शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराची मोठी कारवाई, पाकिस्तानच्या पाच सैनिकांना घातले कंठस्नान, तीन बंकर उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 8:45 AM

 नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराने आज मोठी कारवाई केली आहे. राजौरी आणि पुंछ परिसरात भारतीय लष्कराने केलेल्या या कारवाईत पाकिस्तानचे तीन बंकर उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.

श्रीनगर - नियंत्रण रेषेवर  सातत्याने कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानविरोधात भारतीय लष्कराने आज मोठी कारवाई केली आहे. राजौरी आणि पुंछ परिसरात भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या गोळीबाराविरोधात प्रत्युत्तरदाखल केलेल्या या कारवाईत पाकिस्तानचे तीन बंकर उद्ध्वस्त करण्यात आले असून, पाकिस्तानचे पाच सैनिक ठार झाले आहेत. तसेच गोळीबारामध्ये पाकिस्तानचे 20 जवान ठार झाल्याचेही वृत्त आहे. भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमधील पुंछ परिसरातील मेंढर विभागात ही प्रत्युत्तरदाखल कारवाई केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करून अकारण गोळीबार करण्यात येत होता. भारतीय लष्कराने या आगळीकीला चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय लष्कराच्या प्रत्युत्तरदाखल कारवाईत पाकिस्तानचे फार नुकसान झाले. तसेच त्यांचे किमान पाच सैनिक ठार झाले. भारतीय सैनिकांच्या कारवाईत पाकिस्तानची एक चौकी उद्ध्वस्त झाली आहे, तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील काही नागरिकही जखमी झाले आहेत. याआधी जानेवारी महिन्यात जम्मू-काश्मीरमधील भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या दोन चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या. त्या कारवाईत पाकिस्तानचे किमान 8 ते दहा रेंजर्सही ठार झाले होते.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान