शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

विद्यार्थ्यांच्या मृत्यूची चौकशी; केंद्रीय गृह मंत्रालयाने नेमली उच्चस्तरीय चौकशी समिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 05:20 IST

विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची नायब राज्यपालांकडून मदत जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : जोरदार पावसामुळे दिल्लीतील जुने राजेंद्रनगर येथे शनिवारी राऊ आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरून तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी लोकसभेत सर्व पक्षांनी केली. त्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय चौकशी समिती सोमवारी स्थापन केली. त्यामध्ये दिल्ली सरकारमधील प्रधान सचिव (गृहखाते), दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त, अग्निशमन सल्लागार यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणी मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत नायब राज्यपालांनी जाहीर केली आहे आहे. सोमवारी दुर्घटनेच्या चौकशीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, राऊ आयएएस कोचिंगची इमारत अनधिकृत होती. काही कोचिंग सेंटर माफिया बनले आहेत.

आम्ही भरपाई घेऊन काय करणार?

आम्ही भरपाई घेऊन काय करणार? त्यापेक्षा दोषी व्यक्तींवर कडक कारवाई करा, अशी मागणी नवीन दलवीन या मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी केली. उत्तरीय तपासणीनंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या हवाली करण्यात आला. त्याचे काका राज यांनी सांगितले की, नवीनचा मृतदेह त्रिवेंद्रम येथे नेण्यात आला असून त्याच्यावर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येतील.

कारवाई करण्याचे नायब राज्यपालांचे आश्वासन

आयएएस कोचिंग सेंटरच्या दुर्घटनेत तीन विद्यार्थी मरण पावले होते. त्या घटनास्थळी दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी सोमवारी भेट देऊन तिथे निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली. या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे सक्सेना यांनी निदर्शकांना सांगितले. या दुर्घटनेच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी दिल्लीतील आप कार्यालयासमोर निदर्शने केली. दिल्ली पालिका अधिकाऱ्यांची राऊ कोचिंग सेंटरसंदर्भातील पोलिस चौकशी करण्याची शक्यता आहे. 

‘हे गॅस चेंबरइतकेच भयानक’

कोचिंग सेंटरचे पेव फुटले असून, त्यांच्या इमारती गॅस चेंबर इतक्याच भयानक असतात. स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीच्या नावाखाली उघडण्यात आलेली सेंटर जाहिरातींसाठी करत असलेल्या प्रचंड खर्चाची चौकशी झाली पाहिजे, असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सभागृहात सांगितले. दुर्घटनेबाबत राज्यसभेत काही काळ चर्चा झाली. कोचिंग सेंटर हा व्यवसाय झाला आहे. त्यात या सेंटरना मिळणाऱ्या अमाप पैशामुळे शिक्षणाचेही व्यावसायिकरण झाले, असे धनखड म्हटले. 

टॅग्स :delhiदिल्ली