शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

झारखंडमध्ये विरोधी पक्षातील सहा आमदारांचा भाजपात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 15:03 IST

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीआधी विरोधी पक्षांमधील सहा आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे.

रांची - झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीआधी विरोधी पक्षांमधील सहा आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. बुधवारी (23 ऑक्टोबर) सहा आमदारांनी भाजपात प्रवेश केल्याची माहिती मिळत आहे. रांचीचे मुख्यमंत्री रघुबर दास यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षाच्या सहा आमदारांनी भाजपाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी काँग्रेस अध्यक्ष सुखदेव भगत यांच्यासह मनोज यादव (काँग्रेस), कुणाल सारंगी (जेएमएम), जेपी भाई पटेल (जेएमएम), चमरा लिंडा (जेएमएम) आणि भानु प्रताप शाही (नौजवान संघर्ष मोर्चा) यांनी भाजपात प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीआधी विरोधी पक्षाला यामुळे झटका बसला आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुखदेव भगत आणि मनोज यादव आधीपासूनच भाजपाच्या रडारवर होते. भगत हे काँग्रेसचे विद्यमान पीसीसी प्रमुख रामेश्वर उरांव यांच्यावर नाराज होते. लोकसभा निवडणुकीत पक्षाला पराभव पत्करावा लागल्यामुळेच ते उरांव यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती. 

महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा एकाच वेळी होईल, अशी शक्यता वाटत होती. मात्र झारखंडमधील निवडणूक ऑक्टोबरमध्ये जाहीर केली जाईल आणि नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे. झारखंड विधानसभेचा कार्यकाळ 5 जानेवारी 2020 पर्यंत आहे. 81 जागांसाठी या राज्यात निवडणूक होते. भाजपला 2014 मध्ये 37 जागा मिळाल्या होत्या. तसेच झाविमोचे 6 आमदार भाजपमध्ये गेले होते. झारखंड मुक्ती मोर्चाला 19 जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसला 7 जागा मिळाल्या होत्या. झारखंड विकास मोर्चाला 8 जागा मिळाल्या होत्या. मात्र, त्यातील 6 जणांनी भाजपला पाठिंबा दिल्याने केवळ दोनच जागा त्यांच्याकडे राहिल्या होत्या. भाजपाचे अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी झारखंडचा दौरा केला होता. 

सन 2000 मध्ये 15 नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी झारखंडची स्थापना झाली. पहिल्या मुख्यमंत्र्यापासून आदिवासी समाजाला प्राधान्य दिल्याचे दिसते. सध्याचे झारखंड विकास मोर्चाचे सर्वेसर्वा पहिले मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी हे तेव्हा भाजपाचे मोठे नेते मानले जात होते. त्यानंतर अर्जुन मुंडा, शिबू सोरेन, मधू कोडा आणि हेमंत सोरेन हेदेखील मुख्यमंत्री राहिलेले आहेत. भाजपच्या बहुमतावर सरकार चालवणारे सध्याचे मुख्यमंत्री रघुबर दास हे पहिले बिगर आदिवासी आहेत.

 

टॅग्स :JharkhandझारखंडBJPभाजपाcongressकाँग्रेस