शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

ना बंदूक, ना युद्द....चीनची आर्थिक कोंडी करुन भारत करणार चीनचा पराभव 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2017 7:46 PM

भारत सरकारने चीनला धडा शिकवण्यासाठी मास्टरप्लान आखला आहे

नवी दिल्ली, दि. 19 - सिक्कीम सेक्टरमध्ये डोकलामच्या मुद्द्यावर सुरु असलेला तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून भारत आणि चीनी सैनिक एकमेकांसमोर उभे असून, कोणीही माघार घेण्यास तयार नाही. चीन वारंवार युद्धाची धमकी देत असताना, भारत सरकारने मात्र चीनला धडा शिकवण्यासाठी मास्टरप्लान आखला आहे. चीनची आर्थिक कोंडी करत मोठी जखम देण्याची तयारी सरकारने सुरु केली आहे. 

चीनला आर्थिक बाजूने घेरण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. वीज, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या पुरवठ्यासाठी संबंधित नियम अजून कडक करण्याचा विचार सरकारकडून सुरु आहे. यामुळे चीनी कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळणं कठीण होईल. 

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी (CEA) देशातील पॉवर स्टेशन्स आणि स्मार्ट ग्रिड सिस्टम्सला सायबर हल्ल्यांपासून रोखण्यासाठी ज्या प्रकारचा रोडमॅप तयार करत आहे, त्यामुळे चिनी कंपन्यांना यामध्ये प्रवेश करणं कठीण होणार आहे. 

त्याचप्रमाणे टेलिकॉम सेक्टरमध्येही सुरक्षेचे नियम अजून कठीण केले जाण्याची शक्यता आहे. टेलिकॉम सेक्टरमध्ये सध्या चिनी कंपन्यांचा दबदबा आहे. गेल्याच आठवड्यात स्मार्टफोन तयार करणा-या 21 कंपन्यांना डाटाचोरीच्या संशयाखाली नोटीस पाठवण्यात आली आहे. यामध्ये चिनी कंपन्यांची संख्या जास्त आहे. शाओमी, लिनोव्हो, ओप्पो, विवो आणि जिओनी यांचा बाजारात दबदबा असून, अर्ध्याहून जास्त मार्केटवर त्यांचा प्रभाव आहे.

भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती आणि वितरणासाठी चिनी साहित्याचा वापर केला जातो. ट्रान्समिशन लाईन पसरवण्यासाठी बोली लावणा-या कंपन्यांमध्ये सीएलपी इंडिया प्रायवेट लि. सोबत चिनी कंपनीही सामील असल्याचं केंद्रीय ऊर्जामंत्री पियूष गोयल यांनी सांगितलं होतं. पॉवर ट्रान्समिशनमधील नव्या नियमांमुळे स्थानिक कंपन्यांना मदत मिळणार आहे. सुरक्षा यंत्रणांनी चीनी साहित्यांसाठी अनेक नियम लागू केला असून, त्यांची तपासणी करायचं ठवलं आहे. 

दरम्यान डोकलाम मुद्यावरुन भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या संघर्षात जपान भारताच्या बाजूने उभा राहिला असल्याने चीनचा संताप झाला आहे. जपानने भारताला पाठिंबा दिला असल्याने चीनने नाराजी व्यक्त केली आहे. 'जरी जपानला भारताला समर्थन द्यावेसे वाटत असले, तरी त्यांनी भारत - चीनमध्ये सुरु असलेल्या वादावर भाष्य करण्याची गरज नाही', असं चीनकडून सांगण्यात आलं आहे. जपानने भारताला पाठिंबा देताना कुठल्याही देशाने जबरदस्ती, दडपशाहीच्या मार्गाने डोकलाममधील जैसे थे परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करु नये असे म्हटले आहे. 

टॅग्स :chinaचीनDoklamडोकलामIndiaभारत