शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

5 वर्षात 313 रेल्वे गाड्या रुळावरुन घसरुन अपघात, 419 प्रवाशांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 13:00 IST

भारतीय रेल्वे नागरिकांच्या देशांतर्गत प्रवास करण्याचे मुख्य साधन आहे. भारतीय रेल्वेला कोट्यवधी रुपयांचा महसूल प्राप्त होतो. तरीसुद्धा प्रवाशांची सुरक्षा मात्र रामभरोसेच आहे. कारण भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलताना दिसत नाही.  शेकडो प्रवासी रेल्वे अपघतात मृत्युमुखी पडतात.

ठळक मुद्देगेल्या पाच वर्षांत रेल्वे अपघातात 419 प्रवाशांचा मृत्यूप्रवाशांची सुरक्षा रामभरोसेच

नवी दिल्ली - भारतीय रेल्वे नागरिकांच्या देशांतर्गत प्रवास करण्याचे मुख्य साधन आहे. भारतीय रेल्वेला कोट्यवधी रुपयांचा महसूल प्राप्त होतो. तरीसुद्धा प्रवाशांची सुरक्षा मात्र रामभरोसेच आहे. कारण भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलताना दिसत नाही.  शेकडो प्रवासी रेल्वे अपघतात मृत्युमुखी पडतात. 2013पासून ते 2018पर्यंत एकूण 350 अपघातांमध्ये 419 प्रवाशांच्या नाहक बळी गेला असून 1024 प्रवासी जखमी झाल्याची माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे.  

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी रेल्वे अपघातांबाबतची माहिती पुरवण्याची मागणी आरटीआयमार्फत केली होती.  रेल्वे बोर्ड विभागात 2013 पासून ते 2018 पर्यंत एकूण किती रेल्वे अपघात झाले?, अपघातात किती प्रवाशांचा मृत्यू झाला आणि किती जण जखमी झाले? अपघातांमुळे रेल्वेला किती प्रमाणात नुकसान झाला?, ही माहिती शेख यांनी विचारली होती. यानंतर रेल्वे बोर्डाचे  जनमाहिती अधिकारी तथा उप निदेशक/संरक्षा संजोय अब्राहम यांनी  शकील अहमद शेख यांना सर्व माहिती उपलब्ध करुन दिली. 

मिळालेल्या माहितीमध्ये धक्कादायक आकडे समोर आले आहेत. आरटीआयनुसार, एप्रिल 2013 पासून मार्च 2018 पर्यंत एकूण 350 रेल्वे अपघात झाले. यामध्ये 419 प्रवाशांचा बळी गेला असून 1024 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातांमुळे रेल्वेला तब्बल 282 कोटी 78 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अपघातांमध्ये लोकल रूळावर घसरणे, उलटणे तसंच आग लागणे यांसारख्या घटनांचा समावेश आहे.  

2013-2014 एकूण 64 रेल्वे अपघात, 41 प्रवाशांचा मृत्यू,  79 प्रवासी जखमी, 38 कोटी 2 लाख रुपयांचे  नुकसान 

2014-2015 एकूण 74 रेल्वे अपघात, 119 प्रवाशांचा मृत्यू, 322 प्रवासी जखमी, 72 कोटी ८ लाख रुपयांचे नुकसान 

2015-2016 एकूण 68 रेल्वे अपघात, 36 प्रवाशांचा मृत्यू,  101 प्रवासी जखमी, 59 कोटी 24 लाख रुपयांचे नुकसान 

2016-2017एकूण 84 रेल्वे अपघात, 195 प्रवाशांचा मृत्यू,  346 प्रवासी जखमी, 62 कोटी 29 लाख रुपयांचे नुकसान 

2017-2018 एकूण 60 रेल्वे अपघात, 28 प्रवाशांचा मृत्यू, 176 प्रवासी जखमी, 51 कोटी 15 लाख रुपयांचे नुकसान 

90 टक्के अपघात गाड्या रूळावर घसरल्याने झाले आहेत. तसेच 6 टक्के अपघात गाड्यांची टक्कर, तर 4 टक्के अपघात आग लागण्याच्या घटनांमुळे झाले आहेत.  रेल्वे प्रशासन प्रवाशांकडून शुल्क आकारत आहे. मात्र त्यांच्या सुरक्षेसाठी उपाय का केले जात नाहीत, आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघातDeathमृत्यू