शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

भारतीय रेल्वेची प्रथमच देशाबाहेर पार्सल सेवा; बांगलादेशात पाठविली आंध्र प्रदेशातील वाळलेली मिर्ची

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 07:22 IST

आंध्र प्रदेशातील गुंटूर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर मिरची उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. येथील मिर्ची आंतरराष्ट्रीय बाजारात प्रसिद्ध आहे.

गुंटूर : भारतीय रेल्वेने इतिहासात प्रथमच देशाच्या सीमा ओलांडून मालवाहतूक सेवा दिली आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील रेड्डीपालेम येथील वाळलेली मिर्ची रेल्वेच्या ‘स्पेशल पार्सल ट्रेन’ने बांगलादेशातील बेनापोले येथे पोहोचविली आहे.रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी एक टष्ट्वीट करून याची माहिती दिली. त्यांनी म्हटले की, ‘देशाच्या सीमांच्या पलीकडे : निर्यातीसाठी तयार होताना रेल्वेने पहिल्यांदाच वाळलेली मिर्ची ‘स्पेशल पार्सल ट्रेन’ने बांगलादेशात पाठविली आहे.’आंध्र प्रदेशातील गुंटूर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर मिरची उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. येथील मिर्ची आंतरराष्ट्रीय बाजारात प्रसिद्ध आहे. येथून बांगलादेशात मोठ्या प्रमाणात मिर्ची निर्यात होते. येथील शेतकरी आणि व्यापारी निर्यातीसाठी रस्ते वाहतुकीचा वापर आजपर्यंत करीत होते. त्यांचा वाहतुकीचा प्रतिटन खर्च ७ हजार रुपये होता. तथापि, लॉकडाऊनच्या काळात रस्ते वाहतूक बंद झाल्यामुळे मिर्चीची निर्यातही थांबली. ही बाब जेव्हा रेल्वे अधिकाऱ्यांना समजली तेव्हा ते स्वत:च शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडे गेले. रेल्वेच्या मालवाहतूक सेवेची माहिती त्यांना दिली. तथापि, रेल्वेच्या मालवाहतूक सेवेत एक मोठी अडचण होती. एका खेपेत किमान १,५00 टन माल असेल, तरच मालवाहू रेल्वे बुक करता येते. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना ते गैरसोयीचे होते.यावर मार्ग काढण्यासाठी रेल्वेने छोट्या म्हणजे ५00 टनांपर्यंतच्या खेपा स्वीकारण्यााचे मान्य केले. दक्षिण-मध्य रेल्वेच्या गुंटूर विभागाने त्यासाठी पुढाकार घेऊन बांगलादेशला मिर्ची पाठविण्यासाठी ‘स्पेशल पार्सल एक्स्प्रेस’ची व्यवस्था केली. त्याचा मोठा फायदा शेतकरी व व्यापाºयांना झाला. आपली मिर्ची थेट बांगलादेशात पाठविणे त्यांना शक्य झाले.कोविड-१९ विषाणू साथीमुळे रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. यातून होऊ शकणारी संभाव्य समस्या टाळण्यासाठी रेल्वेने देशातील मालवाहतुकीची धुरा सांभाळली आहे. औषधी, वैद्यकीय उपकरणे, अन्नधान्य इत्यादी आवश्यक वस्तूंची वाहतूक रेल्वेकडून केली जात आहे. छोट्या पार्सल आकारातही रेल्वे वाहतूक करीत असल्यामुळे देशातील व्यावसायिक व सामान्य नागरिकांची मोठी सोय झाली आहे. ई-कॉमर्स संस्था आणि राज्य सरकारे यांच्यासाठीही रेल्वेने पार्सल सेवा तातडीने उपलब्ध करून दिलीआहे.रेल्वे सूत्रांनी सांगितले की, २२ मार्च ते ११ जुलै २0२0 या काळात ४,४३४ पार्सल ट्रेन चालविण्यात आल्या. त्यातील ४,३0४ गाड्या कालबद्ध वेळापत्रकावर आधारित होत्या.१६ पार्सल व्हॅनची स्पेशल ट्रेन- १६ पार्सल व्हॅन असलेली एक स्पेशल पार्सल ट्रेन बांगलादेशातील बेनापोलेला पाठविण्यात आली आहे. यातील प्रत्येक पार्सल व्हॅनमध्ये वाळलेल्या मिर्च्यांची ४६६ पोती आहेत. एका व्हॅनमधील मिर्च्यांचे वजन १९.९ टन आहे. एका स्पेशल पार्सल ट्रेनमधून एकूण ३८४ टन वाळलेली मिर्ची बांगलादेशला पाठविण्यात आली.- यात प्रतिटन वाहतुकीचा खर्च ४,६0८ रुपये आला. रस्ते वाहतुकीच्या तुलनेत हा खर्च खूपच कमी आहे. रस्ते वाहतुकीद्वारे प्रतिटन खर्च सुमारे ७ हजार रुपये होता.

टॅग्स :railwayरेल्वे