शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 13:48 IST

२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने काही कठोर पावलं उचलली आहेत.

सिंधु पाणी करार स्थगित करण्याच्या भारताच्या निर्णयामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान होऊ शकते. याचा खरीप हंगामावर मोठा परिणाम होऊ शकतो. पाकिस्तानमध्ये २० टक्क्यांहून अधिक पाण्याची कमतरता भासू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने काही कठोर पावलं उचलली आहेत. या हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा बळी गेला होता. 

मीडिया रिपोर्टनुसार, आयआरएसए म्हणजेच सिंधु नदी प्रणाली प्राधिकरणाच्या सल्लागार समितीने खरीप हंगामाच्या सुरुवातीला पाकिस्तानमध्ये २१ टक्के पाण्याची कमतरता भासण्याचा अंदाज वर्तवला आहे. चिनाब नदीतील पाण्याची घट हे या मागचे मोठे कारण आहे.भारताने चिनाब नदीवरील सलाल आणि बागलिहार धरणांचे दरवाजे बंद केले आहेत, ज्यामुळे पाण्याची पातळी कमी झाली असून, पाकिस्तानमधील पाण्याच्या प्रवाहवर याचा परिणाम झाला आहे. 

आता केंद्र सरकार किशनगंगा धरणावर पाकिस्तानविरुद्ध अशीच कारवाई करण्याचा विचार करत असल्याचे म्हटले जात आहे. या संदर्भात आयआरएसएच्या सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत मे ते सप्टेंबर २०२५ या कालावधीतील खरीप हंगामाच्या तयारीबाबत चर्चा झाली. रिपोर्ट्सनुसार, आयआरएसएने म्हटले की, 'सिंधु नदी सल्लागार समितीने खरीप हंगामाच्या सुरुवातीच्या आणि खरीप हंगामाच्या अखेरच्या महिन्यांसाठी पाण्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. भारताने पाणी पुरवठा थांबवल्यानंतर चिनाब नदीचा प्रवाह अचानक कमी झाल्यामुळे खरीप हंगामाच्या सुरुवातीला तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती आहे.'    

सध्या या परिस्थितीचा आढावा घेतला जात असून, चिनाबमधील पाण्याचा प्रवाह आणखी कमी झाला तर २१ टक्क्यांहून अधिक पाणी टंचाई भासू शकते. तर, बागलिहार आणि सलाल धरणाचे दरवाजे बंद झाल्याने ही परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, असे समितीने म्हटले आहे.