शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, 12 सप्टेंबरपासून धावणार 80 नव्या विशेष रेल्वेगाड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 17:41 IST

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष यादव म्हणाले, यासंदर्भात लवकरच अधिसूचनाही जारी करण्यात येईल. तसेच आवश्यकते नुसार, जेथे नव्या रेल्वेची आश्यकता भासेल तेथे अथवा जेथे मोठी वेटिंग लिस्ट असेल तेथे अॅक्चूअल रेल्वेपूर्वी एक क्लोन रेल्वेगाडी चालवली जाईल.

ठळक मुद्देआवश्यकता भासेल तेथे क्लोन रेल्वेगाडीही चालवली जाणार.भारतीय रेल्वेकडून देशात सध्या 230 रेल्वेगाड्या चालवल्या जात आहेत.लॉकडाउनमुळे एकट्या पश्चिम रेल्वेचे 1,837 कोटी रुपयांपेक्षाही अधिकचे नुकसान

नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देशांप्रमाणेच भारतातही लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. मात्र यानंतर अनलॉकच्या माध्यमाने देशातील कामकाज हळू-हळू सुरू करण्यात येत आहे. अनेक क्षेत्रे खुली केली जात आहेत. भारतीयरेल्वेकडून देशात सध्या 230 रेल्वेगाड्या चालवल्या जात आहेत. आता पुन्हा भारतीय रेल्वेने (Indian Railway) 12 सप्टेंबरपासून 80 नव्या विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 10 सप्टेंबरपासून रिझर्वेशनलाही सुरुवात होणार आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्हीके यादव यांनी आज ही माहिती दिली. 80 नव्या रेल्वेगाड्या अथवा 40 जोडी रेल्वे 12 सप्टेंबरपासून सुरू होतील, असे त्यांनी सांगितले.

आवश्यकता भासेल तेथे क्लोन रेल्वेगाडी चालवली जाणार -रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष यादव म्हणाले, यासंदर्भात लवकरच अधिसूचनाही जारी करण्यात येईल. तसेच आवश्यकते नुसार, जेथे नव्या रेल्वेची आवश्यकता भासेल तेथे अथवा जेथे मोठी वेटिंग लिस्ट असेल तेथे अॅक्चूअल रेल्वेपूर्वी एक क्लोन रेल्वेगाडी चालवली जाईल. याशिवाय परीक्षांसाठी अथवा अशाच एखाद्या कारणासाठी राज्य सरकारने मागणी केल्यास रेल्वेगाड्या चालवल्या जातील. 

यादव म्हणाले, कोरोनाचा परिणाम भलेही काही निविदा आणि भूमी अधिग्रहणाच्या प्रक्रियेवर झाला असेल. मात्र, बुलेट ट्रेन योजना योग्य प्रकारे सुरू आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, रेल्वे रुळांच्या बाजू असलेला कचरा दिल्ली सरकार आणि रेल्वेकडून संयुक्तपणे हटवला जात आहे.

लॉकडाउनमुळे एकट्या पश्चिम रेल्वेचे 1,837 कोटी रुपयांपेक्षाही अधिकचे नुकसान -कोरोनाचा फटका संपूर्ण जगालाच बसला आहे. या महामारीमुळे संपूर्ण जगाचीच अर्थव्यवस्था कोलमडली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉक डाउन काळात रेल्वे बोर्डाचे मोठे नुकसान झाले आहे. अहवालाप्रमाणे देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे एकट्या पश्चिम रेल्वेचे 1,837 कोटी रुपयांपेक्षाही अधिक नुकसान झाले आहे. नुकतीच सरकारने अनलॉक-4ची घोषणा केल्यानंतर रेल्वेकडून ही घोषणा करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

मुंबई काय शिवसेनेच्या बापाची का? कंगनाच्या पाठीशी उभे राहत भाजपा नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल

क्रिकेटशी संबंधित 'या' व्यक्तीला कोरोनाची लागण; सचिन धावला मदतीला, संपूर्ण खर्च उचलणार

ताफा थांबवून बच्चू कडू धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला, स्वत:च्या गाडीतून जखमींना पोहोचवलं रुग्णालयात

लुटारू नवरी! 10 वर्षांत 8 जणांशी केलं लग्न, लाखो रुपयांचा घातला गंडा

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेIndiaभारतcorona virusकोरोना वायरस बातम्या