शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

जदयू आमदारांचा नितीश कुमारांना घरचा आहेर; तेजस्वी यादवांचे केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 11:17 AM

राजदनेते तेजस्वी यादव लवकरच युवकांच्या बेरोजगारीचा मुद्दा घेऊन बिहारमध्ये यात्रा कऱणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या बसची व्यवस्था करण्यात आली आहे. 

नवी दिल्ली - बिहारमध्ये जनता दल युनायटेडच्या  आमदाराने आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे. बिहारमधील सरकार बेरोजगारी हटविण्यासाठी काहीही काम करत नसल्याचा आरोप आमदार अमरनाथ गामी यांनी केला आहे. बिहारमध्ये नोकऱ्या नाही. त्यामुळेच लोक बिहार सोडून जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर दुसऱ्या आमदाराने राष्ट्रीय जनता दलचे नेते तेजस्वी यादव यांनी बेरोजगारीविरुद्ध सुरू केलेल्या यात्रेचे कौतुक केले आहे.

बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. अन्यथा लोक बिहार सोडून गेले नसते. तेजस्वी यादव बेरोजगारी हटाव यात्रा काढत आहेत. मात्र त्यामुळे फारसा फायदा होणार नाही. केंद्र सरकारच्या मदतीशिवाय बेरोजगारी हटविणे सोपे नाही. बिहारमधील कोणत्याच सरकारने बेरोजगारी समोर ठेवून काम केले नसल्याचे गामी यांनी सांगितले आहे.

याव्यतिरिक्त जदयूचे आमदार जावेद इकबाल अन्सारी यांनी देखील सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, मागील 10-15 वर्षांपासून बेरोजगारीमुळे बिहारमधून अनेकजन पलायन करत आहेत. विरोधी पक्षांकडून 'बेरोजगारी हटाव' यात्रा काढण्यात येत आहे. लोक कामासाठी दुसऱ्या राज्यात जात आहेत. तिथे त्यांना अपमान सहन करावा लागतो. त्यामुळे युवकांच्या प्रश्नावर मैदानात उतरणाऱ्यांचे कौतुकच करायला हवे, असं सांगताना त्यांनी राजदच्या यात्रेचे समर्थन केले आहे.

राजदनेते तेजस्वी यादव लवकरच युवकांच्या बेरोजगारीचा मुद्दा घेऊन बिहारमध्ये यात्रा कऱणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या बसची व्यवस्था करण्यात आली आहे.