शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

2022 पर्यंत भारत भ्रष्टाचार आणि दहशतवादमुक्त असेल - निती आयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2017 6:22 PM

सरकारची थिंक टँक समजल्या जाणा-या निती आयोगने 2022 मध्ये नवा भारत पहायला मिळेल असा दावा केला आहे. निती आयोगने केलेल्या दाव्यानुसार, 2022 सालापर्यंत भारतातून गरिबी, भ्रष्टाचार, अस्वच्छता, दहशतवाद जातीवाद आणि सांप्रदायिकता हद्दपार झालेलं असेल.

ठळक मुद्देनिती आयोगने 2022 मध्ये नवा भारत पहायला मिळेल असा दावा केला आहे'2022 सालापर्यंत भारतातून गरिबी, भ्रष्टाचार, अस्वच्छता, दहशतवाद जातीवाद आणि सांप्रदायिकता हद्दपार झालेलं असेल''भारताचा प्रगती स्तर आठ टक्के कायम राहिला तर 2047 पर्यंत जगातील पहिल्या तीन इकॉनॉमीमध्ये भारताचा समावेश '

नवी दिल्ली - सरकारची थिंक टँक समजल्या जाणा-या निती आयोगने 2022 मध्ये नवा भारत पहायला मिळेल असा दावा केला आहे. निती आयोगने केलेल्या दाव्यानुसार, 2022 सालापर्यंत भारतातून गरिबी, भ्रष्टाचार, अस्वच्छता, दहशतवाद जातीवाद आणि सांप्रदायिकता हद्दपार झालेलं असेल. निती आयोगचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी गेल्या महिन्यात कॉन्फरन्स ऑफ गव्हर्नर्समध्ये सादर केलेल्या न्यू इंडिया @2022 डॉक्युमेंटमध्ये ही माहिती दिली आहे. भारताचा प्रगती स्तर आठ टक्के कायम राहिला तर 2047 पर्यंत जगातील पहिल्या तीन इकॉनॉमीमध्ये भारताचा समावेश असेल असा अंदाजही राजीव कुमार यांनी लावला आहे. 

2022 मध्ये भारत कुपोषणमुक्त असेल असाही अंदाज राजीव कुमार यांनी आपल्या डॉक्युमेंटमधून केला आहे. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, 2019 पर्यंत भारतात सरकार प्रधानमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक गावाशी जोडले जाण्यात सक्षम होईल. याशिवाय 2022 पर्यंत भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 20 उच्च शिक्षण संस्था असतील असंही सांगण्यात आलं आहे. 

प्रधानमंत्री आदर्श गाव योजनेअंतर्गत सर्व गावांना 'माडेल विलेज'चा दर्जा देण्यात येईल असंही रिपोर्टमधून सांगण्यात आलं आहे. 2022 पर्यत भारत गरिबीचा प्रश्न सोडवण्यात यशस्वी होईल असा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.  

टॅग्स :NIti Ayogनिती आयोगTerrorismदहशतवादCorruptionभ्रष्टाचार