शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
2
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
3
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
4
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
5
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
6
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
7
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
8
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
10
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
11
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
12
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
13
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
14
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव
15
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
16
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
17
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
18
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
19
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
20
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?

कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 15:36 IST

आदमपूर एअरबेसहून पाकिस्तानच्या कुठल्याही ठिकाणी टार्गेट हल्ला करू शकतो. भारतीय हवाई दलाचे ते ४७ वं स्क्वाड्रन आहे. ज्याला ब्लॅक आर्चर म्हणून ओळखले जाते.

आदमपूर एअरबेसवर नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दौरा केला. याठिकाणी S400 सोबत मोदींच्या फोटोने पाकिस्तानचं पितळ उघडं पडले. आदमपूर एअरबेस उद्ध्वस्त केल्याचा दावा पाकिस्तानकडून चालला होता. त्याने भारताचे एस ४०० वरही टार्गेट केल्याचे म्हटले. परंतु मोदींनी या एअरबेसवर जात तिथे जवानांसोबत संवाद साधला. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याकडून सुरू असलेला खोटा प्रचार जगासमोर उघड झाला.

आदमपूर एअरबेस पाकिस्तानसाठी कायम कटू आठवण देणारा आहे. १९६५ च्या युद्धात पाकिस्तानी सैन्याने आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. मूर्ख पाकिस्तानी सरकारने आदमपूर एअरबेसवर पाकचे कमांडो उतरवले परंतु स्थानिक पंजाबी लोक आणि शेतकऱ्यांनी लाठीकाठ्यांनी, घरगुती शस्त्रांनी या कमांडोंना इतकं मारले त्यामुळे पाकची प्रतिमा मलिन झाली. पाकिस्तानी सीमेपासून १०० किमी अंतरावरील आदमपूर एअरबेस पंजाबमधील भारतीय हवाई दलाचे दुसरा सर्वात मोठा बेस आहे. जालंधर आणि होशियापूर दरम्यान असलेला हा एअरबेस इतिहासातील शौर्याची साक्ष देणारा आहे.

आदमपूर एअरबेसहून पाकिस्तानच्या कुठल्याही ठिकाणी टार्गेट हल्ला करू शकतो. भारतीय हवाई दलाचे ते ४७ वं स्क्वाड्रन आहे. ज्याला ब्लॅक आर्चर म्हणून ओळखले जाते. १९६५ च्या युद्धात आदमपूर एअरबेससह पठाणकोट आणि हलवारा एअरबेसने पाकिस्तानच्या नाकी नऊ आणले होते. त्यामुळे हलवारा, आदमपूर आणि पठाणकोट हे भारतीय हवाई दलाचे ३ केंद्र पाकिस्तानच्या डोळ्यात खुपत होते. पाकिस्तानी वायू सेनेचे एअर कमांडर तुफैल यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. १९६५ च्या युद्धात तत्कालीन पाकिस्तानी वायूसेनाध्यक्ष एअर मार्शल असगर खान यांच्या डोक्यात सुपीक कल्पना आली. परंतु युद्ध सुरू होण्याआधीच त्यांनी पद सोडले. परंतु त्यांचा उत्तराधिकारी नूर खानने ही योजना सुरूच ठेवली.

काय होते प्लॅनिंग?

योजनेनुसार, भारताच्या तिन्ही एअरबेसवर ३ टीम एअरड्रॉप केले जातील. प्रत्येक टीममध्ये ३ अधिकाऱ्यांसह ६० कमांडो असतील. त्यांना सी १३० विमानांनी हवाई मार्गाने उतरवले जाईल. प्रत्येक टीमकडे वायरलेस असतील त्यातून संपर्क साधता येत होता. प्रत्येक कमांडोकडे २ दिवसाचे रेशन होते त्याशिवाय ४०० रूपये आणि शस्त्रे, स्फोटके, ग्रेनेड देण्यात आली होती. ७ सप्टेंबर १९६५ साली पाकिस्तानने सकाळी या तिन्ही एअरबेसवर हल्ला केला. पठाणकोट एअरबेसच्या बाजूला ६४ एसएसजी पाकिस्तानी कमांडो विमानातून उतरले. आदमपूर एअरबेसला ५५ पाकिस्तानी कमांडो उतरले तर हलवारा येथे ६३ कमांडो उतरले होते.

पाकिस्तानी कमांडो आदमपूर इथल्या एका गावाच्या मधोमध उतरले. तेव्हा स्थानिकांची नजर त्यांच्यावर पडली. त्यानंतर पारंपारिक हत्यारे, शस्त्रे घेऊन गावकऱ्यांनी पाकिस्तानी फौजेला पळवत पळवत मारले. काही पाकिस्तानी ऊसाच्या शेतात लपले. स्थानिकांनी दिसेल त्याला मारण्यास सुरुवात केली. त्याच काळात पंजाब पोलीस आणि भारतीय सैन्य तिथे पोहचले. इथून ४२ पाकिस्तानी कमांडो पकडण्यात आले आणि १२ जणांना चकमकीत ठार केले. पठाणकोट एअरबेसजवळही असेच घडले. तिथे ४५ कमांडो पकडले आणि ४ जणांना ठार केले, काही जण डोंगराळ भागातून पळून जाण्यात यशस्वी झाले.

दरम्यान, हलवारा येथेही चित्र तसेच होते. पाकिस्तानी कमांडोला एका गावात एअर ड्रॉप केले. देशात युद्धजन्य परिस्थितीमुळे लोक सतर्क होते. गावकऱ्यांनी त्वरीत पाकिस्तानी फौजेला ओळखले आणि काहींनी पुढाकार घेऊन त्यांना पकडले. याठिकाणी झालेल्या गोळीबारात ५३ पाकिस्तानी फौजेला पकडले. ६ पळून  गेले तर ४ जणांना ठार केले. या संपूर्ण ऑपरेशनमुळे पाकिस्तानची दक्षिण आशियात चांगलीच फजिती झाली. यात पाकिस्तानचे १४० कमांडो भारतीय सैन्याने पकडले तर २० मारले गेले. २२ पळून गेले. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानindian air forceभारतीय हवाई दल