शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

PM Narendra Modi : जेडीयू-टीडीपी की भाजप, कोणाला मिळणार लोकसभा अध्यक्षपद? नेमकी चर्चा कोणाची

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 16:23 IST

PM Narendra Modi : काल एनडीए'ने केंद्रात सरकार स्थापन केले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ७२ खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

PM Narendra Modi ( Marathi News ) :  लोकसभा निवडणुकीत एनडीए'ला बहुमत मिळाले. काल नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. या निवडणुकीत इंडिया आघाडीनेही चांगली कामगिरी केली. काँग्रेसने ९९ जागांवर विजय मिळवला. एनडीए'चे सरकार स्थापन करण्यासाठी टीडीपी आणि जेडीयू या दोन्ही पक्षांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. यामुळे या दोन्ही पक्षांना महत्वाची पद दिली जातील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. दरम्यान, सध्या लोकसभा अध्यक्षपद कोणत्या पक्षाला मिळणार या चर्चा सुरू आहेत.

या सरकारमध्ये किंगमेकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पक्ष टीडीपी आणि जेडीयू या दोन्ही पक्षांनी भाजपकडे लोकसभेच्या अध्यक्षपदाची मागणी केल्याचे बोलले जात आहे. तर, दुसरीकडे लोकसभेचे अध्यक्षपद दुसऱ्या कोणत्याही पक्षाला भाजप द्यायला तयार नसल्याचे बोलले जात आहे. 

टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू आणि जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार या दोन्ही नेत्यांची लोकसभा अध्यक्षपदाकडे लक्ष आहे. गेल्या काही वर्षांत सत्ताधारी पक्षांतर्गत बंडखोरीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत, त्यामुळे पक्षांतर्गत फूट पडली आहे आणि अनेक ठिकाणी राज्य सरकारेही पडली आहेत, यामुळे लोकसभा अध्यक्षपद महत्वाचे मानले जाते. 

२८ वर्षांनी पुन्हा नायडूच किंगमेकर! 'त्या' वेळी देवेगौडा-गुजराल यांना बनवलं होतं PM

दरम्यान, पक्ष फूटीमध्ये किंवा सदस्यांच्या फुटीमध्ये पक्षांतर विरोधी कायदा लागू होतो आणि हा कायदा सभागृहाच्या अध्यक्षांना जास्त आहे. कायद्यानुसार, पक्षांतराच्या कारणास्तव सदस्यांना अपात्र ठरवण्यासंबंधीच्या प्रकरणांवर निर्णय घेण्याचा अधिकार सभागृहाच्या अध्यक्षांना आहे. त्यामुळे या पदावर दोन्ही नेत्यांचे डोळे लागले आहेत.

लोकसभेचे अध्यक्षपद का महत्वाचे ?

लोकसभेचे अध्यक्षपद हे खूपच गुंतागुंतीचे असते, सभागृह चालवण्यासाठी सभापती पद हे पक्षविरहित मानले जाते, पण निवडणूक जिंकल्यानंतर फक्त एका विशिष्ट पक्षाच्या प्रतिनिधीकडेच हे पद असते. अध्यक्षांना सभागृहामध्ये अनेक अधिकार असतात, यामुळे सरकार टीकवण्यात या पदाचा महत्वाचा वाटा असतो. 

नेहरुंप्रमाणेच मोदीही तिसऱ्यांदा पंतप्रधान

लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालात भारतीय जनता पक्षाने २४० जागा जिंकल्या आहेत आणि एनडीएने २९३ जागा जिंकल्या आहेत. तर तेलुगू देसम पक्षाने १६ तर जनता दल युनायटेडने (जेडीयू) १२ जागा जिंकल्या आहेत. पंडित जवाहरलाल नेहरूंप्रमाणेच नरेंद्र मोदीही सलग तीन वेळा सार्वत्रिक निवडणुका जिंकून तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले आहेत. नरेंद्र मोदींसोबत भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अमित शहा, जेपी नड्डा, एस जयशंकर आणि शिवराज सिंह चौहान यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूNitish Kumarनितीश कुमार