, मधू कोडा आणि हेमंत सोरेन हेदेखील मुख्यमंत्री राहिलेले आहेत. भाजपच्या बहुमतावर सरकार चालवणारे सध्याचे मुख्यमंत्री रघुबर दास हे पहिले बिगर आदिवासी आहेत.

 

टॅग्स :JharkhandझारखंडBJPभाजपाcongressकाँग्रेस