शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या मृत्यूची चौकशी; केंद्रीय गृह मंत्रालयाने नेमली उच्चस्तरीय चौकशी समिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 05:20 IST

विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची नायब राज्यपालांकडून मदत जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : जोरदार पावसामुळे दिल्लीतील जुने राजेंद्रनगर येथे शनिवारी राऊ आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरून तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी लोकसभेत सर्व पक्षांनी केली. त्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय चौकशी समिती सोमवारी स्थापन केली. त्यामध्ये दिल्ली सरकारमधील प्रधान सचिव (गृहखाते), दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त, अग्निशमन सल्लागार यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणी मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत नायब राज्यपालांनी जाहीर केली आहे आहे. सोमवारी दुर्घटनेच्या चौकशीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, राऊ आयएएस कोचिंगची इमारत अनधिकृत होती. काही कोचिंग सेंटर माफिया बनले आहेत.

आम्ही भरपाई घेऊन काय करणार?

आम्ही भरपाई घेऊन काय करणार? त्यापेक्षा दोषी व्यक्तींवर कडक कारवाई करा, अशी मागणी नवीन दलवीन या मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी केली. उत्तरीय तपासणीनंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या हवाली करण्यात आला. त्याचे काका राज यांनी सांगितले की, नवीनचा मृतदेह त्रिवेंद्रम येथे नेण्यात आला असून त्याच्यावर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येतील.

कारवाई करण्याचे नायब राज्यपालांचे आश्वासन

आयएएस कोचिंग सेंटरच्या दुर्घटनेत तीन विद्यार्थी मरण पावले होते. त्या घटनास्थळी दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी सोमवारी भेट देऊन तिथे निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली. या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे सक्सेना यांनी निदर्शकांना सांगितले. या दुर्घटनेच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी दिल्लीतील आप कार्यालयासमोर निदर्शने केली. दिल्ली पालिका अधिकाऱ्यांची राऊ कोचिंग सेंटरसंदर्भातील पोलिस चौकशी करण्याची शक्यता आहे. 

‘हे गॅस चेंबरइतकेच भयानक’

कोचिंग सेंटरचे पेव फुटले असून, त्यांच्या इमारती गॅस चेंबर इतक्याच भयानक असतात. स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीच्या नावाखाली उघडण्यात आलेली सेंटर जाहिरातींसाठी करत असलेल्या प्रचंड खर्चाची चौकशी झाली पाहिजे, असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सभागृहात सांगितले. दुर्घटनेबाबत राज्यसभेत काही काळ चर्चा झाली. कोचिंग सेंटर हा व्यवसाय झाला आहे. त्यात या सेंटरना मिळणाऱ्या अमाप पैशामुळे शिक्षणाचेही व्यावसायिकरण झाले, असे धनखड म्हटले. 

टॅग्स :delhiदिल्ली