India Pakistan War ( Marathi News ) : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. काल रात्रीपासून पाकिस्तानने पुन्हा हल्ला सुरू केला. या हल्ल्याला भारतानेही प्रत्युत्तर दिले. दरम्यान, आता भारतीय हवाई दलानंतर आता नौदलही सक्रिय झाले आहे. अरबी समुद्रात तैनात असलेल्या आयएनएस विक्रांत अॅक्शन मोडवर आहे. समुद्रातील हालचालींवर लक्ष ठेऊन आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीवर आयएनएस विक्रांत लक्ष ठेऊन आहे. समुद्रमार्गे पाकिस्तान हल्ला करु शकते यामुळे नौदलानेही गस्त वाढवली आहे.
India Pakistan War :'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
पाकिस्तानी नौदलाचे कराची आणि ओरमारा येथे तळ आहेत. तिथे त्यांच्या उच्च अधिकाऱ्यांचे मुख्यालय, युद्धनौका आणि पाणबुड्या तैनात आहेत. या ठिकाणावरुन पाकिस्तान समुद्र मार्गे हल्ला करु शकते. यामुळे या ठिकाणीच भारतीय नौदलाने गस्त वाढवली आहे.
याची पाकिस्तानला भीती
अरबी समुद्रात आयएनएस विक्रांतच्या तैनातीची पाकिस्तानला आधीच भीती आहे. या विमानवाहू जहाजामध्ये ३० मिग २९के लढाऊ विमान आहेत . हे भारताचे पाण्यात तरंगणारे हवाई तळ आहे. या विमानवाहू जहाजासोबत अनेक विध्वंसक, फ्रिगेट्स, इंधन भरणारी जहाजे आणि पाणबुड्यांचा ताफा आहे. यामुळे या युद्धनौकेला टक्कर देणे अशक्य आहे.