शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

जाधव यांना संपर्क का नाकारला?

By admin | Published: May 20, 2017 3:36 AM

भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना दूतावास संपर्क (काऊंसलर अ‍ॅक्सेस) का नाकारण्यात आला, असा सवाल आता पाकिस्तानातील नागरिकच उपस्थित

- लोकमत न्यूज नेटवर्क/वृत्तसंस्था

नवी दिल्ली/इस्लामाबाद : भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना दूतावास संपर्क (काऊंसलर अ‍ॅक्सेस) का नाकारण्यात आला, असा सवाल आता पाकिस्तानातील नागरिकच उपस्थित करू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर स्थगिती दिल्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानातून अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. जाधव यांच्याशी संपर्क करण्यासाठी भारताने १६ वेळा विनंती केली होती; पण पाकिस्तानने ही विनंती मान्य केली नाही. पाकिस्तानातील मानवाधिकार कार्यकर्त्या असमा जहाँगीर याबाबत बोलताना म्हणाल्या की, जाधव यांना संपर्क नाकारण्याचा सल्ला प्रथम कोणी दिला होता. भारतीय तुरुंगात असलेल्या कैद्यांचा अधिकार त्यामुळे धोक्यात येणार नाही का? आंतरराष्ट्रीय कायदा बदलता येऊ शकतो? पाकिस्तानातील एक वकील यासीर लतीफ हमदानी यांनी म्हटले आहे की, जाधव यांना सुरुवातीपासूनच दूतावास संपर्क देण्याची आवश्यकता होती. सुनावणी पूर्ण होण्याच्या आत जाधव यांना फाशी देण्यात येणार नाही, अशी हमी पाकिस्तानने न दिल्यानेच आंतरराष्ट्रीय न्यायालयाने या प्रकरणात तात्काळ सुनावणी घेतली. दूतावास संपर्क न पुरविणे हे व्हिएन्ना कराराचे उल्लंघन आहे, असेही आंतरराष्ट्रीय न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले. आईच्या अपिलावर विचार केला आहे काय?कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला आव्हान देणारे अपील जाधव यांच्या आईने केलेले आहे; पण या अपिलावर पाकिस्तानच्या सैन्य अधिकाऱ्यांनी विचार केला आहे काय? याबाबत अनिश्चितता कायम आहे. जाधव यांना शिक्षा जाहीर झाल्यानंतर त्याला आव्हान देण्यासाठी ४० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ही मुदत संपण्यास एक दिवस शिल्लक असताना हा प्रश्न उपस्थित झाला आहे. १० एप्रिल रोजी जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. भारतीय उच्चायुक्त गौतम बंबावले यांनी २६ एप्रिल रोजी पाकिस्तानच्या विदेश सचिव तेमानिया जंजुआ यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी जाधव यांच्या आईचे अपील सादर केले होते. जाधव यांना पाकिस्तानच्या सैन्य प्रमुखांकडे ६० दिवसांच्या आत दया याचिका दाखल करता येऊ शकते, तर राष्ट्रपतींकडे ९० दिवसांच्या आत दया याचिका दाखल करता येते.पाकिस्तानकडून वकिलांची नवी टीमआंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर पाकिस्तानात सरकारवर टीकेची झोड उठली आहे. त्यामुळे हा खटला लढण्यासाठी सरकार आता वकिलांची नवी टीम देणार आहे. पंतप्रधानांचे सल्लागार सरताज अजीज यांनी सांगितले की, नवी टीम पाकिस्तानची भूमिका प्रभावीपणे सादर क रील. पाकिस्तानचे माजी अ‍ॅटर्नी जनरल इरफान कादीर यांनी म्हटले आहे की, हे प्रकरण हाताळणाऱ्या वकिलांना अनुभव नाही. आम्हाला पाकिस्तानसाठी समर्पित, सशक्त टीमची आवश्यकता आहे.सेहवाग म्हणाला, ‘सत्यमेव जयते’ आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानंतर अनेक भारतीयांनी आनंदोत्सव साजरा केला. त्यात क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि मोहम्मद कैफ यांचाही समावेश होता. सेहवागने टिष्ट्वट केले आहे, ‘सत्यमेव जयते’. मोहम्मद कैफने टिष्ट्वट केले आहे ‘अभिनंदन, न्याय देण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे आभार’.विरोधकांचा शरीफ यांच्यावर हल्लाबोल जाधव प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळल्याचा आरोप करीत पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शरीफ आणि भारतीय उद्योगपती सज्जन जिंदल यांच्यात गुप्त बैठक झाली होती. आयसीजेचा निर्णय म्हणजे या बैठकीचाच परिणाम असल्याचा आरोप पाकिस्तान तहरीक-ए-इन्सानचे नेते शफाकत महेमूद यांनी केला आहे. जिंदल यांच्या पाकिस्तान दौऱ्यानंतर हा खेळ सुरू झाला असल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे.