शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 22:39 IST

India Pakistan War : जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा आणि बारामुल्ला जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने विनाकारण गोळीबार केला, याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले.

India Pakistan War ( Marathi News ) : गुरुवारी संध्याकाळी जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा आणि बारामुल्ला जिल्ह्यांमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने विनाकारण गोळीबार केला. याला भारतीय सशस्त्र दलांनी प्रत्युत्तर दिले. बारामुल्ला येथील बोनियार सेक्टर आणि कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार सेक्टरला पाकिस्तानने लक्ष्य केले होते, परंतु अद्यापपर्यंत कोणतीयाही जीवितहानीचे वृत्त नाही.

पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार

७ आणि ८ मे च्या मध्यंतरी रात्री, पाकिस्तानी सैन्याने जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, उरी आणि अखनूर सेक्टरच्या समोरील भागात नियंत्रण रेषेवर लहान शस्त्रे आणि तोफांमधून जोरदार गोळीबार केला. भारतीय सैन्यानेही याला प्रत्युत्तर दिले.

'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी पायाभूत सुविधांवर भारतीय सशस्त्र दलांनी केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने बुधवारी गोळीबार सुरू केल्यानंतर कर्नह भागातील बहुतेक नागरिक सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झाले होते.

नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार

पाकिस्तानकडून क्षेपणास्त्र हल्ल्याचे संकेत मिळताच भारताने ए-४०० प्रणाली सक्रिय केली असून, पाकिस्तानने जम्मू आणि सांबाच्या दिशेने डागलेली क्षेपणास्त्रे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. आतापर्यंत पाकिस्तानची आठ क्षेपणास्त्रे पाडण्यात आल्याचं प्राथमिक वृत्त आहे. त्याशिवाय सांबा आणि अखनूर क्षेत्रात नियंत्रण रेषेपलीकडून पाकिस्तानने भीषण गोळीबार सुरू केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आरएसपुरा विभागात ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. तसेच जम्मू शहरामध्ये मोबाईल नेटवर्क जॅम झाले आहेत. हल्ल्याचे सायरन वाजत आहेत. तसेच सतवारी कॅम्पवरही हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानIndiaभारत