शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
8
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
9
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
10
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
11
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
12
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
13
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
14
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
15
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
16
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
17
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
18
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
19
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
20
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस आणि भूस्खलनामुळे उत्तराखंडमधये 47, केरळमध्ये 27 तर नेपाळमध्ये 21 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 11:41 IST

आयएमडीने अंदाज वर्तवला आहे की, 20 ऑक्टोबरपासून केरळच्या अनेक भागात तीन दिवस पाऊस सुरू राहू शकतो.

ठळक मुद्दे केरळमध्ये 1 ते 19 ऑक्टोबर दरम्यान 135% जास्त पावसाची नोंद झाली आहे. उत्तराखंड आणि नेपाळमधील पावसामुळे यूपीतील अनेक नद्यांच्या पातळीत वाढ.

नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे उत्तराखंड आणि केरळमध्ये हाहाकार माजलाय. मंगळवारी उत्तराखंडमध्ये पूर आणि पावसामुळे झालेल्या अपघातात 42 जणांचा मृत्यू झाला. बहुतेक मृत्यू ढगफुटी आणि भूस्खलनामुळे झाले आहेत. अनेक लोक अजूनही ढिगाऱ्याखाली दबलेले आहेत. तर, तिकडे केरळमध्येही विविध घटनांमध्ये आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे.

केरळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे 27 जणांचा मृत्यू

केरळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे, ज्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे किमान 27 लोकांचा मृत्यू झाला आहे. काही लोक बेपत्ता झाल्याचेही वृत्त आहे. भारतीय हवामान विभागाने सांगितले की, राज्यात 1 ते 19 ऑक्टोबर दरम्यान 135% अधिक पाऊस झाला आहे. साधारणपणे, या काळात 192.7 मिमी पाऊस पडतो, परंतु यावर्षी 453.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

केरळच्या 11 जिल्ह्यांमध्ये पावसासाठी ऑरेंज अलर्ट

आयएमडीने अंदाज वर्तवला आहे की 20 ऑक्टोबरपासून केरळच्या अनेक भागात तीन दिवस पाऊस सुरू राहू शकतो. हवामान विभागाने आज तिरुअनंतपुरम, पठाणमथिट्टा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर, पलक्कड, मलप्पुरम, कोझीकोड, वायनाड आणि कन्नूरसह राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कासारगोड, अलप्पुझा आणि कोल्लममध्ये पिवळा इशारा सुरू आहे. 21 ऑक्टोबर रोजी कन्नूर आणि कासारगोड वगळता सर्व जिल्ह्यांसाठी विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

उत्तर प्रदेशातही अलर्ट जारी
उत्तराखंड आणि नेपाळमधील मुसळधार पावसाचा परिणाम आता उत्तर प्रदेशातही दिसून येत आहे. उत्तर प्रदेशातील अनेक नद्यांच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. लखीमपूर खेरी, सीतापूर आणि बाराबंकीमध्ये पुराचा इशारा जारी करण्यात आला आहे. नद्यांच्या काठावर राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. वास्तविक, उत्तराखंडमधून बनबसा बंधाऱ्यातून पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे कोसी नदीने रामपूर परिसरात कहर सुरू केला आहे. नदीलगतच्या डझनभर गावांना पुराचा धोका आहे. प्रशासनाने मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे.

नेपाळमध्येही पावसामुळे 21 जणांचा मृत्यू

मुसळधार पावसाचा फटका नेपाळलाही बसला आहे. पुरामुळे नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये 21 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 24 लोक बेपत्ता आहेत. नेपाळच्या गृहमंत्रालयाने म्हटले आहे की, देशातील 19 जिल्हे पूर आणि भूस्खलनामुळे खूप प्रभावित झाले आहेत. देशात मान्सून हंगाम आधीच संपला होता, परंतु हवामानात अचानक बदल झाला आहे.


 

टॅग्स :RainपाऊसUttarakhandउत्तराखंडUttar Pradeshउत्तर प्रदेशKeralaकेरळKerala Floodsकेरळ पूरNepalनेपाळ