शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 23:48 IST

"गाय, गंगा आणि भारत मातेचा अपमान करणारे कधीच आमचे होऊ शकत नाहीत. तुष्टीकरणाचे हे राजकारण आता थांबायला हवे..."

मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे संत धीरेंद्र शास्त्री यांनी आयोजित केलेल्या हिंदू एकता पदयात्रेचा समारोप शुक्रवारी (29 नोव्हेंबर 2024) ओरछा येथे करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध संत रामभद्राचार्य यांनी आपल्या संबोधनात काँग्रेस आणि प्रियंका गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी आपल्या संबोधनात हिंदू एकता, तुष्टीकरणाचे राजकारण आणि धार्मिक अस्मिता या विषयांवर भाष्य केले.

संत रामभद्राचार्य यांनी आपल्या भाषणात काँग्रेस आणि प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केले. ते म्हणाले, "पंजा खूनी झाला आहे, प्रियंका गांधी वायनाडमधून निवडणूक जिंकल्यानंतर, त्यांच्या सन्मानार्थ एका निष्पाप गायीला गोळी घालण्यात आली. जे लोक अहिंसेवर बोलत आहेत, त्यांच्याच राजवटीत हे होत आहे."

हिंदू एकात्मता ही काळाची गरज -ही घटना हिंदू संस्कृती आणि धार्मिक मान्यतांच्या विरोधात असल्याचे संत रामभद्राचार्य यांनी म्हटले आहे. याच वेळी काँग्रेसने हिंदूंची उपेक्षा करत तुष्टीकरणाचे राजकारण केल्याचा आरोपही केला. हिंदू एकात्मता ही काळाची गरज असल्याचे सांगत त्यांनी ही पदयात्रा केवळ सुरुवात असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर, ही यात्रा म्हणजे, धार्मिक आणि सांस्कृतिक पुनर्जागरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

गाय, गंगा आणि भारत मातेचा अपमान करणारे कधीच आमचे होऊ शकत नाहीत -संत रामभद्राचार्य यांनी तुष्टीकरणाच्या राजकारणावरही भाष्य केले. ते म्हणाले, काही राजकीय पक्ष धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदू धर्म आणि त्याच्याशी संबंधित प्रतीकांचा अपमान करतात. गाय, गंगा आणि भारत मातेचा अपमान करणारे कधीच आमचे होऊ शकत नाहीत. तुष्टीकरणाचे हे राजकारण आता थांबायला हवे.

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामcongressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधीcowगाय