शहरं
Join us  
Trending Stories
1
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
4
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
5
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
6
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
7
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
8
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
9
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
10
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
11
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
12
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
13
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
14
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
15
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
16
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
17
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
18
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
19
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
20
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या

सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 13:48 IST

२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने काही कठोर पावलं उचलली आहेत.

सिंधु पाणी करार स्थगित करण्याच्या भारताच्या निर्णयामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान होऊ शकते. याचा खरीप हंगामावर मोठा परिणाम होऊ शकतो. पाकिस्तानमध्ये २० टक्क्यांहून अधिक पाण्याची कमतरता भासू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने काही कठोर पावलं उचलली आहेत. या हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा बळी गेला होता. 

मीडिया रिपोर्टनुसार, आयआरएसए म्हणजेच सिंधु नदी प्रणाली प्राधिकरणाच्या सल्लागार समितीने खरीप हंगामाच्या सुरुवातीला पाकिस्तानमध्ये २१ टक्के पाण्याची कमतरता भासण्याचा अंदाज वर्तवला आहे. चिनाब नदीतील पाण्याची घट हे या मागचे मोठे कारण आहे.भारताने चिनाब नदीवरील सलाल आणि बागलिहार धरणांचे दरवाजे बंद केले आहेत, ज्यामुळे पाण्याची पातळी कमी झाली असून, पाकिस्तानमधील पाण्याच्या प्रवाहवर याचा परिणाम झाला आहे. 

आता केंद्र सरकार किशनगंगा धरणावर पाकिस्तानविरुद्ध अशीच कारवाई करण्याचा विचार करत असल्याचे म्हटले जात आहे. या संदर्भात आयआरएसएच्या सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत मे ते सप्टेंबर २०२५ या कालावधीतील खरीप हंगामाच्या तयारीबाबत चर्चा झाली. रिपोर्ट्सनुसार, आयआरएसएने म्हटले की, 'सिंधु नदी सल्लागार समितीने खरीप हंगामाच्या सुरुवातीच्या आणि खरीप हंगामाच्या अखेरच्या महिन्यांसाठी पाण्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. भारताने पाणी पुरवठा थांबवल्यानंतर चिनाब नदीचा प्रवाह अचानक कमी झाल्यामुळे खरीप हंगामाच्या सुरुवातीला तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती आहे.'    

सध्या या परिस्थितीचा आढावा घेतला जात असून, चिनाबमधील पाण्याचा प्रवाह आणखी कमी झाला तर २१ टक्क्यांहून अधिक पाणी टंचाई भासू शकते. तर, बागलिहार आणि सलाल धरणाचे दरवाजे बंद झाल्याने ही परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, असे समितीने म्हटले आहे.