शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
3
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
4
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
5
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
6
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
7
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
9
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
10
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
11
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
12
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
13
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
14
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
15
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
16
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
17
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
18
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
19
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
20
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 13:48 IST

२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने काही कठोर पावलं उचलली आहेत.

सिंधु पाणी करार स्थगित करण्याच्या भारताच्या निर्णयामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान होऊ शकते. याचा खरीप हंगामावर मोठा परिणाम होऊ शकतो. पाकिस्तानमध्ये २० टक्क्यांहून अधिक पाण्याची कमतरता भासू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने काही कठोर पावलं उचलली आहेत. या हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा बळी गेला होता. 

मीडिया रिपोर्टनुसार, आयआरएसए म्हणजेच सिंधु नदी प्रणाली प्राधिकरणाच्या सल्लागार समितीने खरीप हंगामाच्या सुरुवातीला पाकिस्तानमध्ये २१ टक्के पाण्याची कमतरता भासण्याचा अंदाज वर्तवला आहे. चिनाब नदीतील पाण्याची घट हे या मागचे मोठे कारण आहे.भारताने चिनाब नदीवरील सलाल आणि बागलिहार धरणांचे दरवाजे बंद केले आहेत, ज्यामुळे पाण्याची पातळी कमी झाली असून, पाकिस्तानमधील पाण्याच्या प्रवाहवर याचा परिणाम झाला आहे. 

आता केंद्र सरकार किशनगंगा धरणावर पाकिस्तानविरुद्ध अशीच कारवाई करण्याचा विचार करत असल्याचे म्हटले जात आहे. या संदर्भात आयआरएसएच्या सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत मे ते सप्टेंबर २०२५ या कालावधीतील खरीप हंगामाच्या तयारीबाबत चर्चा झाली. रिपोर्ट्सनुसार, आयआरएसएने म्हटले की, 'सिंधु नदी सल्लागार समितीने खरीप हंगामाच्या सुरुवातीच्या आणि खरीप हंगामाच्या अखेरच्या महिन्यांसाठी पाण्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. भारताने पाणी पुरवठा थांबवल्यानंतर चिनाब नदीचा प्रवाह अचानक कमी झाल्यामुळे खरीप हंगामाच्या सुरुवातीला तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती आहे.'    

सध्या या परिस्थितीचा आढावा घेतला जात असून, चिनाबमधील पाण्याचा प्रवाह आणखी कमी झाला तर २१ टक्क्यांहून अधिक पाणी टंचाई भासू शकते. तर, बागलिहार आणि सलाल धरणाचे दरवाजे बंद झाल्याने ही परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, असे समितीने म्हटले आहे.