शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

"अजून २० जागा मिळाल्या असत्या तर हे सगळे..."; मल्लिकार्जुन खरगेंनी भाजपवर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 16:28 IST

जम्मू-काश्मीरमधील सभेला संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर निशाणा साधला.

Mallikarjun Kharge : जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणुकीची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. १८ सप्टेंबर रोजी जम्मू काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यातलं मतदान पार पडणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. भाजपकडून जम्मू काश्मीरमध्ये जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसही प्रचारसभा घेत आहे. अशातच जम्मू-काश्मीरमधील सभेला संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीत आणखी २० जागा आल्या असत्या तर सगळे तुरुंगात गेले असते, असे खरगे यांनी म्हटलं. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सची आघाडी मजबूत असल्याचेही खरगेंनी म्हटलं.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये एका सभेला संबोधित भाजपवर जोरदार हल्ला चढवला. आज जम्मू-काश्मीरमध्ये ठिकठिकाणी हल्ले होत आहेत, तरीही पंतप्धान मोदी खोटे बोलायला मागे हटत नाहीत. कारण ते लबाडांचे सरदार आहेत, असे खरगे म्हणाले. धर्माच्या नावावर इथल्या जनतेत फूट पाडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, मात्र ते कधीही यशस्वी होणार नाहीत, असेही खरगेंनी यावेळी म्हटलं.

भाजपवर निशाणा साधताना खरगे यांनी ४०० पारच्या घोषणेचाही उल्लेख केला. "४०० पारची घोषणा देणारे कुठे गेले? ते २४० जागांपर्यंत थांबले आहेत. आम्हाला आणखी २० जागा मिळाल्या असत्या तर हे सर्व लोक तुरुंगात गेले असते. हे लोक तुरुंगात जाण्यास पात्र आहेत. भाजपचे लोक अनेक भाषणे देतात. पण कृती आणि शब्दात खूप फरक आहे. भाजपने कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सची युती कमकुवत होणार नाही. संसदेत आम्ही आमची ताकद दाखवून दिली आहे. आता त्याच ताकदीने आपण पुढे जाऊ," असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटलं.

"नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची युती पाहून भाजप हादरला आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरची यादी वारंवार बदलत आहे. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की इंडिया आघाडीची एकजूट पाहून भाजपचे लोक घाबरले आहेत. आता आम्ही राहुल गांधी आणि फारुख अब्दुल्ला एकत्र आलो तेव्हा भाजप आणखीनच घाबरला," असंही मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

"भाजपचे ५ लाख नोकऱ्यांचे आश्वासन हा जुमला आहे. यापूर्वीही त्यांनी असेच सांगितले होते. दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते, ते पूर्ण केले का? त्यांनी २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. आता १० वर्षे झाली तरी इथे १ लाख लोकांना भरती करू शकले नाहीत. मग ते 5 पाच लाख नोकऱ्या कशा देणार. जे खोटे बोलतात त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. मी जम्मू-काश्मीरच्या लोकांना आवाहन करतो की, जे सत्य बोलतात आणि स्वातंत्र्यापासून त्यांच्यासोबत आहेत त्यांना मतदान करा," असेही आवाहन खरगे यांनी केलं.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहBJPभाजपा