शहरं
Join us  
Trending Stories
1
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
2
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
3
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
4
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
5
मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...
6
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
7
प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
8
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
9
देशातील १० पैकी ७ मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३.६३ लाख कोटींनी कमी झालं, रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान
10
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
11
"जो रामाचा नाही, तो कामाचा नाही, ते सत्तेत असताना घरात बसले होते"; देवेंद्र फडणवीस यांची टीका
12
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
13
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
14
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
15
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
16
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
17
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
18
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
19
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
20
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
Daily Top 2Weekly Top 5

"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 23:48 IST

"गाय, गंगा आणि भारत मातेचा अपमान करणारे कधीच आमचे होऊ शकत नाहीत. तुष्टीकरणाचे हे राजकारण आता थांबायला हवे..."

मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे संत धीरेंद्र शास्त्री यांनी आयोजित केलेल्या हिंदू एकता पदयात्रेचा समारोप शुक्रवारी (29 नोव्हेंबर 2024) ओरछा येथे करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध संत रामभद्राचार्य यांनी आपल्या संबोधनात काँग्रेस आणि प्रियंका गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी आपल्या संबोधनात हिंदू एकता, तुष्टीकरणाचे राजकारण आणि धार्मिक अस्मिता या विषयांवर भाष्य केले.

संत रामभद्राचार्य यांनी आपल्या भाषणात काँग्रेस आणि प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केले. ते म्हणाले, "पंजा खूनी झाला आहे, प्रियंका गांधी वायनाडमधून निवडणूक जिंकल्यानंतर, त्यांच्या सन्मानार्थ एका निष्पाप गायीला गोळी घालण्यात आली. जे लोक अहिंसेवर बोलत आहेत, त्यांच्याच राजवटीत हे होत आहे."

हिंदू एकात्मता ही काळाची गरज -ही घटना हिंदू संस्कृती आणि धार्मिक मान्यतांच्या विरोधात असल्याचे संत रामभद्राचार्य यांनी म्हटले आहे. याच वेळी काँग्रेसने हिंदूंची उपेक्षा करत तुष्टीकरणाचे राजकारण केल्याचा आरोपही केला. हिंदू एकात्मता ही काळाची गरज असल्याचे सांगत त्यांनी ही पदयात्रा केवळ सुरुवात असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर, ही यात्रा म्हणजे, धार्मिक आणि सांस्कृतिक पुनर्जागरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

गाय, गंगा आणि भारत मातेचा अपमान करणारे कधीच आमचे होऊ शकत नाहीत -संत रामभद्राचार्य यांनी तुष्टीकरणाच्या राजकारणावरही भाष्य केले. ते म्हणाले, काही राजकीय पक्ष धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदू धर्म आणि त्याच्याशी संबंधित प्रतीकांचा अपमान करतात. गाय, गंगा आणि भारत मातेचा अपमान करणारे कधीच आमचे होऊ शकत नाहीत. तुष्टीकरणाचे हे राजकारण आता थांबायला हवे.

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामcongressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधीcowगाय