शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले...
2
IND vs WI : KL राहुलचं नाबाद अर्धशतक; कसोटीत शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिंकली पहिली ट्रॉफी
3
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पहिल्याच वन-डेमधून 'हे' दोन महत्त्वाचे खेळाडू बाहेर; भारतीय संघाने टाकला सुटकेचा नि:श्वास...
4
दिवाळीच्या साफसफाईत आईला सापडला 'खजिना'; २ हजारांच्या तब्बल २ लाखांच्या नोटा, पण...
5
LG Electronics IPO Listing: बंपर लिस्टिंग, शेअर बाजारात एन्ट्री घेताच प्रत्येक शेअरवर ₹५७५ चा फायदा; एलजी आयपीओनं केलं मालामाल
6
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘मोदी चांगले मित्र आहेत’; बाजूलाच उभे असलेले पाकिस्तानचे शाहबाज शरीफ अवाक, व्हिडीओ व्हायरल
7
दिवाळी २०२५: धन-सुख-समृद्धीची इच्छा पूर्ण होईल, ‘अशी’ करा लक्ष्मी आगमनाची तयारी; शुभच घडेल!
8
दिवाळी २०२५ धमाका: या स्मार्टफोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट! तुम्ही घेण्याच्या विचारात असाल तर... 
9
नेपाळनंतर 'Gen-Z' ने या देशातील सत्ता घालवली; राष्ट्रपती देश सोडून पळून गेले
10
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टीमध्ये ७० अंकांची तेजी; IT आणि मेटल शेअर्स सुस्साट
11
Swami Samartha: पुष्य नक्षत्रावर सुरु करा स्वामीभक्ती, अध्यात्मात मिळेल गती, आयुष्यात होईल दुप्पट प्रगती!
12
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
13
५०० वर्षांनी हंस केंद्र त्रिकोण राजयोग: ९ राशींना बोनस, अकल्पनीय लाभ; भाग्योदय-पैसा-भरभराट!
14
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; दीड वर्षांपूर्वी पळून जाऊन लग्न, लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
15
१ नोव्हेंबरपासून करू शकणार २३९० रुपयांत हवाई प्रवास, या दिग्गज कंपनीनं केली मोठी घोषणा
16
आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन"
17
राष्ट्रीय महामार्गावरील अस्वच्छ शौचालयाचा फोटो पाठवा, Fastag मध्ये ₹१००० रुपये मिळवा; काय आहे हा प्रकार?
18
लोकल लेट झाल्याने बदलापूर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी; गर्दी आवरण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल स्थानकात
19
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
20
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!

भारताचा शत्रू थरथर कापणार! नौदलाची ताकद वाढणार; १७ युद्धनौका आणि ९ पाणबुड्यांचा होणार समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 12:15 IST

Indian Navy : भारतीय नौदलाची ताकद आता आणखी वाढणार आहे. सरकारने ७ नवीन युद्धनौका आणि ९ पाणबुड्यांना मंजुरी देण्याची तयारी केली आहे.

Indian Navy New Warships : भारतीय नौदलाच्या ताकदीत मोठ्या प्रमाणात वाढ करण्याच्या दिशेने सरकार महत्त्वपूर्ण पावलं उचलण्याच्या तयारीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच १७ नवीन युद्धनौका आणि ९ अत्याधुनिक पाणबुड्यांच्या कामाला मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे. सध्या ही सर्व प्रकल्प विविध मंजुरी प्रक्रियांमधून जात आहेत.

सध्या देशातच ६१ युद्धनौका आणि पाणबुड्यांचे काम विविध टप्प्यांत सुरू असून, "आत्मनिर्भर भारत" उपक्रमाअंतर्गत ही सर्व जहाजं भारतातच तयार केली जात आहेत.

७० हजार कोटींचे दोन महत्त्वाचे प्रकल्पप्रकल्प १७बी अंतर्गत, अंदाजे ७०,००० कोटी रुपयांच्या खर्चाने सात पुढच्या पिढीच्या फ्रिगेट्स आणि दोन बहुउद्देशीय जहाजं बांधली जाणार आहेत. तसेच, प्रकल्प ७५ (I) अंतर्गत, ७०,००० कोटी रुपये खर्च करून सहा अत्याधुनिक पाणबुड्या तयार करण्याची योजना आहे.

याशिवाय, प्रकल्प ७५ अ‍ॅड-ऑन अंतर्गत सुमारे ३६,००० कोटी रुपयांच्या खर्चाने तीन स्कॉर्पिन श्रेणीतील पाणबुड्याही बांधल्या जातील.

८ नवीन कॉर्व्हेट्सची तयारीभारतीय नौदलासाठी आठ नवीन पुढच्या पिढीच्या कॉर्व्हेट्स तयार करण्याचंही नियोजन आहे, ज्यावर सुमारे ३६,००० कोटी रुपये खर्च केला जाईल. या सर्व प्रकल्पांचा एकूण खर्च २.४० लाख कोटी रुपयांहून अधिक असण्याचा अंदाज आहे.

जुन्या प्लॅटफॉर्मना नवी जागाया नवीन युद्धनौका व पाणबुड्या सध्या कार्यरत असलेल्या जुन्या प्लॅटफॉर्मची जागा घेतील. केवळ धोका लक्षात घेऊन नव्हे तर भविष्यातील तांत्रिक क्षमता वाढविण्यावरही या प्रकल्पांचा भर आहे.

चीनच्या नौदलाला उत्तर देण्याची रणनीतीचीनच्या पीएलए नौदलाकडे सध्या ३५५ हून अधिक युद्धनौका व पाणबुड्या आहेत, ज्यामुळे ते जगातील सर्वात मोठं नौदल बनलं आहे. याच्या तुलनेत, भारतीय नौदलाकडे सुमारे १३० जहाजं आणि पाणबुड्या आहेत. त्यामुळे आधुनिक आणि कार्यक्षम नौदलाची गरज अधिक तीव्र झाली आहे. सध्या नौदलाच्या ताफ्यात १२ जुन्या पाणबुड्या अजूनही सेवेत आहेत. आता त्यात ६ स्कॉर्पिन वर्गातील स्वदेशी पाणबुड्यांचा समावेश करण्यात आला आहे. 

२०३५ पर्यंत १७५ जहाजांचं लक्ष्य!भारतीय नौदलाने २०३५ पर्यंत एकूण १७५ जहाजांचा ताफा उभारण्याचं लक्ष्य निश्चित केलं आहे. त्यासाठी आता वेगाने पावलं उचलली जात आहेत. बहुउद्देशीय विध्वंसक, पाणबुड्या आणि कॉर्व्हेट्ससारख्या जहाजांच्या मदतीने भारत समुद्रातील आपली उपस्थिती आणि सामर्थ्य लक्षणीयरीत्या वाढवण्याच्या तयारीत आहे.

टॅग्स :indian navyभारतीय नौदलIndiaभारत