शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
3
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
5
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
6
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
7
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
8
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
9
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
10
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
11
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
12
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
13
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
14
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
15
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
16
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
17
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
19
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
20
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे

"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 23:48 IST

"गाय, गंगा आणि भारत मातेचा अपमान करणारे कधीच आमचे होऊ शकत नाहीत. तुष्टीकरणाचे हे राजकारण आता थांबायला हवे..."

मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे संत धीरेंद्र शास्त्री यांनी आयोजित केलेल्या हिंदू एकता पदयात्रेचा समारोप शुक्रवारी (29 नोव्हेंबर 2024) ओरछा येथे करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध संत रामभद्राचार्य यांनी आपल्या संबोधनात काँग्रेस आणि प्रियंका गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी आपल्या संबोधनात हिंदू एकता, तुष्टीकरणाचे राजकारण आणि धार्मिक अस्मिता या विषयांवर भाष्य केले.

संत रामभद्राचार्य यांनी आपल्या भाषणात काँग्रेस आणि प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केले. ते म्हणाले, "पंजा खूनी झाला आहे, प्रियंका गांधी वायनाडमधून निवडणूक जिंकल्यानंतर, त्यांच्या सन्मानार्थ एका निष्पाप गायीला गोळी घालण्यात आली. जे लोक अहिंसेवर बोलत आहेत, त्यांच्याच राजवटीत हे होत आहे."

हिंदू एकात्मता ही काळाची गरज -ही घटना हिंदू संस्कृती आणि धार्मिक मान्यतांच्या विरोधात असल्याचे संत रामभद्राचार्य यांनी म्हटले आहे. याच वेळी काँग्रेसने हिंदूंची उपेक्षा करत तुष्टीकरणाचे राजकारण केल्याचा आरोपही केला. हिंदू एकात्मता ही काळाची गरज असल्याचे सांगत त्यांनी ही पदयात्रा केवळ सुरुवात असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर, ही यात्रा म्हणजे, धार्मिक आणि सांस्कृतिक पुनर्जागरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

गाय, गंगा आणि भारत मातेचा अपमान करणारे कधीच आमचे होऊ शकत नाहीत -संत रामभद्राचार्य यांनी तुष्टीकरणाच्या राजकारणावरही भाष्य केले. ते म्हणाले, काही राजकीय पक्ष धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदू धर्म आणि त्याच्याशी संबंधित प्रतीकांचा अपमान करतात. गाय, गंगा आणि भारत मातेचा अपमान करणारे कधीच आमचे होऊ शकत नाहीत. तुष्टीकरणाचे हे राजकारण आता थांबायला हवे.

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामcongressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधीcowगाय