"भारताची फाळणी झाली कारण...", सरसंघचालक मोहन भागव यांनी स्पष्टच सांगितलं; हिंदू-मुस्लीम ऐक्यावरही बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 00:50 IST2026-02-08T00:49:01+5:302026-02-08T00:50:48+5:30

भागवत म्हणाले की एखाद्या व्यक्तीचा धर्म, खाण्याच्या सवयी आणि भाषा वेगळी असू शकते, परंतु आपण सर्व समाज, संस्कृती आणि राष्ट्र म्हणून एक आहोत. आपण त्याला 'हिंदुत्व' म्हणतो आणि तुम्ही त्याला 'भारतीयता' म्हणू शकता.

India was partitioned because hindu bhav was forgotten RSS chief Mohan Bhagwat clearly stated; also spoke about Hindu-Muslim unity | "भारताची फाळणी झाली कारण...", सरसंघचालक मोहन भागव यांनी स्पष्टच सांगितलं; हिंदू-मुस्लीम ऐक्यावरही बोलले

"भारताची फाळणी झाली कारण...", सरसंघचालक मोहन भागव यांनी स्पष्टच सांगितलं; हिंदू-मुस्लीम ऐक्यावरही बोलले


"आपल्या देशात इस्लामच्या आक्रमानाबरोबर मुस्लीम आले. अद्यापपर्यंत आहेत. त्यांचा इस्लाम गेला नाही. आपल्या बोरोबर आहेत. ख्रिश्चन आले. त्यांची ख्रिश्चनिटी कायम आहे. आपसात खूट-खूट होत राहते. मात्र, देश तुटला असे कधी झाले नाही. एकदाच तुटला, जेव्हा  ‘हिंदू भावाचे विस्मरण झाले", असे राष्ट्रीय स्वयंंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ते मुंबईत "आरएसएसचा १०० वर्षांचा प्रवास: नवीन क्षितिज" या कार्यक्रमात बोलत होते.

हिंदुत्व सुरक्षिततेची हमी देते -
भागवत म्हणाले, "हिंदू असण्याचा अर्थ असा नाही की एखाद्या व्यक्तीने त्यांचा धर्म पाळणे थांबवावे. हिंदुत्व स्वीकारल्याने तुम्ही काहीही गमावत नाही, तुमच्या धार्मिक पद्धती किंवा तुमची भाषाही गमावत नाही. हिंदुत्व तुमच्या सुरक्षिततेची हमी देते. भागवत म्हणाले की एखाद्या व्यक्तीचा धर्म, खाण्याच्या सवयी आणि भाषा वेगळी असू शकते, परंतु आपण सर्व समाज, संस्कृती आणि राष्ट्र म्हणून एक आहोत. आपण त्याला 'हिंदुत्व' म्हणतो आणि तुम्ही त्याला 'भारतीयता' म्हणू शकता.

भागवत पुढे म्हणाले, हिंदू-मुस्लिम ऐक्य हा चुकीचा वाक्यांश आहे कारण तुम्ही दोन (वेगळ्या) लोकांना एकत्र करत आहात, जे आधीच एक आहेत त्यांना नाही. ते म्हणाले की आरएसएस समजून घेण्यासाठी संवाद आवश्यक आहे आणि संघटनेचे स्वरूप धारणा आणि प्रचाराच्या आधारे समजले जाऊ शकत नाही.

भागवत म्हणाले, "जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपण विरोध केला तरी हरकत नाही. पण तो तथ्यात्मक आधारावर असावा, तसा असेल तर आम्ही तो दुरुस्त करू, परंतु तथ्य जाणून घेण्यासाठी तुम्हाला आमच्याकडे यावे लागेल. न्याय्य आणि शांततापूर्ण सहअस्तित्वाची शक्ती सक्रिय करणे आवश्यक आहे आणि आपण एकमेकांना पूरक असणे आवश्यक आहे. तरुण पिढी अंमली पदार्थांच्या व्यसनात अडकू नये किंवा आत्महत्येचे विचार विकसित करू नयेत यासाठी कुटुंबांमध्ये संवाद आवश्यक आहे. ते म्हणाले, "स्वाभिमान" आणि "स्व-जागरूकता" आवश्यक आहे.
 

Web Title : विभाजन भूली हुई हिंदू भाईचारे के कारण: मोहन भागवत

Web Summary : मोहन भागवत ने कहा कि भारत का विभाजन हिंदू भाईचारे को भुलाने के कारण हुआ। उन्होंने जोर देकर कहा कि हिंदुत्व धार्मिक समझौता किए बिना सुरक्षा सुनिश्चित करता है। आरएसएस को समझने के लिए संवाद जरूरी है, तथ्यात्मक आधार पर इसका विरोध करें। उन्होंने एकता और शांति की वकालत की।

Web Title : Partition happened due to forgotten Hindu brotherhood: Mohan Bhagwat

Web Summary : Mohan Bhagwat stated India's partition occurred due to forgotten Hindu brotherhood. He emphasized Hindutva ensures safety without religious compromise. Dialogue is essential to understand RSS, opposing it with factual basis. He advocates for unity and peace.