शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, 12 सप्टेंबरपासून धावणार 80 नव्या विशेष रेल्वेगाड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 17:41 IST

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष यादव म्हणाले, यासंदर्भात लवकरच अधिसूचनाही जारी करण्यात येईल. तसेच आवश्यकते नुसार, जेथे नव्या रेल्वेची आश्यकता भासेल तेथे अथवा जेथे मोठी वेटिंग लिस्ट असेल तेथे अॅक्चूअल रेल्वेपूर्वी एक क्लोन रेल्वेगाडी चालवली जाईल.

ठळक मुद्देआवश्यकता भासेल तेथे क्लोन रेल्वेगाडीही चालवली जाणार.भारतीय रेल्वेकडून देशात सध्या 230 रेल्वेगाड्या चालवल्या जात आहेत.लॉकडाउनमुळे एकट्या पश्चिम रेल्वेचे 1,837 कोटी रुपयांपेक्षाही अधिकचे नुकसान

नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देशांप्रमाणेच भारतातही लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. मात्र यानंतर अनलॉकच्या माध्यमाने देशातील कामकाज हळू-हळू सुरू करण्यात येत आहे. अनेक क्षेत्रे खुली केली जात आहेत. भारतीयरेल्वेकडून देशात सध्या 230 रेल्वेगाड्या चालवल्या जात आहेत. आता पुन्हा भारतीय रेल्वेने (Indian Railway) 12 सप्टेंबरपासून 80 नव्या विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 10 सप्टेंबरपासून रिझर्वेशनलाही सुरुवात होणार आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्हीके यादव यांनी आज ही माहिती दिली. 80 नव्या रेल्वेगाड्या अथवा 40 जोडी रेल्वे 12 सप्टेंबरपासून सुरू होतील, असे त्यांनी सांगितले.

आवश्यकता भासेल तेथे क्लोन रेल्वेगाडी चालवली जाणार -रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष यादव म्हणाले, यासंदर्भात लवकरच अधिसूचनाही जारी करण्यात येईल. तसेच आवश्यकते नुसार, जेथे नव्या रेल्वेची आवश्यकता भासेल तेथे अथवा जेथे मोठी वेटिंग लिस्ट असेल तेथे अॅक्चूअल रेल्वेपूर्वी एक क्लोन रेल्वेगाडी चालवली जाईल. याशिवाय परीक्षांसाठी अथवा अशाच एखाद्या कारणासाठी राज्य सरकारने मागणी केल्यास रेल्वेगाड्या चालवल्या जातील. 

यादव म्हणाले, कोरोनाचा परिणाम भलेही काही निविदा आणि भूमी अधिग्रहणाच्या प्रक्रियेवर झाला असेल. मात्र, बुलेट ट्रेन योजना योग्य प्रकारे सुरू आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, रेल्वे रुळांच्या बाजू असलेला कचरा दिल्ली सरकार आणि रेल्वेकडून संयुक्तपणे हटवला जात आहे.

लॉकडाउनमुळे एकट्या पश्चिम रेल्वेचे 1,837 कोटी रुपयांपेक्षाही अधिकचे नुकसान -कोरोनाचा फटका संपूर्ण जगालाच बसला आहे. या महामारीमुळे संपूर्ण जगाचीच अर्थव्यवस्था कोलमडली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉक डाउन काळात रेल्वे बोर्डाचे मोठे नुकसान झाले आहे. अहवालाप्रमाणे देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे एकट्या पश्चिम रेल्वेचे 1,837 कोटी रुपयांपेक्षाही अधिक नुकसान झाले आहे. नुकतीच सरकारने अनलॉक-4ची घोषणा केल्यानंतर रेल्वेकडून ही घोषणा करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

मुंबई काय शिवसेनेच्या बापाची का? कंगनाच्या पाठीशी उभे राहत भाजपा नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल

क्रिकेटशी संबंधित 'या' व्यक्तीला कोरोनाची लागण; सचिन धावला मदतीला, संपूर्ण खर्च उचलणार

ताफा थांबवून बच्चू कडू धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला, स्वत:च्या गाडीतून जखमींना पोहोचवलं रुग्णालयात

लुटारू नवरी! 10 वर्षांत 8 जणांशी केलं लग्न, लाखो रुपयांचा घातला गंडा

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेIndiaभारतcorona virusकोरोना वायरस बातम्या