शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

विद्यार्थ्यांच्या मृत्यूची चौकशी; केंद्रीय गृह मंत्रालयाने नेमली उच्चस्तरीय चौकशी समिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 05:20 IST

विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची नायब राज्यपालांकडून मदत जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : जोरदार पावसामुळे दिल्लीतील जुने राजेंद्रनगर येथे शनिवारी राऊ आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरून तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी लोकसभेत सर्व पक्षांनी केली. त्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय चौकशी समिती सोमवारी स्थापन केली. त्यामध्ये दिल्ली सरकारमधील प्रधान सचिव (गृहखाते), दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त, अग्निशमन सल्लागार यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणी मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत नायब राज्यपालांनी जाहीर केली आहे आहे. सोमवारी दुर्घटनेच्या चौकशीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, राऊ आयएएस कोचिंगची इमारत अनधिकृत होती. काही कोचिंग सेंटर माफिया बनले आहेत.

आम्ही भरपाई घेऊन काय करणार?

आम्ही भरपाई घेऊन काय करणार? त्यापेक्षा दोषी व्यक्तींवर कडक कारवाई करा, अशी मागणी नवीन दलवीन या मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी केली. उत्तरीय तपासणीनंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या हवाली करण्यात आला. त्याचे काका राज यांनी सांगितले की, नवीनचा मृतदेह त्रिवेंद्रम येथे नेण्यात आला असून त्याच्यावर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येतील.

कारवाई करण्याचे नायब राज्यपालांचे आश्वासन

आयएएस कोचिंग सेंटरच्या दुर्घटनेत तीन विद्यार्थी मरण पावले होते. त्या घटनास्थळी दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी सोमवारी भेट देऊन तिथे निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली. या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे सक्सेना यांनी निदर्शकांना सांगितले. या दुर्घटनेच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी दिल्लीतील आप कार्यालयासमोर निदर्शने केली. दिल्ली पालिका अधिकाऱ्यांची राऊ कोचिंग सेंटरसंदर्भातील पोलिस चौकशी करण्याची शक्यता आहे. 

‘हे गॅस चेंबरइतकेच भयानक’

कोचिंग सेंटरचे पेव फुटले असून, त्यांच्या इमारती गॅस चेंबर इतक्याच भयानक असतात. स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीच्या नावाखाली उघडण्यात आलेली सेंटर जाहिरातींसाठी करत असलेल्या प्रचंड खर्चाची चौकशी झाली पाहिजे, असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सभागृहात सांगितले. दुर्घटनेबाबत राज्यसभेत काही काळ चर्चा झाली. कोचिंग सेंटर हा व्यवसाय झाला आहे. त्यात या सेंटरना मिळणाऱ्या अमाप पैशामुळे शिक्षणाचेही व्यावसायिकरण झाले, असे धनखड म्हटले. 

टॅग्स :delhiदिल्ली