शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

2024 पर्यंत रस्ते अपघातांची संख्या होईल अर्धी; नितीन गडकरींचा मोठा दावा, सांगितला सरकारचा प्लॅन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 17:42 IST

दर वर्षी पाच लाख रस्ते अपघातांत जवळपास 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो आणि तीन लाखहू अधिक लोक जखमी होतात. या विषयावर सरकार गांभीर्याने काम करत आहे...

भारतात दरवर्षी 1.5 लाखांहून अधिक लोक रस्ते अपघातात (Road Accidents) आपला जीव गमावतात. यासंदर्भात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. तसेच, रस्ते अपघात कमी करण्यासाठी सरकार कंबरकसून काम करत आहे. 2024 च्या अखेरपर्यंत देशातील रस्ते अपघातांची संख्या निम्म्यावर येईल, असा दावा केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमादरम्यान केला.

केंद्रीय मंत्र्यांनी दिली अशी माहिती -  गडकरी म्हणाले, सरकारने महामार्गांवरील ब्‍लॅक स्‍पॉट्स संपवण्यासाठी आता पर्यंत 25 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. इंदूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, दर वर्षी पाच लाख रस्ते अपघातांत जवळपास 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो आणि तीन लाखहू अधिक लोक जखमी होतात. या विषयावर सरकार गांभीर्याने काम करत आहे आणि 2024 च्या अखेरपर्यंत आपघात आणि मृतांची संख्या 50 टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी सरकारने योजना आखली आहे. 

खर्च करण्यात आले 25 हजार कोटी - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, सरकार रस्ते अपघात कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. 2024 पर्यंत रस्ते अपघात निम्म्यावर आणण्यासाठी सरकार महामार्गांवरील  ब्‍लॅक-स्‍पॉट हटविण्याचे काम करत आहे. राष्ट्रीय महामार्गावरील 500 मीटरच्या अशा भागाला ब्लॅक-स्पॉट म्हटले जाते, जेथे 3 वर्षांत पाच रस्ते अपघात झालेले असतील, अथवा, याच काळात 10 मृत्यू झालेले असतील. गडकरी म्हणाले, ब्लॅक-स्पॉट हटविण्यासाठी सरकारने आतापर्यंत 25,000 कोटी रुपये खर्च केले आहेत. तसेच, जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेच्या मदतीने सरकार 15,000 कोटी रुपयांच्या इतर प्रकल्पांवर काम करत आहे.  

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाroad safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघात