शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

"अजून २० जागा मिळाल्या असत्या तर हे सगळे..."; मल्लिकार्जुन खरगेंनी भाजपवर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 16:28 IST

जम्मू-काश्मीरमधील सभेला संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर निशाणा साधला.

Mallikarjun Kharge : जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणुकीची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. १८ सप्टेंबर रोजी जम्मू काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यातलं मतदान पार पडणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. भाजपकडून जम्मू काश्मीरमध्ये जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसही प्रचारसभा घेत आहे. अशातच जम्मू-काश्मीरमधील सभेला संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीत आणखी २० जागा आल्या असत्या तर सगळे तुरुंगात गेले असते, असे खरगे यांनी म्हटलं. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सची आघाडी मजबूत असल्याचेही खरगेंनी म्हटलं.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये एका सभेला संबोधित भाजपवर जोरदार हल्ला चढवला. आज जम्मू-काश्मीरमध्ये ठिकठिकाणी हल्ले होत आहेत, तरीही पंतप्धान मोदी खोटे बोलायला मागे हटत नाहीत. कारण ते लबाडांचे सरदार आहेत, असे खरगे म्हणाले. धर्माच्या नावावर इथल्या जनतेत फूट पाडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, मात्र ते कधीही यशस्वी होणार नाहीत, असेही खरगेंनी यावेळी म्हटलं.

भाजपवर निशाणा साधताना खरगे यांनी ४०० पारच्या घोषणेचाही उल्लेख केला. "४०० पारची घोषणा देणारे कुठे गेले? ते २४० जागांपर्यंत थांबले आहेत. आम्हाला आणखी २० जागा मिळाल्या असत्या तर हे सर्व लोक तुरुंगात गेले असते. हे लोक तुरुंगात जाण्यास पात्र आहेत. भाजपचे लोक अनेक भाषणे देतात. पण कृती आणि शब्दात खूप फरक आहे. भाजपने कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सची युती कमकुवत होणार नाही. संसदेत आम्ही आमची ताकद दाखवून दिली आहे. आता त्याच ताकदीने आपण पुढे जाऊ," असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटलं.

"नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची युती पाहून भाजप हादरला आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरची यादी वारंवार बदलत आहे. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की इंडिया आघाडीची एकजूट पाहून भाजपचे लोक घाबरले आहेत. आता आम्ही राहुल गांधी आणि फारुख अब्दुल्ला एकत्र आलो तेव्हा भाजप आणखीनच घाबरला," असंही मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

"भाजपचे ५ लाख नोकऱ्यांचे आश्वासन हा जुमला आहे. यापूर्वीही त्यांनी असेच सांगितले होते. दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते, ते पूर्ण केले का? त्यांनी २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. आता १० वर्षे झाली तरी इथे १ लाख लोकांना भरती करू शकले नाहीत. मग ते 5 पाच लाख नोकऱ्या कशा देणार. जे खोटे बोलतात त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. मी जम्मू-काश्मीरच्या लोकांना आवाहन करतो की, जे सत्य बोलतात आणि स्वातंत्र्यापासून त्यांच्यासोबत आहेत त्यांना मतदान करा," असेही आवाहन खरगे यांनी केलं.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहBJPभाजपा