शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

चीनच्या रणनीतीला भारताने दिला धक्का, भारत-आखात-युरोप कॉरिडॉरने ड्रॅगनच्या वर्चस्वाला गेला तडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 10:38 IST

India-Gulf-Europe Corridor : तंत्रज्ञान आणि आर्थिकशक्तीच्या जोरावर मध्य आशिया आणि युरोपमधील देशांवर वर्चस्व गाजवण्याच्या चीनच्या रणनीती आणि इच्छेला तडा गेला आहे.

- संजय शर्मानवी दिल्ली -  तंत्रज्ञान आणि आर्थिकशक्तीच्या जोरावर मध्य आशिया आणि युरोपमधील देशांवर वर्चस्व गाजवण्याच्या चीनच्या रणनीती आणि इच्छेला तडा गेला आहे. भारत, मध्य आशिया, युरोप आणि अमेरिका दरम्यान बांधण्यात येत असलेल्या रेल्वे, जलवाहतूक दळणवळण मार्गामुळे (कॉरिडॉर) चीनला जोरदार झटका दिला आहे.

'बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह च्या माध्यमातून चीनला मध्य-पूर्व आशियातील पेट्रोलियम उत्पादक देशांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे होते. चीनचे हे स्वप्न जी-२० परिषदेतील या एका कराराने भंग केले. हा प्रकल्प आधी चीन बांधणार होता, तो आता भारतीय अभियंते आणि भारतीय रेल्वे बांधणार आहे, हे निश्चित झाल्यानंतर चीनला मोठा धक्का बसला आहे.

चीनला बीआरआयच्या माध्यमातून मध्य आशियातील छोटे देश आणि युरोपातील काही देशांना कर्जाच्या जाळ्यात अडकवायचे होते. परंतु भारत आखात युरोप कॉरिडॉरमुळे चीनच्या मनसुब्यावर पाणी फेरले. अमेरिकाही या प्रकल्पाचा आर्थिक खर्च उचलणार आहेत. 

 युरोपचे दरवाजे आता चीनला बंद?या प्रकल्पात भारत, अमेरिका, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, जॉर्डन, इस्रायल, तुर्की, जर्मनी, इटली आदी देश सहभागी होत आहेत. हे देश सामील झाले म्हणजे चीनला आता मध्यपूर्व आशिया आणि युरोपमध्ये स्थान नाही.

भारताला सुवर्णसंधीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांच्या भेटीत या प्रकल्पातील भारताच्या महत्त्वाच्या भूमिकेवर चर्चा झाली. भारताबाहेर मध्यपूर्व आशिया आणि युरोपच्या देशांमध्ये आपले तंत्रज्ञान दाखविण्याची संधी मिळत असताना भारतीय रेल्वेसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे. भारताला आपले कौशल्य दाखविण्याची आणि परकीय गंगाजळी कमावण्याची ही मोठी संधी आहे. त्यामुळे भारताला दळणवळणाचा लाभही मिळेल.

टॅग्स :IndiaभारतchinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय