शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Election 2026: अर्ज माघारीसाठी ५०-६० लाखांचं आमिष, विरोधी उमेदवारांच्या घरच्यांवरही दबाव; मनसेचा खळबळजनक आरोप
2
'हिंसक निदर्शनांमध्ये अमेरिका इराणमध्ये घुसण्यास तयार'; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा
3
KDMC Election 2026: डोंबिवलीत मनसेला धक्का, शहराध्यक्षाने अचानक अर्ज घेतला मागे; भाजपा उमेदवार बिनविरोध विजयी
4
Rahul Gandhi : "पाणी नाही, विष वाटलं, प्रशासन कुंभकर्णासारखं झोपेत"; राहुल गांधी आक्रमक, विचारले संतप्त सवाल
5
मनसेच्या बंडखोर उमेदवार अनिशा माजगावकर नॉट रिचेबल! खासदाराच्या मुलीविरोधात मैदानात 
6
Thane Municipal Election 2026: ठाण्यात एकनाथ शिंदेंचा मोठा धमाका! शिवसेनेचे पाच नगरसेवक बिनविरोध विजयी
7
पाकिस्तानच्या हाती लागला मोठा खजिना; देशाची गरिबी दूर होणार? पीएम शरीफ म्हणाले...
8
एकटी पाहून घरात घुसला, बळजबरी करू लागला, तरुणीने कुऱ्हाड उचलली आणि...
9
KFC आणि Pizza Hut च्या पॅरेंट कंपन्यांचं होणार मेगा मर्जर; McDonald’s आणि Domino’s चं टेन्शन वाढणार
10
मुंबईत मनसेला खिंडार, एकाचवेळी ११ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे; भाजपात प्रवेश, कारण काय?
11
NPS मध्ये ऐतिहासिक सुधारणा: बँका स्थापन करू शकतील पेन्शन फंड, शुल्क आणि पैसे काढण्याचे नियमही बदलले
12
नाशिकमध्ये अर्ज मागे घेताना भाजपाच्या दोन उमेदवारांमध्ये हाणामारी, निवडणूक कार्यालयासमोरच भिडले
13
'तुम्ही दहशत पसरवली, तर भारत गप्प बसणार नाही', जयशंकर यांचा पाकिस्तानवर निशाणा
14
इराणमध्ये सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न, १०० बंदुका जप्त; खामेनींच्या सैन्याने सादर केले पुरावे
15
दशकभराच्या प्रवासाचा अखेर! टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार; चाहत्यांना मोठा धक्का
16
Gold Silver Price Today: २०२६ मध्येही सोन्या-चांदीची चमक कायम; चांदी ५६५६ रुपयांनी महागली, सोन्यातही जोरदार तेजी
17
'पाकिस्तानला उखडून टाका, आम्ही भारताबरोबर'; 'पाक'मधून कोणत्या नेत्याने लिहिले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना ओपन लेटर?
18
Health Tips: तरुणांमध्ये कॅन्सर वाढण्याची ५ धक्कादायक कारणं; डॉक्टरांनी सांगितले तातडीचे उपाय
19
"ज्यांच्यामुळे श्वास गुदमरत होता, ते आता च्यवनप्राश देताहेत का?" आशिष शेलारांचा राज ठाकरेंना सवाल
20
भाजपा नगरसेवकाच्या मुलाची गुंडगिरी; पोलिसाला मारली कानाखाली, संतप्त जमावाने दिला चोप
Daily Top 2Weekly Top 5

'तुम्ही दहशत पसरवली, तर भारत गप्प बसणार नाही', जयशंकर यांचा पाकिस्तानवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 14:51 IST

'आम्हाला स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार; दहशतवादावर भारत कोणताही बाह्य दबाव स्वीकारणार नाही,'

India-Pakistan : भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताची भूमिका स्पष्ट केली. दहशतवादाला प्रत्युत्तर देताना भारत कोणताही बाह्य दबाव किंवा सल्ला स्वीकारणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. सीमा पार दहशतवादाची तुलना पाणी वाटपासारख्या करारांशी करत त्यांनी स्पष्ट केले की, दहशतवाद सुरू असताना चांगले शेजारी संबंध शक्य नाहीत.

IIT मद्रासमधील कार्यक्रमात स्पष्ट भूमिका

आयआयटी मंद्रास येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना जयशंकर म्हणाले की, भारत आपली सुरक्षा आणि राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलेल. दहशतवाद कसा हाताळायचा, याचा निर्णय भारत स्वतः घेईल. या बाबतीत कोणताही देश भारतावर दबाव टाकू शकत नाही.

दहशतवादाला प्रोत्साहन देणारा ‘वाईट शेजारी’

पाकिस्तानचे नाव न घेता जयशंकर यांनी सांगितले की, अनेक देशांना वाईट शेजाऱ्यांचा सामना करावा लागतो, मात्र भारताची परिस्थिती अधिक गंभीर आहे. कारण काही ठिकाणी दहशतवाद हा जणू राज्याची नीतीच बनवण्यात आली आहे. जर एखादा देश जाणीवपूर्वक आणि सातत्याने दहशतवादाला प्रोत्साहन देत असेल, तर भारताला आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि तो अधिकार वापरला जाईल.

पाणीवाटप आणि दहशतवाद एकत्र चालू शकत नाही

सीमा पार दहशतवादाचा संदर्भ देताना जयशंकर यांनी पाणीवाटपाच्या करारांवरही भाष्य केले. भारताने अनेक दशकांपूर्वी पाणी वाटपाचा करार केला, मात्र असे करार चांगल्या शेजारी संबंधांवर आधारित असतात, असे त्यांनी स्पष्ट केले. दशकानुदशके दहशतवाद सुरू असेल, तर चांगले शेजारी संबंध टिकू शकत नाहीत. जर चांगले संबंध नसतील, तर त्यांचे फायदेही मिळू शकत नाहीत. पाणीही हवे आणि दहशतवादही चालू ठेवायचा, शक्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : India won't stay silent if terror spreads: Jaishankar to Pakistan.

Web Summary : Jaishankar asserted India's stance on terrorism, rejecting external pressure. He emphasized that good neighborly relations are impossible with ongoing cross-border terrorism. India will protect its interests and won't tolerate state-sponsored terror. Water agreements require good relations, incompatible with continuous terrorism.
टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारतPakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला