शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

सॅल्युट ! घरासमोर मांडव सजला, सनई चौघडे वाजू लागले, तरीही 'तो' सीमारेषेवरच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 6:04 PM

मंडी येथील रहिवासी असलेल्या सुनिलचे गुरुवारी लग्न होणार होते.

श्रीनगर - सैन्यातील जवानांना कुटुंबापासून दूर रहावे लागते. देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात जवानांना कधी-कधी घरच्यांना बोलायलाही मिळत नाही. मात्र, सैन्यातील एका जवानाला त्याच्या लग्नादिवशीही कर्तव्य बजावावे लागल्याची घटना उघडकीस आली आहे. देशसेवेसाठी त्याग आणि समर्पण हे जवानांच्या रक्तातच भिनलेल असतं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

हिमाचलच्या मंडी येथील मूळ रहिवासी असलेला हा जवान काश्मीरमधील मोठ्या बर्फवृष्टीमुळे तेथून बाहेरच पडू शकला नाही. टाईम्स ऑफ इंडियाच्या वर्तमानपत्रातील बातमी ट्विट करत भारतीय सैन्याच्या जवानांच्या त्याग अन् समर्पणाचं वर्णन केलंय. आधी लगीन कोंढण्याचं म्हणणाऱ्या तानाजीचीच आठवण ही बातमी वाचून झाल्याशिवाय राहणार नाही. सैन्य दलानेही ट्विटरवरुन अशीच प्रतिकिया देत, सैन्यातील जवानांसाठी देश सर्वप्रथम नंतर जीवन त्याची वाट बघेल, असे म्हटले आहे. 

मंडी येथील रहिवासी असलेल्या सुनिलचे गुरुवारी लग्न होणार होते. मात्र, गेल्या 2 आठवड्यांपासून सुरु असलेल्या बर्फवृष्टीमुळे तो काश्मीरमध्येच अडकून पडला. सुनिलच्या लग्नाची सर्व तयारी झाली होती, बुधवारी रितीरिवाजाप्रमाणे सगळे कार्यक्रमही पार पडले. आता, गुरुवारी लडभडोल येथील एका गावासाठी त्याची वरातही निघणार होती. दोन्ही कुटुंबीयांनी आपल्या घराची मोठी सजावट केली होती. सनई-चौघडे वाजत होते, संगीत अन् नातेवाईकांची धूम होती. विशेष म्हणजे 1 जानेवारीपासून सुनिलच्या सुट्ट्याही सुरू झाल्या होत्या. त्यामुळे, बांदीपोरा येथील ट्रांजिट कॅम्पवर तो पोहोचला होता. मात्र, खराब हवामानामुळे सर्वच रस्ते बंद होते. विमानही उड्डाण करू शकत नव्हते. त्यामुळे सुनिलने फोनवरुनच कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि आपण लग्नाला येऊ शकत नसल्याचे सांगितले. सुनिलच्या फोनमुळे दोन्ही कुटुंबीयांची निराशा झाली पण, देशसेवा बजावणाऱ्या सुनिलचा आम्हाला गर्व असल्याचं त्याच्या कुटुंबीयांनी म्हटलं.     

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानmarriageलग्नJammu Kashmirजम्मू-काश्मीरSnowfallबर्फवृष्टी