शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
4
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
5
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
6
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
7
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
8
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
9
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
10
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
11
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
12
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
13
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
14
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
15
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
17
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
18
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!
19
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
20
'कुछ कुछ होता हैं'साठी करणला मिळत नव्हती टीना; राणीपूर्वी तब्बल 8 अभिनेत्रींनी दिला होता नकार

India China FaceOff: भारतीय वायूसेनेचा चीनला दणका; सीमेवर लढाऊ विमानांचं ‘नाईट ऑपरेशन’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 11:32 AM

भारताने सीमेनजीक अतिरिक्त सैन्य बळ वाढवलं आहे तसेच लष्कराने कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयारी केली आहे.

नवी दिल्ली – लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायूसेनेने मिग १९ लढाऊ विमान आणि चिनूनक हैवीलिफ्ट विमान सीमेजवळील फॉरवर्ड एअरबेसवर नाईट ऑपरेशन केले. गलवान खोऱ्यात १५ जून रोजी झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले त्यानंतर भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढला.

भारताने सीमेनजीक अतिरिक्त सैन्य बळ वाढवलं आहे तसेच लष्कराने कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयारी केली आहे. याचाच एक भाग म्हणून भारतीय वायूदलानेही लढाऊ विमानं सीमेजवळील एअरबेसवर तैनात केली आहे.

याबाबत ज्येष्ठ लढाऊ पायलट ग्रुप कॅप्टन ए राठी म्हणाले की, नाइट ऑपरेशन हे एखाद्या सरप्राइज सारखं असतं, ज्यामुळे वायूसेना आधुनिक प्लॅटफोर्म आणि प्रेरित सैन्याच्या मदतीने कोणत्याही वातावरणात ऑपरेशन पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षित आणि तयार राहतं.

भारताच्या कठोर भूमिकेपुढे चीनने नरमाईची भूमिका घेतली. पुर्व लडाखमध्ये ज्याठिकाणी संघर्ष झाला तेथून चिनी सैन्य मागे हटण्यासाठी मान्य झालं. पण भारत चीनवर विश्वास ठेऊ इच्छित नाही त्यासाठी भारताने तयारी सुरुच ठेवली आहे.

भारताचं सामर्थ्य असलेली वायूसेना यासाठी पूर्ण ताकदीनिशी सीमेवर ऑपरेशन करत आहे. एअरफोर्सचे अपाचे अटॅक हेलिकॉप्टर सीमेवरील फॉरवर्ड एअरबेसवर ऑपरेशन करताना दिसून आलं. इतकचं नाही तर मिग २९ फायटर एअरक्राफ्ट आणि चिनूक हेवीलिफ्ट हेलिकॉप्टरही नाइट ऑपरेशनमध्ये सहभागी झालं.

दरम्यान, चीनकडून गलवान खोऱ्यातील ८०० मीटर क्षेत्रावर प्रथमच दावा यावर्षी एप्रिलमध्ये बटालियन पातळीच्या बैठकीत करण्यात आला. त्यानंतर गलवान आणि श्योक नद्यांच्या संगमावर भारताने पूल बांधण्यास सुरुवात केली. तथापि, १५ जूनचा हिंसक संघर्ष या घटनेशी संबंधित नाही. कारण ६१ वर्षापूर्वी जो करार झाला होता त्याची भारतीय सैन्याला पूर्ण माहिती होती. वास्तविक, १९५९ मध्ये भारत आणि चीन यांच्यात पेट्रोल पॉईंट १४ बाबत एकमत झाले होते, त्यानंतर अनेक वर्षांपासून येथे दोन्ही सैन्यात संघर्ष झाला नाही. पण एप्रिल २०२० मध्ये चीनने भारताच्या ८०० मीटर क्षेत्रावर दावा केला त्यावर ६१ वर्षापूर्वी  सहमती झाली होती. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा गलवान खोऱ्यात सैन्य मागे घेण्याची बातमी आली तेव्हा १९६२ चा पेपर कटिंग सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. या वृत्तपत्राचं शीर्षक असं होतं- 'चीन सैन्य गलवान पोस्टमधून मागे हटणार, दिल्लीच्या इशाऱ्याचा परिणाम दिसून येत असल्याचेही लिहिले गेले आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावindian air forceभारतीय हवाई दलchinaचीन