शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

पाकिस्तानमधील महागाईसाठी भारत जबाबदार; इम्रान खानच्या मंत्र्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2019 4:20 PM

पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉननुसार अजहर यांनी खाद्य पदार्थांचे दर वाढल्याचे खापर भारतावर फो़डले आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोसळली असून तेथील महागाईसाठी भारत जबाबदार असल्याचा दावा पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्र्याने केला आहे. पाकिस्तानातील अर्थ मंत्री हमाद अजहर यांनी देशातील खाद्यपदार्थांच्या वाढत्या किंमतींसाठी भारतासोबतचा व्यापार रद्द झाल्याचे कारण दिले आहे. पाकिस्तानातील टॉमेटोचे दर 400 रुपयांवर पोहोचले आहेत. 

पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉननुसार अजहर यांनी खाद्य पदार्थांचे दर वाढल्याचे खापर भारतावर फो़डले आहे. वस्तूंच्या किंमतींनी मोठी झेप घेतली असून भारताने व्यापार रद्द केल्याने असे झाल्याचे अजहर यांनी सांगितले. पाकिस्तानी अर्थव्यवस्था सध्या परदेशी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली आहे आणि महागाईने लोकांचे कंबरडे मोडले आहे. 

पाकिस्तानातील महागाईला हवामानाच्या लहरीपणासोबत त्यांनी दलालांनाही जबाबदार धरले आहे. केंद्र स्वस्त बाजार उभारण्यासाठी प्रांतीय सरकारांसोबत चर्चा करत आहे. महागाईने नागरिक त्रस्त असून जानेवारी-फेब्रुवारीनंतर महागाई कमी होण्यास सुरुवात होईल, असा दावाही अजहर यांनी केला आहे. 

पाकिस्तानला लाखो डॉलरच्या कर्जाची परतफेड चीनकडे करायची आहे. पाकिस्तानमध्ये पुढील 12 महिने महागाई दर 13 टक्के राहणार आहे. यंदाचा हा दर 7.3 टक्के राहण्याची शक्यता आहे. तर 2018 मध्ये महागाई दर 3.9 टक्के होता. इम्रान खानला अमेरिकेनेही मदत नाकारली आहे. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानInflationमहागाई