शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

लष्कराचा दणका; काश्मीरमध्ये वर्षभरात 200 दहशतवाद्यांना कंठस्नान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 9:02 AM

लष्कर-ए-तोयबा, हिज्बुल मुजाहिद्दीन, जैश-ए-मोहम्मदचं कंबरडं मोडलं

श्रीनगर: यंदाच्या वर्षात भारतीय लष्करानं दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं आहे. भारतीय जवानांनी काल काश्मीर खोऱ्यातील केरन सेक्टरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यामुळे यंदाच्या वर्षात भारतीय लष्कराच्या कारवाईत कंठस्नान घालण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा आकडा 200 वर गेला आहे. वर्ष संपायला अद्याप दीड महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. काश्मीर खोऱ्यात भारतीय लष्कराची कारवाई सुरुच असल्यानं हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. इंडिया टुडेनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.यंदाच्या वर्षात काश्मीरमध्ये भारतीय जवानांनी दहशतवाद्यांविरोधात धडक कारवाई केली. लष्कर-ए-तोयबा, हिज्बुल मुजाहिद्दीन, जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आलं आहे. भारतीय लष्कराच्या कारवाईचा मोठा दणका जैश-ए-मोहम्मदला बसला आहे. या कारवाईत जैश-ए-मोहम्मदचे 50 टक्के दहशतवादी मारले गेले. तर हिज्बुलच्या 40 टक्क्यांहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. लष्कर-ए-तोयबालादेखील भारतीय जवानांनी दणका दिला. त्यांचे 33 टक्के दहशतवादी यंदाच्या वर्षात मारले गेले. यंदाच्या वर्षात भारतीय जवानांनी काश्मीर खोऱ्यात दुहेरी कारवाई केली. सीमेपलीकडून घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांसोबतच स्थानिक दहशतवाद्यांचंही आव्हान लष्करासमोर होतं. हे दुहेरी आव्हान लष्करानं यशस्वीपणे पेललं. 2017 मध्ये काश्मीरमध्ये लष्करानं ऑपरेशन ऑल आऊट सुरू केलं होतं. त्याच प्रकारची कारवाई लष्करानं यंदाच्या वर्षातही केली. रमजानच्या पवित्र महिन्यात मोदी सरकारनं काश्मीरमधील दहशतवाद्यांविरुद्धची कारवाई थांबवली होती. त्या काळात दहशतवाद्यांनी डोकं वर काढलं होतं. त्यामुळे सरकारवर टीकाही झाली. मात्र रमजान संपताच लष्करानं दहशतवाद्यांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानTerrorismदहशतवादJaish e Mohammadजैश ए मोहम्मदLashkar-e-taibaलष्कर-ए-तोयबाHizbul Mujahideenहिज्बुल मुजाहिद्दीन