शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

भारताचा शत्रू थरथर कापणार! नौदलाची ताकद वाढणार; १७ युद्धनौका आणि ९ पाणबुड्यांचा होणार समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 12:15 IST

Indian Navy : भारतीय नौदलाची ताकद आता आणखी वाढणार आहे. सरकारने ७ नवीन युद्धनौका आणि ९ पाणबुड्यांना मंजुरी देण्याची तयारी केली आहे.

Indian Navy New Warships : भारतीय नौदलाच्या ताकदीत मोठ्या प्रमाणात वाढ करण्याच्या दिशेने सरकार महत्त्वपूर्ण पावलं उचलण्याच्या तयारीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच १७ नवीन युद्धनौका आणि ९ अत्याधुनिक पाणबुड्यांच्या कामाला मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे. सध्या ही सर्व प्रकल्प विविध मंजुरी प्रक्रियांमधून जात आहेत.

सध्या देशातच ६१ युद्धनौका आणि पाणबुड्यांचे काम विविध टप्प्यांत सुरू असून, "आत्मनिर्भर भारत" उपक्रमाअंतर्गत ही सर्व जहाजं भारतातच तयार केली जात आहेत.

७० हजार कोटींचे दोन महत्त्वाचे प्रकल्पप्रकल्प १७बी अंतर्गत, अंदाजे ७०,००० कोटी रुपयांच्या खर्चाने सात पुढच्या पिढीच्या फ्रिगेट्स आणि दोन बहुउद्देशीय जहाजं बांधली जाणार आहेत. तसेच, प्रकल्प ७५ (I) अंतर्गत, ७०,००० कोटी रुपये खर्च करून सहा अत्याधुनिक पाणबुड्या तयार करण्याची योजना आहे.

याशिवाय, प्रकल्प ७५ अ‍ॅड-ऑन अंतर्गत सुमारे ३६,००० कोटी रुपयांच्या खर्चाने तीन स्कॉर्पिन श्रेणीतील पाणबुड्याही बांधल्या जातील.

८ नवीन कॉर्व्हेट्सची तयारीभारतीय नौदलासाठी आठ नवीन पुढच्या पिढीच्या कॉर्व्हेट्स तयार करण्याचंही नियोजन आहे, ज्यावर सुमारे ३६,००० कोटी रुपये खर्च केला जाईल. या सर्व प्रकल्पांचा एकूण खर्च २.४० लाख कोटी रुपयांहून अधिक असण्याचा अंदाज आहे.

जुन्या प्लॅटफॉर्मना नवी जागाया नवीन युद्धनौका व पाणबुड्या सध्या कार्यरत असलेल्या जुन्या प्लॅटफॉर्मची जागा घेतील. केवळ धोका लक्षात घेऊन नव्हे तर भविष्यातील तांत्रिक क्षमता वाढविण्यावरही या प्रकल्पांचा भर आहे.

चीनच्या नौदलाला उत्तर देण्याची रणनीतीचीनच्या पीएलए नौदलाकडे सध्या ३५५ हून अधिक युद्धनौका व पाणबुड्या आहेत, ज्यामुळे ते जगातील सर्वात मोठं नौदल बनलं आहे. याच्या तुलनेत, भारतीय नौदलाकडे सुमारे १३० जहाजं आणि पाणबुड्या आहेत. त्यामुळे आधुनिक आणि कार्यक्षम नौदलाची गरज अधिक तीव्र झाली आहे. सध्या नौदलाच्या ताफ्यात १२ जुन्या पाणबुड्या अजूनही सेवेत आहेत. आता त्यात ६ स्कॉर्पिन वर्गातील स्वदेशी पाणबुड्यांचा समावेश करण्यात आला आहे. 

२०३५ पर्यंत १७५ जहाजांचं लक्ष्य!भारतीय नौदलाने २०३५ पर्यंत एकूण १७५ जहाजांचा ताफा उभारण्याचं लक्ष्य निश्चित केलं आहे. त्यासाठी आता वेगाने पावलं उचलली जात आहेत. बहुउद्देशीय विध्वंसक, पाणबुड्या आणि कॉर्व्हेट्ससारख्या जहाजांच्या मदतीने भारत समुद्रातील आपली उपस्थिती आणि सामर्थ्य लक्षणीयरीत्या वाढवण्याच्या तयारीत आहे.

टॅग्स :indian navyभारतीय नौदलIndiaभारत