शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

Jammu and Kashmir: 'कुणाशी चर्चा करायची?, पाकधार्जिण्यांशी का?; अमित शहांचा सुप्रिया सुळेंना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 18:59 IST

Jammu and Kashmir: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं सुप्रिया सुळे यांच्यासह सर्व विरोधकांना सडेतोड उत्तर

ठळक मुद्देकलम 370 हटवण्याआधी केंद्र सरकारने कुणाशीही चर्चा केली नाही, असा आक्षेप विरोधी पक्षांकडून घेतला जातोय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सडेतोड उत्तर दिलं.  काश्मीर खोऱ्यातील जनतेशी संवाद साधण्यास आम्ही तयार आहोत, हुर्रियत नेत्यांशी चर्चा करणार नाही.

जम्मू-काश्मीरचा स्वायत्त राज्याचा दर्जा रद्द करण्यासारखा मोठा निर्णय घेण्याआधी, कलम ३७० मधील तरतुदी हटवण्याआधी आणि जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचनेचं पाऊल उचलण्याआधी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कुणाशीही चर्चा केली नाही, असा आक्षेप विरोधी पक्षांकडून घेतला जातोय. हा लादलेला निर्णय आहे, घटनाबाह्य आहे, अशी टीका केली जातेय. आज लोकसभेतील चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेकांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सडेतोड उत्तर दिलं.  

'काश्मीर प्रश्नावर गेली ७० वर्षं चर्चाच सुरू आहे की! तीन पिढ्या येऊन गेल्या इथे, पण मार्ग निघाला नाही. जे पाकिस्तानकडून प्रेरणा घेतात त्यांच्याशी आम्ही चर्चा करणं अपेक्षित आहे का?', असा थेट सवाल करत, आम्ही हुर्रियत नेत्यांशी चर्चा करणार नाही, असं अमित शहा यांनी ठणकावून सांगितलं. काश्मीर खोऱ्यातील जनतेशी संवाद साधण्यास आम्ही तयार आहोत, त्यांचं समाधान होईपर्यंत आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. ते आमच्यासाठी विशेष आहेत, त्यांना हृदयाशी कवटाळू. जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी जे करावं लागेल ते करू. त्यांनी १०० मागितले, तर ११० देऊ. मोदींचं मन मोठं आहे. त्यांनी आधीच्या कार्यकाळातही जम्मू-काश्मीरसाठी सव्वा लाख कोटींचं पॅकेज दिलं होतं. यावेळी त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही अमित शहा यांनी दिली. 

जम्मू-काश्मीरमधील वातावरण बिघडलंय म्हणून तिथे संचारबंदी लागू केलेली नाही, तर कुणी गैरसमज पसरवून जनतेला चिथावणी देऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून खोऱ्यात संचारबंदी लागू केलीय, असं अमित शहा यांनी स्पष्ट केलं. 

'कलम ३७०' चा वापर करून पाकिस्तानने काश्मीर खोरं सतत धुमसत ठेवलं. या देशविरोधी शक्तींना हाणून पाडण्यासाठीच या कलमातील वादग्रस्त तरतुदी हटवण्याची भूमिका मोदी सरकारने घेतली आहे, असं अमित शहा यांनी नमूद केलं. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा द्यावा, ही तिथल्या जनतेचीच मागणी होती. जम्मू-काश्मीरमधील वातावरण निवळल्यानंतर केंद्रशासित प्रदेश या दर्जाबाबत पुनर्विचार केला जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं.  

 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Article 35 Aकलम 35-एAmit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदीSupriya Suleसुप्रिया सुळे