शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 10:55 IST

India Pakistan Ceasefire: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Imran Masood on India Pakistan Ceasefire: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर तीव्र हल्लेदेखील केले. हा तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेच्या मध्यस्तीने शनिवारी(10 मे) शस्त्रसंधी घोषित करण्यात आला. पण, आता यावरुनच विरोधी पक्ष सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. 

काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्यकाँग्रेस खासदार इम्रान मसूद भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीवर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "आमचे नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. नेमके काय घडत आहे, ते आम्हाला समजत नाहीय. भारतीय सैन्याने आपले शौर्य दाखवले आणि शत्रूच्या घरात घुसून त्याला धूळ चारायला लावली. पण, त्यानंतर अचानक तिसऱ्या देशाने बाहेरुन शस्त्रसंधी लागू केल्याची घोषणा केली आणि आपणही ते स्वीकारले. हे समजण्यापलीकडे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढे येऊन काय घडत आहे, ते सांगावे," अशी मागणी त्यांनी केली.

काश्मीर आमचा होता आणि राहील...

ते पुढे म्हणतात, "पाकिस्तान हा एक धूर्त देश आहे. तो कधीही सत्य सांगणार नाही. एकीकडे शस्त्रसंधी जाहीर केली जातो, तर दुसरीकडे पाकिस्तान त्याचे उल्लंघन करतो. दहशतवादाला मुळापासून नष्ट करण्याची गरज आहे, यासाठी संपूर्ण देश आज एकजुटीने उभा आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की, काश्मीरचा प्रश्न मध्यस्थीने सोडवला जाईल. काश्मीर आमचा होता, आमचा आहे आणि आमचाच राहील. मला वाटत नाही की कोणताही भारतीय काश्मीरवर तडजोड करण्याचा विचारही करू शकेल. म्हणून, आमची मागणी अशी आहे की पंतप्रधानांनी पुढे येऊन काय घडत आहे ते सांगावे," असेही ते म्हणाले.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाcongressकाँग्रेसBJPभाजपा