शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाची शक्यता, मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह बरसणार; २४ तासांसाठी हवामान अंदाज
2
Manoj Pande Extension : लष्करप्रमुख मनोज पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ!
3
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
4
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
5
"इंडिया आघाडी तीन कट रचतेय", घोसीत PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
6
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
7
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
8
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
9
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
10
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
11
Rajkot Game zone Fire Accident: 'डेथ फॉर्म' भरलात तरच तुम्हाला प्रवेश मिळेल, गेम झोन मालकांनी ठेवली होती ही अट; राजकोट दुर्घटनेवर मोठा खुलासा
12
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
13
पॅट कमिन्सकडून एका 'ऑटो राईड'चे श्रेयस अय्यरने मागितले २० कोटी; फायनलपूर्वीचा मजेशीर Video 
14
"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा
15
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
16
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
17
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
18
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
19
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
20
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 

भारतातील नैसर्गिक वायूचे साठे 45 वर्षे पुरतील, माहितीच्या अधिकारातून मिळाले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 2:42 PM

नोएडा- भारतामध्ये सध्या उपलब्ध असलेल्या नैसर्गिक वायूच्या साठ्यांवरुन हे साठे भारताला पुढील 45 वर्षे पुरतील असे उत्तर केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने माहितीच्या अधिकारात दिलेल्या उत्तरातून स्पष्ट झाले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी भारतात 2005 पासून देशात नैसर्गिक वायूचे किती उत्पादन झाले, त्यामध्ये कोणत्या राज्याचा किती वाटा ...

ठळक मुद्देनैसर्गिक वायूच्या उत्पादनामध्ये वेस्टर्न ऑफशोअरचा सर्वात मोठा वाटा असून येथे एकूण उत्पादनापैकी 59 टक्के वायूचे उत्पादन होते.आसाम राज्यामध्ये 14 टक्के, गुजरातमध्ये 5 टक्के, तामिळनाडूमध्ये आणि राजस्थानात प्रत्येकी 4 टक्के उत्पादन होते.

नोएडा- भारतामध्ये सध्या उपलब्ध असलेल्या नैसर्गिक वायूच्या साठ्यांवरुन हे साठे भारताला पुढील 45 वर्षे पुरतील असे उत्तर केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने माहितीच्या अधिकारात दिलेल्या उत्तरातून स्पष्ट झाले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी भारतात 2005 पासून देशात नैसर्गिक वायूचे किती उत्पादन झाले, त्यामध्ये कोणत्या राज्याचा किती वाटा आहे आणि हे साठे किती वर्षे पुरतील अशी माहिती विचारली होती. 2016-17 वर्षाच्या उत्पादनाची गती आणि 31 मार्च 2017 रोजी उपलब्ध असणाऱ्या साठ्यांचा विचार करता भारताला हे साठे पुढील 45 वर्षे पुरतील असे सारडा यांना मिळालेल्या उत्तरात म्हटले आहे.

या उत्तरात 2004-05 या वर्षापासून नैसर्गिक वायू उत्पादनाची आरडेवारीही देण्यात आली आहे. 2004-05 या वर्षी भारतात 31.76 अब्ज क्युबिक मिटर्स नैसर्गिक वायूचे उत्पादन झाले. 2015-16 या वर्षी हे उत्पादन 32.25 अब्ज क्युबिक मिटर्स तर 2016-17 या वर्षी 31.90 अब्ज क्युबिक मिटर्स इतके उत्पादन झाले. या वर्षी म्हणजे 2017 साली ऑगस्ट महिन्यापर्यंत 13.69 अब्ज क्युबिक मिटर्स इतके नैसर्गिक वायूचे उत्पादन झालेले आहे.नैसर्गिक वायूच्या उत्पादनामध्ये वेस्टर्न ऑफशोअरचा सर्वात मोठा वाटा असून येथे एकूण उत्पादनापैकी 59 टक्के वायूचे उत्पादन होते. तर इस्टर्न ऑफशोअरवर 9 टक्के उत्पादन होते. आसाम राज्यामध्ये 14 टक्के, गुजरातमध्ये 5 टक्के, तामिळनाडूमध्ये आणि राजस्थानात प्रत्येकी 4 टक्के उत्पादन होते. इतर राज्यांमध्ये यापेक्षा कमी उत्पादन होते.नैसर्गिक वायूची दिवसेंदिवस वाढणारी गरज पाहता आणि तेलापेक्षा पर्यावरण पूरक म्हणून नैसर्गिक वायूला वाहनांमध्ये पसंती मिळत असताना नैसर्गिक वायूच्या उत्पादनाची गरज असल्याचे मत सारडा यांनी व्यक्त केले आहे. येणारी 100 वर्षांची गरज पूर्ण होईल इतक्या साठ्यांचा शोध व उत्पादन व्हावे अशी विनंती  प्रफु्ल्ल सारडा यांनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू खात्याचे मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :Indiaभारत