शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

मोठा हलगर्जीपणा! AB+ ऐवजी O+ रक्त दिलं, रुग्णाचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 15:43 IST

सचिन शर्माचा कोटपुतली शहरात अपघात झाला, त्यात तो गंभीर जखमी झाला. यानंतर सचिनला जयपूर येथील सरकारी सवाई मानसिंह (एसएमएस) रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.

जयपूरच्या सवाई मानसिंह हॉस्पिटलमध्ये मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. याठिकाणी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी अपघातानंतर दाखल झालेल्या तरुणाला दुसऱ्या ग्रुपचं रक्त दिलं. यामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे प्रकरण उजेडात येताच सरकारने दखल घेत चौकशीचे आदेश दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, बांदीकुई शहरातील रहिवासी असलेल्या 23 वर्षीय सचिन शर्माचा कोटपुतली शहरात अपघात झाला, त्यात तो गंभीर जखमी झाला. यानंतर सचिनला जयपूर येथील सरकारी सवाई मानसिंह (एसएमएस) रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.

एसएमएस हॉस्पिटलचे अधीक्षक अचल शर्मा यांनी सांगितलं की, या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास समिती स्थापन करण्यात आली आहे. तपास अहवालानुसार कारवाई केली जाईल. या प्रकरणात एका अधिकाऱ्याने सांगितले की, चुकीच्या ग्रुपचं रक्त चढवल्यामुळे रुग्णाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आणि त्याला डायलिसिसवर ठेवण्यात आले, परंतु रुग्णाची प्रकृती अधिकच खालावली. 

या अपघातात सचिनचं खूप रक्त गेलं होतं. याबाबत डॉक्टरांनी सचिनला रक्त चढवण्यास सांगितलं. सचिनला AB पॉझिटिव्ह रक्त हवे होते, पण वॉर्डबॉयने त्याला दुसऱ्या रुग्णाच्या O पॉझिटिव्ह' रक्ताची स्लिप दिली. यानंतर जेव्हा सचिनला AB+ ऐवजी O+ रक्त देण्यात आले, तेव्हा त्याची प्रकृती अधिकच बिघडू लागली.

सवाई मानसिंह (एसएमएस) रुग्णालयाच्या ट्रॉमा वॉर्डमध्ये दाखल सचिन शर्माचा आज मृत्यू झाला. यानंतर सरकारने या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. रुग्णालयाचे अधीक्षक राजीव बगरट्टा यांनी सांगितले की, ही अत्यंत दुःखद घटना आहे. ही बाब उघडकीस आली, त्याची चौकशी करण्यासाठी आम्ही कालच एक समिती स्थापन केली. सर्व विषयांची चौकशी सुरू आहे.  

टॅग्स :Accidentअपघात