शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

India China FaceOff: चीनच्या आयातीला वेसण घालणार?; स्पीड ब्रेकर तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 06:38 IST

आयात शुल्क वाढवणे, अँटी डंपिंग शुल्क लावणे व गुणवत्तासंबंधी कठोर मानक तयार करण्याचे पर्याय शोधले जात आहेत. चिनी मालाच्या नो-एंट्रीसाठी ई-कॉमर्सचे नवे नियमही बनवले जाऊ शकतात.

नितीन अग्रवाल नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात चीनच्या काळ्याकुट्ट कृतीनंतर देशभरात चिनी साहित्यावरील बहिष्काराची मागणी जोर धरत आहे. सरकारी स्तरावरही याबाबत गांभीर्याने विचारविनिमय सुरू झाला आहे. चीनच्या आयातीला वेसण घालण्यासाठी मुख्य रूपाने तीन रस्ते शोधले जात आहेत. या अंतर्गत आयात शुल्क वाढवणे, अँटी डंपिंग शुल्क लावणे व गुणवत्तासंबंधी कठोर मानक तयार करण्याचे पर्याय शोधले जात आहेत. चिनी मालाच्या नो-एंट्रीसाठी ई-कॉमर्सचे नवे नियमही बनवले जाऊ शकतात.>आयात शुल्कात वाढज्या वस्तूंवर आयात शुल्क वाढवले जाईल, त्यांची किंमत देशांतर्गत उत्पादनांच्या तुलनेत वाढेल. त्यामुळे त्या वस्तू मागवणे व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर राहणार नाही. त्या महाग झाल्यामुळे आपोआपच त्या उत्पादनांची मागणी कमी होईल व त्यांची जागा देशांतर्गत उत्पादने घेऊ शकतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०० पेक्षा अधिक उत्पादनांवर सरकारची नजर आहे. यात देशांतर्गत उपकरणे, गिफ्ट तथा प्रीमियम उत्पादने, हँड बॅग, शोभेचे दागिने व इतर सजावटीच्या साहित्यासारख्या जीवनावश्यक नसलेल्या साहित्याचाही यात समावेश आहे.>उद्योगांकडून मागवली यादीउद्योग संवर्धन व आंतरिकता व्यापार विभागाने वाहन, औषधी, खेळणी, प्लास्टिक व फर्निचर उद्योगाच्या उत्पादन व व्यापार संघटनांकडून चीनहून आयात होणारे साहित्य व त्यांच्या उपयोगाबाबत माहिती मागवली आहे. त्यातील गैर जरूरी साहित्याची यादी काढून त्याची आयात रोखली जाऊ शकणार आहे.>अँटी डंपिंग शुल्कव्यापार महासंचालनालयाच्या अँटी डंपिंग विभागात चिनी साहित्याशी संबंधित सुमारे ३५ प्रकरणे प्रलंबित आहेत. यात रसायन, पॉलिस्टर व स्टील, कॉपर संबंधित साहित्याचा समावेश आहे. यावरून असे दिसते की, चीनहून स्वस्त माल मोठ्या प्रमाणावर भारतात पाठवला जात असेल तर सरकार यावर अँटी डंपिंग शुल्क लावून भारतात या मालाच्या आयातीवर परिणाम करू इच्छित आहे.>गुणवत्तेचे कठोर मानकसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुणवत्तेच्या आधारावर चीनहून होणारी आयात कमी केली जाऊ शकणार आहे. सरकारने विविध स्तरांवर अशा उत्पादनांची यादीही तयार करणे सुरू केले आहे. त्या आधारावर हा माल भारतात येण्यापासून रोखला जाणार आहे. अशा स्थितीत चीन केवळ तीच उत्पादने पाठवू शकेल, जी भारतीय बाजारांत कठोर मानकांचे निकष पूर्ण करू शकतील. चीनमधून येणाºया दुग्ध उत्पादनांवर गुणवत्तेच्या आधारावर यापूर्वीच रोख लावण्यात आलेली आहे.>द्विपक्षीय व्यवसायात मोठे अंतर : भारत व चीनच्या द्विपक्षीय व्यवसायात मोठे अंतर आहे. सरकारी आकडेवारीनुसार, २०१९मध्ये भारत व चीनच्या दरम्यान ९२.६८ अब्ज डॉलर्सचा व्यवसाय झाला. यात तब्बल ७४.७२ अब्ज डॉलर्सचा चिनी माल भारतात आला. आणि केवळ १७.९६ अब्ज डॉलर्सचा माल भारतातून चीनमध्ये गेला.>ई-कॉमर्सद्वारे वेसण घालणार : ई-कॉमर्सद्वारे चिनी कंपन्यांचा माल थेट भारतीय बाजारात विकण्यावर परिणाम करील, अशी योजना तयार केली जात आहे. सरकार ई-कॉमर्स कंपन्यांसाठी नवीन नियम बनवू शकते. त्यात ते उत्पादन कोणत्या देशात बनवले आहे, हे सांगणे अनिवार्य करण्यात येणार आहे.

टॅग्स :chinaचीन