शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! राज्यातील काही ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलल्या; कारण काय?
2
हिटमॅन रोहित शर्मा वनडेचा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
3
दुसऱ्या पत्नीचे विवाह प्रमाणपत्र की पहिली पत्नी कायदेशीर? मालमत्ता वादात मुंबई कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
पहिल्याच 'ब्लाइंड डेट'वर भेटला, अवघ्या ४ तासांत लग्नही केले; पण एका महिन्यात होत्याचे नव्हते झाले!
5
'फोडाफोडीत त्यांचं आयुष्य, भाजप हा पूर्णपणे बाटलेला पक्ष...'; माणिकराव कोकाटेंची टीका
6
सूरज चव्हाणच्या लग्नातील खास क्षणांचे फोटो समोर, बायकोच्या पारंपरिक मंगळसूत्राने वेधलं लक्ष
7
महामार्ग बनला मृत्युमार्ग, भरधाव ट्रकची ८ दुचाकींना धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू 
8
आर्थिक जगतासाठी 'रेड अलर्ट'! जपानमुळे जगातील सर्वात मोठा 'असेट बबल' फुटणार, कियोसाकींचा इशारा
9
आंतरराष्ट्रीय दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड, 3 दहशतवाद्यांना अटक; ISI शी थेट संबंध...
10
मोक्षदा एकदाशी २०२५: मोक्ष म्हणजे काय? कलियुगात मोक्ष मिळू शकतो का? पाहा, ५ सोपे सरळ मार्ग!
11
दिल्ली बॉम्बस्फोटाचे कनेक्शन बिहारमध्ये? खगडियामध्ये एनआयएची छापेमारी; मेटल डिटेक्टरने घराची तपासणी
12
मोक्षदा एकदाशी २०२५: ‘असे’ करा व्रत, वाचा, महती अन् महत्त्व; मोक्ष प्राप्तीचा सापडेल मार्ग!
13
मोफत योजना निवडणुका जिंकवू शकतील, पण देश...! माजी RBI गव्हर्नर डी. सुब्बाराव यांची बोचरी टीका
14
मोक्षदा एकदाशी २०२५: ‘या’ २ खास कारणांमुळे ही एकादशी ठरते अगदी विशेष अन् वेगळी; कशी? वाचा
15
बाजारात पडणार 'पैशांचा पाऊस'! २ महिन्यांत येणार ४०,००० कोटींचे २० हून अधिक IPO; 'या' कंपन्या आघाडीवर!
16
'निवडणुका काही वार्डात अचानक स्थगित करणे हा लोकशाहीला धक्का देणारा निर्णय'; यशोमती ठाकुर यांचा हल्लाबोल
17
टी-२० मध्ये सुपरफास्ट शतक ठोकणारे भारतीय, अभिषेक शर्माने ऋषभ पंतच्या विक्रमाशी केली बरोबरी
18
IBC, इन्शुरन्स, सिक्युरिटीज मार्केट अन् हायवे..; हिवाळी अधिवेशनात 14 विधेयके सादर होणार
19
शरद पवारांसमोर नवा पेच, अजित पवारांसोबत जाण्याला प्रशांत जगताप यांचा विरोध; थेट राजकारण सोडण्याचे संकेत
20
विराट कोहली कसोटीतील निवृत्ती मागे घेणार? माध्यमांत चर्चा, आता BCCI नं दिलं असं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 15:08 IST

India Retaliates Pakistan Attack: भारताने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. भारताने मोठी लष्करी कारवाई करून पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त केली आहे.

भारताने सुरू केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्येपाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. भारतानेपाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेवर हल्ला करून ती यंत्रणा उद्ध्वस्त केली आहे. यासंदर्भातील माहिती भारताच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. भारताच्या हल्ल्यांमध्ये क्षेपणास्त्र लाँचर्सचेही मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानला चीनकडून HQ-9 हवाई संरक्षण प्रणाली मिळाली आहे.

Operation Sindoor: मोठी बातमी! कंधार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा

पाकिस्तानी लोक चीनच्या HQ-9 ची तुलना भारताच्या S-400 हवाई संरक्षण प्रणालीशी करतात. पण आता भारताने HQ-9 तांत्रिकदृष्ट्या S-400 समोर कुठेही टिकत नाही हे दाखवून दिले आहे. HQ-9 ची रडार प्रणाली भारताच्या ब्राह्मोस सारख्या सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांना रोखू शकेल अशी जवळजवळ कोणतीही शक्यता नाही. S-400 ची मारा क्षमता 400 किलोमीटर आहे आणि ती खूप कमी वेळात कार्यान्वित होऊ शकते. 

पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केला

भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर चवताळलेल्या पाकिस्तानने ७ आणि ८ मे २०२५ च्या रात्री अमृतसर, अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, जालंधर, भुज, आदमपूर, भटिंडा, लुधियाना भारतीय लष्कराच्या तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय सैन्याने पाकिस्तानचा हा प्रयत्न हाणून पाडला. दरम्यान, HQ-9 ही चायना प्रेसिजन मशिनरी इम्पोर्ट-एक्सपोर्ट कॉर्पोरेशनने विकसित केलेली एक पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये S-400 ची महत्वाची भूमिका

'ऑपरेशन सिंदूर' मध्ये भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यासाठी हॅमर, स्कॅल्प आणि इतर अचूक शस्त्रांचा वापर केला. या ऑपरेशनमध्येही एस-४०० ने भारतीय हवाई क्षेत्राचे रक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. शत्रूच्या कोणत्याही प्रतिहल्ल्याला हाणून पाडण्यासाठी ही प्रणाली सज्ज होती, यामुळे भारतीय लढाऊ विमानांना सुरक्षितपणे ऑपरेशन पूर्ण करता आले.

पाकिस्तानचे अलिकडचे हल्ले हाणून पाडण्यात s-400 ने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली. या प्रणालीने शत्रूचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केले, त्यामुळे भारतीय शहरांचे कोणतेही नुकसान झाले नाही. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानIndiaभारतIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकwarयुद्धIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानindian air forceभारतीय हवाई दल